शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

नर्मदा विकास विभागाने आपली जबाबदारी समजून लवकरात लवकर नियोजन करून शाळा बांधून द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:32 IST

सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापितांच्या मुला, मुलींसाठी नर्मदा नवनिर्माण अभियानांतर्गत धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात साधारण १३ जीवन शाळा शासनाच्या ...

सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापितांच्या मुला, मुलींसाठी नर्मदा नवनिर्माण अभियानांतर्गत धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात साधारण १३ जीवन शाळा शासनाच्या कुठल्याही अनुदानाशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून चालविण्यात येत आहेत. या शाळांमधील वर्गखोल्या शासनाच्या नर्मदा विकास विभागाने उपलब्ध करून दिल्या आहेत. असे असले तरी या वर्गखोल्या पत्र्याच्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अथवा चक्रीवादळात नेहमी वर्गखोल्यांचे पत्रे उडण्याच्या प्रकाराला विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत असते. आताही दोन ते तीन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे डनेल व मनीबेली येथील शाळांच्या वर्गखोल्यांचे पत्रे उडाले आहेत. सुदैवाने शाळांना उन्हाळी सुट्टी असल्याने विद्यार्थी घरी गेले होते. साहजिकच पुढील दुर्दैवी घटना टळली आहे.

नर्मदा बचाव आंदोलक व पालक सातत्याने सर्वच शाळांच्या वर्गखोल्या या बांबूच्या कुडाच्या पारंपरिक पद्धतीच्या खोल्या बांधून देण्याची मागणी करीत आहे. तथापि, संबंधित नर्मदा विकास विभाग गांभीर्याने दखल घेत नाही. त्यामुळे अशा प्रकारास विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. वास्तविक अभियान शासनाच्या मदतीविनाच विस्थापितांच्या पाल्यांचा प्राथमिक शिक्षणाचा प्रश्न सोडवून चांगले विद्यार्थी घडवत आहेत. मात्र, नर्मदा विकास विभाग केवळ चांगल्या वर्गखोल्यांची तजवीज करून देत नाही. त्यामुळे विस्थापितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, नैसर्गिक आपत्तीत सतत पत्रे उडण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी बांबूच्या कुडाच्या वर्गखोल्या म्हणजे कौलारू करून द्याव्यात. यात जिल्हा प्रशासनाने स्वतः लक्ष घालावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.

या शाळांसाठी १५ वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांनी केले होते आंदोलन

डनेल व मणिबेलीची नर्मदा जीवन शाळा सरदार सरोवर प्रकल्पामुळे २००६ ला बुडाली होती. ही शाळा पुन्हा बांधून देण्याकरिता सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी अक्कलकुवा तहसील कार्यालयाचा कब्जा करीत तिथेच जवळपास दीड महिना शाळा चालवली व १५ ऑगस्टचा झेंडादेखील तहसील कार्यालयातच फडकवला होता. आमची शाळा नव्याने बांधून द्या, अशी मागणी केली. त्यामुळे नर्मदा विकास विभागाला डनेल व मणिबेली येथे शाळा बांधून द्यावी लागली. आम्ही त्यांच्याकडे आदिवासी पद्धतीची जशी बांबूच्या ताट्याची व कौलारू घरांची मागणी केली; पण त्यांनी पत्र्याच्या शेडची शाळा बनवून दिली. जी दरवर्षी पावसाळ्यात उडून जाते. किमान आतातरी नर्मदा विकास विभागाने आमच्या मागणीप्रमाणे नियोजन केले तर दरवर्षी जे नुकसान होते ते वाचेल.

विद्यार्थी गर्मीच्या त्रासाला कंटाळले

नर्मदा जीवन शाळा पत्र्याच्या शेडमध्ये भरत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना कायम गर्मीचा त्रास सहन करावा लागत असतो. शिवाय तेथे हवादेखील खेळती राहत नाही. त्यामुळे विद्यार्थी मोठ्या मुश्किलीने बसत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. वास्तविक सहा ते १४ वयोगटातील सर्व बालकांना मोफत शिक्षणाचा अधिकार आहे. त्यामुळे ती संधी उपलब्ध करून देण्याची शासनाची जबाबदारी आहे. असे असताना ती भूमिका नर्मदा नवनिर्माण अभियान पार पाडत आहे. निदान प्रशासनाने त्यांना सध्या कौलारू, बांबूच्या कुडाच्या वर्गखोल्या तरी द्याव्यात, अशी पालकांची माफक अपेक्षा आहे.

दरवर्षी पावसाळ्यात अथवा वादळात शाळेच्या वर्गखोल्यांचे पत्रे उडण्याचा प्रकाराला कंटाळलो आहोत. या प्रकाराला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी कौलारू, बांबूच्या कुडाच्या खोल्या बांधून देण्याची मागणी नर्मदा विकास विभागाकडे करीत आहोत. परंतु, आमची दखल घेतली जात नाही. आता तरी यावर गांभीर्याने विचार होऊन शाळा सुरू होण्याआधी खोल्यांची कामे पूर्ण व्हावी. - बलसिंग पावरा, मुख्याध्यापक, मनिवेली जीवन शाळा, ता. अक्कलकुवा

पत्र्याचा शेडच्या वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांना गरम होत असते. शिवाय हवादेखील खेळती राहत नाही. वादळात तर नेहमीचेच पत्रे उडण्याचा त्रास सहन करावा लागतो. कायमस्वरूपी उपाय योजना म्हणून कौलारू, कुडाच्या पारंपरिक पद्धतीच्या खोल्या बांधून द्याव्यात.

- चेतन साळवे, कार्यकर्ता, नर्मदा बचाव आंदोलन.