शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
2
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
3
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
4
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
5
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
6
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
7
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
8
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
9
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
10
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
11
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
12
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
13
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
14
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
15
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
16
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
17
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
18
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

नंदुरबार जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला दिशा देणारा ‘नंदनवन’

By admin | Updated: May 5, 2017 16:46 IST

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा माहिती अधिकारी यांच्या कल्पकतेतून तयार झालेला ‘नंदनवन’ हा माहितीपट पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरू पहात आहे.

 नंदुरबार,दि.5 - जिल्ह्यात एकापेक्षा एक सरस नैसर्गिक आणि धार्मिक पर्यटन स्थळे आहेत. परंतु त्यांची माहिती पर्यटकांर्पयत पोहचत नसल्यामुळे आणि पर्यटक येत नसल्यामुळे त्यांचा विकास थांबला आहे. ही बाब लक्षात घेता पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा माहिती अधिकारी यांच्या कल्पकतेतून तयार झालेला ‘नंदनवन’ हा माहितीपट पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरू पहात आहे.

 सर्वाधिक रोजगार देवू शकणा:या आणि वेगाने विस्तारीत होणा:या क्षेत्रापैकी पर्यटन हा एक उद्योग आहे. जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. नंदुरबार जिल्ह्यात विस्तीर्ण अशा सातपुडय़ाच्या रांगा आहेत. या रांगांमध्ये महाबळेश्वर नंतर राज्यातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ आहे. सारंगखेडा यात्रा देशभरातील अश्वशौकिनांसाठी हेरीटेज ठरत आहे तर सातपुडय़ाच्या उंच शिखरावरील अस्तंबा यात्रा गिर्यारोहकांचा साद घालते. जिल्ह्यातून तापी व नर्मदा नदी वाहते. तापीवरील प्रकाशा व सारंगखेडा येथील बॅरेजमध्ये बारमाही पाणी उपलब्ध होते. तेथे स्थानिकसह थेट प्रकाशा ते सारंगखेडा दरम्यान बोटिंग सुरू करता येईल का याची चाचपणी केली जात आहे. याशिवाय सातपुडय़ाच्या पहिल्या रांगेत उनपदेव येथे गरम पाण्याचे झरे आहेत. प्रकाशासारखे तीर्थक्षेत्र या जिल्ह्यात आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पर्यटन क्षेत्र व तीर्थ क्षेत्राच्या विकासातून जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलण्याचा पर्यटनमंत्री तथा पालकमंत्री रावल यांचा मानस आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या वर्षी दोन कोटी 66 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. सारंगखेडा यात्रेतील चेतक महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आले होते. त्यांनी  सारंगखेडा येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध माध्यमातून ब्रँडिंग केले. त्याचे सकारात्मक परिणाम आगामी काळात दिसण्याची अपेक्षा आहे. 
काळमदेव, प्रकाशा, मोड-चैतन्यश्वेर, रावलापाणी, हजरत इमाम बादशाह दर्गा या पर्यटन व तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी सव्वा तीन कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. आदिवासी बांधवांचा होळी हा महत्त्वाचा सण. होलिकोत्सवाचेही ब्रँडींग करण्यात येत आहे.  
जिल्ह्यातील या पर्यटन स्थळांची र्सवकष माहिती असलेल्या या माहितीपटात जिल्ह्यातील सद्य:स्थितीत असलेली प्रसिद्ध पर्यटनस्थळे व पर्यटनाला चालना देणा:या पर्यटनस्थळांच्या माहितीचा समावेश आहे. गुरुवार, 4 मे रोजी रात्री 10 वाजता या माहितीपटाचे प्रेक्षपण करण्यात आले. जिल्हावासीयांसह खान्देशातील प्रेक्षकांनी आवजरून हा माहितीपट पाहिला.
 
असा झाला माहितीपट तयार..
पर्यटनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यात येत आहे. त्याचअंतर्गत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा माहितीपट निर्माण करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी त्यासाठी प्रोत्साहन दिले. या माहितीपटाची संकल्पना व संशोधन जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांचे आहे. संशोधन सहाय्य अर्चना देशमुख, दिनेश चौरे, बंडू चौरे तर लेखन, दिग्दर्शन व चित्रीकरण ब्रिज कम्युनिकेशनचे मिलिंद पाटील यांनी केले आहे. 
 
जिल्ह्याच्या पर्यटनस्थळाला एक नवी दिशा देणारा हा माहितीपट तयार झाला आहे. त्यासाठी पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी मोलाचे सहकार्य केले. हा माहितीपट इतर जिल्ह्यांसाठी मॉडेल ठरणार आहे.
-रणजितसिंह राजपूत,
जिल्हा माहिती अधिकारी.