शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

नंदुरबार जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला दिशा देणारा ‘नंदनवन’

By admin | Updated: May 5, 2017 16:46 IST

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा माहिती अधिकारी यांच्या कल्पकतेतून तयार झालेला ‘नंदनवन’ हा माहितीपट पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरू पहात आहे.

 नंदुरबार,दि.5 - जिल्ह्यात एकापेक्षा एक सरस नैसर्गिक आणि धार्मिक पर्यटन स्थळे आहेत. परंतु त्यांची माहिती पर्यटकांर्पयत पोहचत नसल्यामुळे आणि पर्यटक येत नसल्यामुळे त्यांचा विकास थांबला आहे. ही बाब लक्षात घेता पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा माहिती अधिकारी यांच्या कल्पकतेतून तयार झालेला ‘नंदनवन’ हा माहितीपट पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरू पहात आहे.

 सर्वाधिक रोजगार देवू शकणा:या आणि वेगाने विस्तारीत होणा:या क्षेत्रापैकी पर्यटन हा एक उद्योग आहे. जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. नंदुरबार जिल्ह्यात विस्तीर्ण अशा सातपुडय़ाच्या रांगा आहेत. या रांगांमध्ये महाबळेश्वर नंतर राज्यातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ आहे. सारंगखेडा यात्रा देशभरातील अश्वशौकिनांसाठी हेरीटेज ठरत आहे तर सातपुडय़ाच्या उंच शिखरावरील अस्तंबा यात्रा गिर्यारोहकांचा साद घालते. जिल्ह्यातून तापी व नर्मदा नदी वाहते. तापीवरील प्रकाशा व सारंगखेडा येथील बॅरेजमध्ये बारमाही पाणी उपलब्ध होते. तेथे स्थानिकसह थेट प्रकाशा ते सारंगखेडा दरम्यान बोटिंग सुरू करता येईल का याची चाचपणी केली जात आहे. याशिवाय सातपुडय़ाच्या पहिल्या रांगेत उनपदेव येथे गरम पाण्याचे झरे आहेत. प्रकाशासारखे तीर्थक्षेत्र या जिल्ह्यात आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पर्यटन क्षेत्र व तीर्थ क्षेत्राच्या विकासातून जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलण्याचा पर्यटनमंत्री तथा पालकमंत्री रावल यांचा मानस आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या वर्षी दोन कोटी 66 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. सारंगखेडा यात्रेतील चेतक महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आले होते. त्यांनी  सारंगखेडा येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध माध्यमातून ब्रँडिंग केले. त्याचे सकारात्मक परिणाम आगामी काळात दिसण्याची अपेक्षा आहे. 
काळमदेव, प्रकाशा, मोड-चैतन्यश्वेर, रावलापाणी, हजरत इमाम बादशाह दर्गा या पर्यटन व तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी सव्वा तीन कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. आदिवासी बांधवांचा होळी हा महत्त्वाचा सण. होलिकोत्सवाचेही ब्रँडींग करण्यात येत आहे.  
जिल्ह्यातील या पर्यटन स्थळांची र्सवकष माहिती असलेल्या या माहितीपटात जिल्ह्यातील सद्य:स्थितीत असलेली प्रसिद्ध पर्यटनस्थळे व पर्यटनाला चालना देणा:या पर्यटनस्थळांच्या माहितीचा समावेश आहे. गुरुवार, 4 मे रोजी रात्री 10 वाजता या माहितीपटाचे प्रेक्षपण करण्यात आले. जिल्हावासीयांसह खान्देशातील प्रेक्षकांनी आवजरून हा माहितीपट पाहिला.
 
असा झाला माहितीपट तयार..
पर्यटनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यात येत आहे. त्याचअंतर्गत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा माहितीपट निर्माण करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी त्यासाठी प्रोत्साहन दिले. या माहितीपटाची संकल्पना व संशोधन जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांचे आहे. संशोधन सहाय्य अर्चना देशमुख, दिनेश चौरे, बंडू चौरे तर लेखन, दिग्दर्शन व चित्रीकरण ब्रिज कम्युनिकेशनचे मिलिंद पाटील यांनी केले आहे. 
 
जिल्ह्याच्या पर्यटनस्थळाला एक नवी दिशा देणारा हा माहितीपट तयार झाला आहे. त्यासाठी पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी मोलाचे सहकार्य केले. हा माहितीपट इतर जिल्ह्यांसाठी मॉडेल ठरणार आहे.
-रणजितसिंह राजपूत,
जिल्हा माहिती अधिकारी.