शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Nandurbar: जळगाव-उधना दरम्यान तिसरा रेल्वेमार्गसाठी प्रयत्न, रावसाहेब दानवेंचं आश्वासन

By मनोज शेलार | Updated: August 19, 2023 19:20 IST

Indian Railway: उधना-जळगाव रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम उत्कृष्ट झाले. आता तिसरी लाइन टाकण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. शिवाय अमृत भारत रेल्वेस्थानकांतर्गत खान्देशातील आणखी काही स्थानकांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नंदुरबारात पत्रकारांशी बोलतांना केले.

- मनोज शेलार नंदुरबार - उधना-जळगाव रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम उत्कृष्ट झाले. आता तिसरी लाइन टाकण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. शिवाय अमृत भारत रेल्वेस्थानकांतर्गत खान्देशातील आणखी काही स्थानकांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नंदुरबारात पत्रकारांशी बोलतांना केले. भुसावळ-सुरत मार्गावरील कामांच्या पाहणीसाठी दानवे हे विशेष रेल्वेने जात असताना नंदुरबारात काही काळ थांबले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, पश्चिम रेल्वेच्या ताप्ती सेक्शनवरील उधना-जळगाव हे रेल्वेलाइन महत्त्वपूर्ण आहे. दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर आता तिसरी लाइन बाबत विचार सुरू आहे.

सर्व आवश्यक यंत्रणांचा अहवाल मागवून हा निर्णय घेतला जाईल. अमृत स्थानकांतर्गत पहिल्या टप्प्यात मोजक्याच स्थानकांचा सहभाग आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील विशेषत: खान्देशातील जास्तीत जास्त स्थानके घेण्याचा प्रयत्न असेल. मोदी सरकार आल्यापासून रेल्वेचे बजेट मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याने मागे पडलेल्या कामांना गती देण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली पाचोरा-जामनेर मार्गांवर नवीन रेल्वेमार्ग टाकणार आहे. त्यासोबतच कोल्हापूर ते तुळजापूर, नगरपासून ते बीड-परळीपर्यंत या मार्गांच्या कामांना गती देणार आहोत.

वंदे भारत रेल्वे आतापर्यंत २५ सुरू झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसचा कलर बदलण्यात आला असून, हा कलर महत्त्वाच्या नाही. आता सिटिंगसह स्लिपर कोचदेखील तयार केले जाणार आहेत. लातूर येथे कोच बांधणीची फॅक्टरी सुरू करत असून, त्या ठिकाणी स्लीपर कोचेस तयार केले जाणार आहेत. १०० ट्रेन बनविण्याच्या प्रस्ताव रेल्वे विभागाने दिलेला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेJalgaonजळगावraosaheb danveरावसाहेब दानवे