शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

जागेअभावी नंदुरबारचा मिरची बाजार संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:22 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहराची ओळख असलेल्या मिरची पथारींसाठी आता जागेची शोधाशोध करावी लागणार आहे. सध्या असलेल्या जागेवर रहिवास क्षेत्र वाढल्यामुळे या ठिकाणचे नागरिक मिरची पथारींना विरोध करू लागले आहेत. त्यामुळे मिरची बाजार आणि पथारी आता शहराबाहेर जाण्याची शक्यता आहे. योग्य जागा आणि आवश्यक सुविधा न मिळाल्यास नंदुरबारचा मिरची बाजार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहराची ओळख असलेल्या मिरची पथारींसाठी आता जागेची शोधाशोध करावी लागणार आहे. सध्या असलेल्या जागेवर रहिवास क्षेत्र वाढल्यामुळे या ठिकाणचे नागरिक मिरची पथारींना विरोध करू लागले आहेत. त्यामुळे मिरची बाजार आणि पथारी आता शहराबाहेर जाण्याची शक्यता आहे. योग्य जागा आणि आवश्यक सुविधा न मिळाल्यास नंदुरबारचा मिरची बाजार नामशेष होण्याची शक्यता आहे.नंदुरबारची ओळख लाल मिरचीच्या माध्यमातून सर्वदूर आहे. लाखो क्विंटल मिरचीची आवक दरवर्षी होते. त्या माध्यमातून कोटय़ावधी रुपयांची उलाढाल देखील होत असते. या माध्यमातून मिरची प्रक्रिया उद्योगही नंदुरबारात मोठय़ा स्वरूपात सुरू झाले. चिली पार्क देखील त्याच अनुषंगाने येथे प्रस्तावीत आहे. परंतु मिरचीचा लिलाव, साठवणूक आणि वाळविण्यासाठीची जागाच आता उलब्ध होत नसल्यामुळे मिरची बाजारावर संकटाचे ढग जमा झाले आहेत. येत्या काळात हा बाजार शहराबाहेर स्थलांतरीत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दोंडाईचा, निझर स्पर्धेतनंदुरबारातील मिरची बाजाराच्या स्पर्धेत आता दोंडाईचा आणि गुजरातमधील निझर बाजार समिती स्पर्धेत उतरली आहे. दोंडाईचा येथे देखील दरवर्षी हजारो क्विंटल मिरचीची आवक होते. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल केली जाते. निझर चे मार्केट देखील आता स्पर्धेत आहे. पूर्वी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, दोंडाईचा, साक्री, पिंपळनेर या भागासह तळोदा, निझर भागातील शेतकरी नंदुरबार बाजारात मिरची विक्रीसाठी आणत होते. परंतु दोंडाईचा आणि निझर मार्केटचा पर्याय खुला झाल्याने त्या भागातील शेतकरी आता तिकडे वळू लागले आहे. त्याचा परिणाम येथील आवकवर होऊ लागला असल्याचे चित्र आहे. आता पुन्हा पथारींसाठी योग्य आणि पुरेशी जागा उपलब्ध झाली नाही तर हा उद्योग संकटात येईलच परंतु येथील मिरची आवक देखील मंदावेल अशी भिती व्यक्त केली जात आहे.व्यापा:यांची मागणी यासंदर्भात व्यापा:यांनी जिल्हाधिका:यांकडे पथारींसाठी जागा उ्पलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. उद्योग टिकवायचे असतील तर योग्य आणि पुरेशी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी येथील मिरची व्यापारी आणि उद्योजकांनी केली आहे.नंदुरबारचा विस्तार मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. वळण रस्त्याच्या दोन्ही बाजुला अनेक वसाहती तयार होत आहेत. मिरची पथारीवरील जागा मालकांनी आता त्या भागात प्लॉट पाडून त्यांची विक्री सुरू केली आहे. दवाखाने, व्यापारी प्रतिष्ठाने देखील या ठिकाणी येवू लागली आहेत. ही बाब लक्षात घेता स्थानिकांचा मिरची पथारींना विरोध वाढू लागला आहे. उन्हाळ्यात तसेच हवेचा वेग जास्त राहिल्यास मिरचीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. याशिवाय वळण रस्त्यावरील वाहतूक देखील वाढली आहे. त्यामुळे वाहन चालकांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. नंदुरबारातील मिरची बाजार आणि येथील मिरची राज्यात  सर्वदूर प्रसिद्ध आहे. लाल मिरचीचे नंदुरबार अशी ओळख देखील आहे. मिरची हंगामात अर्थात नोव्हेंबर ते एप्रिल र्पयत शेकडो   हेक्टर क्षेत्रावर लाल मिरचीचा गालिचा पसरलेला असतो.      वळण रस्त्याच्या दोन्ही बाजुला हे चित्र गेल्या वर्षार्पयत दिसत होते. बाहेरगावच्या लोकांना या मिरची पथारींचे मोठे अप्रूप होते. बाजार समिती व व्यापारी जागा मालकांकडून भाडे तत्वावर ही जागा मिरची हंगामाच्या कालावधीत घेत होते. परंतु गेल्या दोन   ते तीन वर्षापासून मिरची पथारींना अवकळा निर्माण होत       आहे.नंदुरबारातील मिरची पथारी आता शहराबाहेर तसेच पाच किलोमिटरच्या आत नेण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी जागेची चाचपणी देखील सुरू करण्यात आली  आहे. उमर्दे रस्त्याला लागूनच जागा मिळावी यासाठी     बाजार समिती प्रय}शील आहे. भाडेतत्वावर ही जागा राहणार आहे. साधारणत: दीडशे ते दोनशे एकर जागेची आवश्यकता आहे. एवढी मोठी जागा एकाच ठिकाणी मिळणे दुरापस्थ आहे. त्यामुळे आता बाजार समितीच्या आवाहनाला जमीन मालक कसे प्रतिसाद देतात याकडे लक्ष लागून आहे. मिरची पथारीसाठीची जागा योग्य ठिकाणी न मिळाल्यास येथील मिरची उद्योगावर संकट येण्याची शक्यता आहे. येथील व्यापारी मिरची हंगामात हजारो क्विंटल मिरची खरेदी करून ती पथारींवर वाळवून घेतात. त्यानंतर ती मिरची आपल्या गोदाम व कोल्डस्टोरेजमध्ये साठवतात. प्रक्रिया उद्योगासाठी ही मिरची वर्षभर वापरली जाते. नंदुरबारात 20 ते 25 प्रक्रिया उद्योग आहे. तेथे तयार झालेली मिरची पावडर राज्यासह देशभरात विक्री केली जाते. एगमार्क आणि विशिष्ट ओळख असलेल्या येथील मिरची पावडरला मागणी देखील आहे. काही वर्ष येथील मिरची पावडर ही दुबई व आखाती देशात देखील निर्यात झाली होती. आताची परिस्थिती पाहिली तर हे उद्योग संकटात येण्याची शक्यता आहे.