शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

देश विकासासाठी मोदी सरकार अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मोदी सरकारने वर्षभरात विविध ऐतिहासिक निर्णय घेवून देशाचा विकास आणि आत्मनिर्भरतेसाठी पुढचे पाऊल टाकले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मोदी सरकारने वर्षभरात विविध ऐतिहासिक निर्णय घेवून देशाचा विकास आणि आत्मनिर्भरतेसाठी पुढचे पाऊल टाकले आहे. कोरोनाच्या तीन महिन्याच्या काळात खंबीर भुमिका घेवून इतर देशांच्या तुलनेत कोरोनाचा फैलाव रोखने आणि मृत्यूदर कमी राखण्यात देखील मोदी सरकारने यश मिळविल्याचा दावा खासदार डॉ.हिना गावीत यांनी पत्रकार परिषदेत केला.मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त वर्षभराच्या काळात घेतलेले निर्णय, कोरोना महामारीच्या संदर्भातील केंद्र शासनाच्या उपाययोजना याची माहिती देण्यासाठी खासदार डॉ.हिना गावीत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत उपस्थित होते. त्यांनी सांगितले, गेल्या वर्षभराच्या कालावधीत अनेक महत्वाचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले आहेत. सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे घटनेचे कलम ३७० हटविण्यात आले. जम्मू आणि कश्मिरमध्ये भारताचे संविधान त्यामुळे पुर्णपणे लागू झाले.लड्डाख आणि जम्मू-कश्मिर हे दोन केंद्र शासीत प्रदेश निर्माण झाले. राम मंदीराचा मार्ग मोकळा झाला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय घेताच न्यास स्थापन करून मंदीर उभारणीच्या कामाला चालना दिली.तिहेरी तलाक रद्द केले. नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ लागू केला. दहशतवादावर कठोर कारवाईसाठी सुधारणा विधेयक मंजूर केले. बँकांचे विलीनिकरण, चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, अटल भूजल योजना, प्रधानमंत्री किसान पेन्शन योजना यासह इतर महत्वाचे निर्णय घेवून देश विकासाला चालना दिल्याचे त्यांनी सांगितले.कोरोना फैलाव रोखण्यात, त्याचा मृत्यूदर कमी राखण्यात, जास्तीत जास्त कोरोना चाचणी घेण्यात देश आघाडीवर राहिला. एन-९५ व पीपीई किट तयार करण्यात भारत आत्मनिर्भर झाला. प्रगत देशाच्या तुलनेत भारतातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. १४ देशांमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्याही भारतातील मृत्यूसंख्येच्या तुलनेत ५५.२ पट इतकी आहे.लॉकडाऊनच्या काळात एक लाख ७० हजार कोटी रुपयांचे पॅकेज, धान्य वाटप, ८ कोटी घरांमध्ये तीन गॅस सिलींडर मोफत देणे, मनरेगाच्या अंतर्गत १३ कोटी ६२ लाख कुटूंबांना लाभ दिला गेला. ३८० श्रमिक ट्रेन चालवून ५२ लाख स्थलांतरीतांना त्यांच्या भागात पोहचविले. लॉकडाऊनपूर्वी १४४४ भारतीय नागरिकांना भारतात आणल्याचे त्यांनी सांगितले.