शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

देश विकासासाठी मोदी सरकार अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मोदी सरकारने वर्षभरात विविध ऐतिहासिक निर्णय घेवून देशाचा विकास आणि आत्मनिर्भरतेसाठी पुढचे पाऊल टाकले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मोदी सरकारने वर्षभरात विविध ऐतिहासिक निर्णय घेवून देशाचा विकास आणि आत्मनिर्भरतेसाठी पुढचे पाऊल टाकले आहे. कोरोनाच्या तीन महिन्याच्या काळात खंबीर भुमिका घेवून इतर देशांच्या तुलनेत कोरोनाचा फैलाव रोखने आणि मृत्यूदर कमी राखण्यात देखील मोदी सरकारने यश मिळविल्याचा दावा खासदार डॉ.हिना गावीत यांनी पत्रकार परिषदेत केला.मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त वर्षभराच्या काळात घेतलेले निर्णय, कोरोना महामारीच्या संदर्भातील केंद्र शासनाच्या उपाययोजना याची माहिती देण्यासाठी खासदार डॉ.हिना गावीत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत उपस्थित होते. त्यांनी सांगितले, गेल्या वर्षभराच्या कालावधीत अनेक महत्वाचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले आहेत. सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे घटनेचे कलम ३७० हटविण्यात आले. जम्मू आणि कश्मिरमध्ये भारताचे संविधान त्यामुळे पुर्णपणे लागू झाले.लड्डाख आणि जम्मू-कश्मिर हे दोन केंद्र शासीत प्रदेश निर्माण झाले. राम मंदीराचा मार्ग मोकळा झाला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय घेताच न्यास स्थापन करून मंदीर उभारणीच्या कामाला चालना दिली.तिहेरी तलाक रद्द केले. नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ लागू केला. दहशतवादावर कठोर कारवाईसाठी सुधारणा विधेयक मंजूर केले. बँकांचे विलीनिकरण, चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, अटल भूजल योजना, प्रधानमंत्री किसान पेन्शन योजना यासह इतर महत्वाचे निर्णय घेवून देश विकासाला चालना दिल्याचे त्यांनी सांगितले.कोरोना फैलाव रोखण्यात, त्याचा मृत्यूदर कमी राखण्यात, जास्तीत जास्त कोरोना चाचणी घेण्यात देश आघाडीवर राहिला. एन-९५ व पीपीई किट तयार करण्यात भारत आत्मनिर्भर झाला. प्रगत देशाच्या तुलनेत भारतातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. १४ देशांमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्याही भारतातील मृत्यूसंख्येच्या तुलनेत ५५.२ पट इतकी आहे.लॉकडाऊनच्या काळात एक लाख ७० हजार कोटी रुपयांचे पॅकेज, धान्य वाटप, ८ कोटी घरांमध्ये तीन गॅस सिलींडर मोफत देणे, मनरेगाच्या अंतर्गत १३ कोटी ६२ लाख कुटूंबांना लाभ दिला गेला. ३८० श्रमिक ट्रेन चालवून ५२ लाख स्थलांतरीतांना त्यांच्या भागात पोहचविले. लॉकडाऊनपूर्वी १४४४ भारतीय नागरिकांना भारतात आणल्याचे त्यांनी सांगितले.