सर्व सामाजिक घटकांना आमंत्रित करून वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करावे. यात टेकडीवरील रहिवासी, परिसरातील अनरद, पुसनद, मोहिदा, सावळदा गाव व शहादेकर नागरिक यांच्या मदतीने वृक्षारोपण करावे. सातपुडा साखर कारखान्याकडून वृक्ष भेट म्हणून मिळणार आहेत, त्याचा वापर ठिकठिकाणी करणे. उपसमूह बनवणे जसे वृक्ष संवर्धन समिती, शासकीय योजना व अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन वेळोवेळी मार्गदर्शन घेणे व त्यांना टेकडीवर आणणे. पाणीपुरवठ्यासाठी तांत्रिक समिती बनवणे. गावातून नारळाच्या काथ्था जमा करणे जेणेकरून ते वृक्षलागवडीस उपयोगी ठरतील. वेळ आल्यास वृक्ष जपवणुकीसाठी खासगी रखवालदार ठेवणे. दर रविवारी टेकडीवर पाच वाजता सभा आयोजित करणे. या चळवळीसाठी कोणीही आर्थिक मदत मागू नये. इच्छा असल्यास स्वखर्च वृक्षसंवर्धनासाठी करावा. ब्राम्हणपुरी येथील अनिल पाटील व अंशुमन पाटील हे या उपक्रमासाठी सहकार्य करणार आहेत. गांडूळ खताची मदत शहादा येथील जायन्टस ग्रुप करणार आहे. या वृक्षारोपण व संवर्धनासाठी महिलांची मदत घेतली जाणार असून समूहात महिलांना समाविष्ट करावे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. पहिला पाऊस पडला की प्रत्यक्ष वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य सुरू केले जाईल, असे प्रतिष्ठानतर्फे ठरविण्यात आले. वृक्षप्रेमी चिपको आंदोलनाचे प्रवर्तक सुंदरलाल बहुगुणा यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक प्रदीप पाटील यांनी तर आभार ज्ञानी कुलकर्णी यांनी मानले.
हनुमान टेकडी परिसरातील वृक्षारोपणासाठी कसे नियोजन करावे यासाठी वृक्षसंवर्धन विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. दोन दिवसीय सभेत प्रदीप पाटील, ज्ञानी कुलकर्णी, माधव पाटील, गुरुचरणसिंग राजपाल, अनिल साळुंखे, डॉ. विवेक पाटील, अतिन पटेल, भूषण बाविसकर, रमाशंकर माळी, लियाकत अली सैयद, खलील शाह, चतुर पाटील, विवेक भावसार, पुरुषोत्तम शिंपी, अनिल पाटील, किशोर चौधरी, चेतन गांगुर्डे, रोहन माळी, गणेश सोनवणे, सौरभ जहागीरदार, जगदाळे, संजय पाटील आदी उपस्थित होते.