शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

संसर्गाच्या भीतीने प्रवासादरम्यान होतोय मास्क अन् सॅनिटायझरचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:33 IST

नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग वाढू नये, सुरू असलेल्या लाॅकडाऊनमधून अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. यात खाजगी प्रवासी बस ...

नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग वाढू नये, सुरू असलेल्या लाॅकडाऊनमधून अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. यात खाजगी प्रवासी बस वाहतुकीचा समावेश असून नंदुरबार शहरातून पुण्या-मुंबईकडे जाणाऱ्या सहा बसेस धावू लागल्या आहेत. यातून प्रवास करणारे प्रवासी संसर्गाच्या भीतीने स्वत:च सुरक्षा उपायांवर भर देत असल्याचे दिसून आले आहे.

मार्च महिन्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या, वाढता मृत्यूदर यामुळे एक एप्रिलपासून जिल्ह्यात लाॅकडाऊन सुरु झाले होते. यात वेळोवेळी वाढ होत राहिली आहे. यातून जिल्हाबंदी लागू झाल्याने प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. यात केवळ अत्यावश्यक म्हणून प्रवास करु इच्छिणाऱ्यांना परवानगी देण्यात आली होती. त्यासाठी विविध कोविड नियमावली लागू करण्यात आली होती. दरम्यान लाॅकडाऊनमुळे बाहेर गावी अडकलेले परतीसाठी प्रयत्नशील हाेते. यातून खाजगी प्रवासी बसेसला कोविड नियमांसह वाहतूक करण्यास परवानगी मिळाल्याने अनेकांना आधार मिळाला आहे.

नंदुरबार शहरातून सायंकाळी सुटणाऱ्या सहा बसेसची पडताळणी केली असता, मास्क आणि सॅनेटायझर वापरात प्रवासीच अग्रभागी असल्याचे दिसून आले. प्रवाशांची इच्छितस्थळी पोहोचल्यावर तेथील प्रशासन तपासणी करत असल्याचे सांगण्यात आले. बहुतांश प्रवासी हे वैद्यकीय कारणांमुळे मुंबई व पुण्याकडे जात असल्याने त्यांची कागदपत्रे तपासणी केली जात होते. येणाऱ्या प्रवाशांचीही तपासणी होत असल्याचे ट्रॅव्हल्सचालकांनी सांगितले.

मास्क व सॅनिटायझर

शहरातून दररोज सायंकाळी बाहेर पडणाऱ्या बसेससाठी नोंदणी करताना कोविड रिपोर्ट सक्तीचा असल्याचे सांगण्यात आले. त्याशिवाय तिकीट दिले जात नसल्याचे सांगण्यात आले. दररोज सर्व सहा बसेस सॅनिटाईज करुन देण्यात येत असल्याचे तसेच चालक व वाहकांची वेळोवेळी कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात येत असल्याची माहिती चालकांकडून देण्यात आली. मास्क व सॅनिटायझरची सक्ती आहे.

एकही कारवाई नाही

दरम्यान शहरातील ट्रॅव्हल्स सुरु झाल्या असल्या तरी त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या वाहतुकीचा आढावाही उपप्रादेशिक परिवाहन विभागाने घेतला नसल्याचे समोर आले आहे. यातून नेमकी वाहतूक योग्य की अयोग्य पद्धतीने सुरु आहे किंवा कसे याची पडताळणीही झालेली नसल्याचे समोर आले आहे. याकडे संबधित विभागाने लक्ष देत ट्रॅव्हल्स चालकांना सूचना करण्याची मात्र गरज आहे.

ई-पास राज्याकडून

जिल्हा बंदीदरम्यान ई-पास देण्याचा अधिकार हा शासनाने स्वत:कडे ठेवून घेतला आहे. यातून ट्रॅव्हल्समधून प्रवास करणारे ई-पाससाठी अर्ज केल्यानंतर तिकीट बुक करत आहेत. काही ट्रॅव्हल्सचालक या पासची काॅपी मिळाल्याशिवाय तिकिट देत नसल्याचे सांगण्यात आले. ज्या शहरात जायचे तेथे तपासणी होत असल्याने हे सक्तीचे असल्याचे चालकांनी सांगितले.