शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

बाजारपेठची वेळ आता ७ ते ४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 13:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधीतांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नुकतेच आठ दिवस लॉकडाऊन केले. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधीतांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नुकतेच आठ दिवस लॉकडाऊन केले. आता मंगळवार, ४ आॅगस्टपासून नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर या शहरांमधील बाजारपेठेची वेळ ही सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंतची राहणार आहे. चार वाजेपासून कडकडीत बंद पाळला जाणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवा या काळात सुरू राहणार आहेत.जिल्ह्यातील विशेषतअ नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर येथे कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन दिवसात तर तब्बल १०० रुग्ण आढळले. शिवाय पाच जणांचा मृत्यू देखील झाला. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने काही गंभीर पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचअंतर्गत बाजारपेठा दुपारी चार वाजता बंद होणार आहेत.वेळेची अंमलबजावणीबाजारात सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. सकाळची गर्दी नियंत्रीत करण्यासाठी उपाययोजना असल्या तरी ग्रामिण भागातील नागरिकांना अत्यावश्यक खरेदीसाठी शहरी भागात यावेच लागते. त्यामुळे सकाळी नाही किमान सायंकाळची गर्दी सक्तीने कमी करण्यासाठी प्रशासनाने आता थेट बंदचा निर्णय घेतला आहे. सद्य स्थितीत सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत बाजारपेठा सुरू ठेवण्याचा निर्णय आहे. आता ही वेळ बदलून सकाळी सात ते दुपारी चार अशी राहणार आहे. त्याची अंमलबजावणी मंगळवार, ४ आॅगस्टपासून करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने या चारही शहरांमध्ये अधिकृत सुचना देखील काढली आहे.साखळी तोडण्यासाठी प्रयत्नगर्दीतून कोरोनाचा फैलाव होतो. त्यामुळे गर्दी कमी करून साखळी तोडण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्याची अंमलबजावणी नंदुरबार, शहादा, नवापूर व तळोदा या चार पालिकांनी सक्तीने करावी असेही निर्देश देण्यात आले आहेत.अत्यावश्यक सेवा सुरूदुपारी चार वाजेनंतर बाजारपेठा बंद राहणार असल्या तरी औषधी दुकाने, दवाखाने, दूध विक्री आदी सेवा सुरू राहणार आहेत. शिवाय रात्रीची संचारबंदी कायम राहणार आहे. संचारबंदीच्या काळात पेट्रोलपंप देखील बंद राहणार आहेत.

४चार शहरांव्यतिरिक्त इतर भागात नेहमीच्या वेळेत बाजारपेठ सुरू राहणार आहे. त्यात कुठलाही बदल नाही.४जिल्हाभरातील रात्रीची संचारबंदी देखील कायम राहणार आहे.४ग्रामिण भागातील नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच शहरी भागात यावे अन्यथा येण्याचे टाळावे.