शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
4
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
5
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
6
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
7
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
8
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
9
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
10
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
11
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
12
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
13
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
14
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
15
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
16
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
17
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO
18
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
19
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
20
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!

बाजारपेठची वेळ आता ७ ते ४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 13:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधीतांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नुकतेच आठ दिवस लॉकडाऊन केले. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधीतांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नुकतेच आठ दिवस लॉकडाऊन केले. आता मंगळवार, ४ आॅगस्टपासून नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर या शहरांमधील बाजारपेठेची वेळ ही सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंतची राहणार आहे. चार वाजेपासून कडकडीत बंद पाळला जाणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवा या काळात सुरू राहणार आहेत.जिल्ह्यातील विशेषतअ नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर येथे कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन दिवसात तर तब्बल १०० रुग्ण आढळले. शिवाय पाच जणांचा मृत्यू देखील झाला. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने काही गंभीर पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचअंतर्गत बाजारपेठा दुपारी चार वाजता बंद होणार आहेत.वेळेची अंमलबजावणीबाजारात सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. सकाळची गर्दी नियंत्रीत करण्यासाठी उपाययोजना असल्या तरी ग्रामिण भागातील नागरिकांना अत्यावश्यक खरेदीसाठी शहरी भागात यावेच लागते. त्यामुळे सकाळी नाही किमान सायंकाळची गर्दी सक्तीने कमी करण्यासाठी प्रशासनाने आता थेट बंदचा निर्णय घेतला आहे. सद्य स्थितीत सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत बाजारपेठा सुरू ठेवण्याचा निर्णय आहे. आता ही वेळ बदलून सकाळी सात ते दुपारी चार अशी राहणार आहे. त्याची अंमलबजावणी मंगळवार, ४ आॅगस्टपासून करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने या चारही शहरांमध्ये अधिकृत सुचना देखील काढली आहे.साखळी तोडण्यासाठी प्रयत्नगर्दीतून कोरोनाचा फैलाव होतो. त्यामुळे गर्दी कमी करून साखळी तोडण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्याची अंमलबजावणी नंदुरबार, शहादा, नवापूर व तळोदा या चार पालिकांनी सक्तीने करावी असेही निर्देश देण्यात आले आहेत.अत्यावश्यक सेवा सुरूदुपारी चार वाजेनंतर बाजारपेठा बंद राहणार असल्या तरी औषधी दुकाने, दवाखाने, दूध विक्री आदी सेवा सुरू राहणार आहेत. शिवाय रात्रीची संचारबंदी कायम राहणार आहे. संचारबंदीच्या काळात पेट्रोलपंप देखील बंद राहणार आहेत.

४चार शहरांव्यतिरिक्त इतर भागात नेहमीच्या वेळेत बाजारपेठ सुरू राहणार आहे. त्यात कुठलाही बदल नाही.४जिल्हाभरातील रात्रीची संचारबंदी देखील कायम राहणार आहे.४ग्रामिण भागातील नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच शहरी भागात यावे अन्यथा येण्याचे टाळावे.