शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

बाजारपेठची वेळ आता ७ ते ४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 13:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधीतांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नुकतेच आठ दिवस लॉकडाऊन केले. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधीतांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नुकतेच आठ दिवस लॉकडाऊन केले. आता मंगळवार, ४ आॅगस्टपासून नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर या शहरांमधील बाजारपेठेची वेळ ही सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंतची राहणार आहे. चार वाजेपासून कडकडीत बंद पाळला जाणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवा या काळात सुरू राहणार आहेत.जिल्ह्यातील विशेषतअ नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर येथे कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन दिवसात तर तब्बल १०० रुग्ण आढळले. शिवाय पाच जणांचा मृत्यू देखील झाला. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने काही गंभीर पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचअंतर्गत बाजारपेठा दुपारी चार वाजता बंद होणार आहेत.वेळेची अंमलबजावणीबाजारात सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. सकाळची गर्दी नियंत्रीत करण्यासाठी उपाययोजना असल्या तरी ग्रामिण भागातील नागरिकांना अत्यावश्यक खरेदीसाठी शहरी भागात यावेच लागते. त्यामुळे सकाळी नाही किमान सायंकाळची गर्दी सक्तीने कमी करण्यासाठी प्रशासनाने आता थेट बंदचा निर्णय घेतला आहे. सद्य स्थितीत सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत बाजारपेठा सुरू ठेवण्याचा निर्णय आहे. आता ही वेळ बदलून सकाळी सात ते दुपारी चार अशी राहणार आहे. त्याची अंमलबजावणी मंगळवार, ४ आॅगस्टपासून करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने या चारही शहरांमध्ये अधिकृत सुचना देखील काढली आहे.साखळी तोडण्यासाठी प्रयत्नगर्दीतून कोरोनाचा फैलाव होतो. त्यामुळे गर्दी कमी करून साखळी तोडण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्याची अंमलबजावणी नंदुरबार, शहादा, नवापूर व तळोदा या चार पालिकांनी सक्तीने करावी असेही निर्देश देण्यात आले आहेत.अत्यावश्यक सेवा सुरूदुपारी चार वाजेनंतर बाजारपेठा बंद राहणार असल्या तरी औषधी दुकाने, दवाखाने, दूध विक्री आदी सेवा सुरू राहणार आहेत. शिवाय रात्रीची संचारबंदी कायम राहणार आहे. संचारबंदीच्या काळात पेट्रोलपंप देखील बंद राहणार आहेत.

४चार शहरांव्यतिरिक्त इतर भागात नेहमीच्या वेळेत बाजारपेठ सुरू राहणार आहे. त्यात कुठलाही बदल नाही.४जिल्हाभरातील रात्रीची संचारबंदी देखील कायम राहणार आहे.४ग्रामिण भागातील नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच शहरी भागात यावे अन्यथा येण्याचे टाळावे.