शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

मनीष जैन यांच्यासह चौघांना वर्षभर कारावास

By admin | Updated: June 9, 2015 03:02 IST

धनादेशाच्या अनादरप्रकरणी येथील महावीर नागरी सहकारी पतपेढीचे तत्कालीन चेअरमन व माजी आमदार मनीष जैन यांच्यासह चौघांना प्रत्येकी एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

जळगाव: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिलेल्या ३ कोटी रुपयांच्या धनादेशाच्या अनादरप्रकरणी येथील महावीर नागरी सहकारी पतपेढीचे तत्कालीन चेअरमन व माजी आमदार मनीष जैन यांच्यासह चौघांना प्रत्येकी एक वर्ष कारावासाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायाधीश ए.एम.मानकर यांनी ठोठावली आहे. अन्य आरोपींमध्ये पतपेढी, तत्कालीन व्हाईस चेअरमन महेंद्र लुंकड व कार्यकारी संचालक सुभाष सांखला आणि तत्कालीन व्यवस्थापक विश्वनाथ रामसिंग पाटील यांचा समावेश आहे. नंतर अपिलात जाण्यासाठी त्यांच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली व जामीनही मंजूर केला. सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास हा निकाल देण्यात आला. अशाच एका दुसर्‍या खटल्यात अन्य चौघांना एक वर्ष कारावास व ७ कोटी रु. भरपाईचा आदेश मानकर यांनी दिला आहे. भरपाईपोटी सर्वांनी मिळून महिनाभरात चार कोटी रु. न्यायालयात भरावे, असेही निकालात नमूद आहे. निकालाच्या वेळी मनीष जैन यांच्यासह चौघे न्यायालयात उपस्थित होते. बँकेचे प्राधिकृत अधिकारी भिला शामराव पाटील हे फिर्यादी होते. बँकेतर्फे ॲड.सागर चित्रे आणि मनीष जैन यांच्यातर्फे ॲड.रवींद्र पाटील, भादलीकर यांनी काम पाहिले. पतपेढी आणि लुंकड व साखला यांच्यातर्फे ॲड.नलिनकुमार शाह यांनी आणि विश्वनाथ पाटील यांच्यातर्फे ॲड.शरद न्हायदे यांनी काम पाहिले. २२ ऑक्टोबर २००२ च्या व्यवहारानुसार जिल्हा बँकेकडून मंजूर ८ कोटी रुपयांच्या कर्जापोटी पतपेढीने जिल्हा बँकेला अकोला अर्बन बँकेचा ३ कोटींचा धनादेश १ ऑक्टोबर २००३ ला दिला होता, मात्र तो त्याच दिवशी न वटता परत आला. यामुळे जिल्हा बँकेने पतपेढी आणि चौघांना १८ ऑक्टोबरला नोटीस पाठवली पण पूर्तता न झाल्याने २७ नोव्हेंबर २००३ ला रितसर फिर्याद दाखल केली.पुढे प्रत्यक्ष सुनावणीच्या तारखेस फिर्यादी न्यायालयात हजर न राहिल्याने डिस्मिस् फॉर डिफॉल्ट मानून खटला निकाली काढण्यात आला. त्यावर फिर्यादीने दाद मागितली असता खंडपीठाने खटल्याचे कामकाज पूर्ववत चालवण्याचे आदेश दिले. बँकेतर्फे फिर्यादी, भिला शामराव पाटील, दुसरे अधिकारी मधुकर तुकाराम चौधरी आणि तत्कालिन चेअरमन व माजी खासदार वसंतराव मोरे यांच्या साक्षी झाल्या. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम १३८ (धनादेशाचा अनादर) नुसार गुन्हा सिद्ध झाल्याचे न्यायालयाने ग्रा‘ धरुन फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम २५५ (२) नुसार एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याशिवाय पतपेढीला २५ हजार रु.दंड आणि फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ३५७ नुसार सर्व आरोपींनी मिळून ४ कोटी रु.भरपाईदाखल एक महिन्यात न्यायालयात भरावे, असेही आदेशात नमूद केले आहे. -----------------अपिलात जाणार....न्यायदेवतेवर आपला विश्वास आहे.पतपेढीने बँकेची बहुतांश रक्कम अदा केलेली आहे. धनादेश टाकण्यात आला तेव्हा मला सहीचे अधिकार नव्हते. ३ डिसेंबर २०१२ च्या ठरावानुसार पतपेढीने सुरेश टाटिया, सुरेंद्र लुंकड, सुभाष सांखला, विश्वनाथ रामदास पाटील या चौघांपैकी कोणत्याही तिघांच्या स्वाक्षरीने बँकींग व्यवहारावर स‘ा करण्याच्या अधिकारात बदल झालेला आहे, तसे बँकेला पतपेढीने कळवलेले आहे. तांत्रिक कारणामुळे निकाल विरोधात गेला असला तरी अपिलात आपल्याला न्याय मिळेल. लवकरच अपिल दाखल करू.-मनीष जैन, माजी आमदार