शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मनीष जैन यांच्यासह चौघांना वर्षभर कारावास

By admin | Updated: June 9, 2015 03:02 IST

धनादेशाच्या अनादरप्रकरणी येथील महावीर नागरी सहकारी पतपेढीचे तत्कालीन चेअरमन व माजी आमदार मनीष जैन यांच्यासह चौघांना प्रत्येकी एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

जळगाव: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिलेल्या ३ कोटी रुपयांच्या धनादेशाच्या अनादरप्रकरणी येथील महावीर नागरी सहकारी पतपेढीचे तत्कालीन चेअरमन व माजी आमदार मनीष जैन यांच्यासह चौघांना प्रत्येकी एक वर्ष कारावासाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायाधीश ए.एम.मानकर यांनी ठोठावली आहे. अन्य आरोपींमध्ये पतपेढी, तत्कालीन व्हाईस चेअरमन महेंद्र लुंकड व कार्यकारी संचालक सुभाष सांखला आणि तत्कालीन व्यवस्थापक विश्वनाथ रामसिंग पाटील यांचा समावेश आहे. नंतर अपिलात जाण्यासाठी त्यांच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली व जामीनही मंजूर केला. सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास हा निकाल देण्यात आला. अशाच एका दुसर्‍या खटल्यात अन्य चौघांना एक वर्ष कारावास व ७ कोटी रु. भरपाईचा आदेश मानकर यांनी दिला आहे. भरपाईपोटी सर्वांनी मिळून महिनाभरात चार कोटी रु. न्यायालयात भरावे, असेही निकालात नमूद आहे. निकालाच्या वेळी मनीष जैन यांच्यासह चौघे न्यायालयात उपस्थित होते. बँकेचे प्राधिकृत अधिकारी भिला शामराव पाटील हे फिर्यादी होते. बँकेतर्फे ॲड.सागर चित्रे आणि मनीष जैन यांच्यातर्फे ॲड.रवींद्र पाटील, भादलीकर यांनी काम पाहिले. पतपेढी आणि लुंकड व साखला यांच्यातर्फे ॲड.नलिनकुमार शाह यांनी आणि विश्वनाथ पाटील यांच्यातर्फे ॲड.शरद न्हायदे यांनी काम पाहिले. २२ ऑक्टोबर २००२ च्या व्यवहारानुसार जिल्हा बँकेकडून मंजूर ८ कोटी रुपयांच्या कर्जापोटी पतपेढीने जिल्हा बँकेला अकोला अर्बन बँकेचा ३ कोटींचा धनादेश १ ऑक्टोबर २००३ ला दिला होता, मात्र तो त्याच दिवशी न वटता परत आला. यामुळे जिल्हा बँकेने पतपेढी आणि चौघांना १८ ऑक्टोबरला नोटीस पाठवली पण पूर्तता न झाल्याने २७ नोव्हेंबर २००३ ला रितसर फिर्याद दाखल केली.पुढे प्रत्यक्ष सुनावणीच्या तारखेस फिर्यादी न्यायालयात हजर न राहिल्याने डिस्मिस् फॉर डिफॉल्ट मानून खटला निकाली काढण्यात आला. त्यावर फिर्यादीने दाद मागितली असता खंडपीठाने खटल्याचे कामकाज पूर्ववत चालवण्याचे आदेश दिले. बँकेतर्फे फिर्यादी, भिला शामराव पाटील, दुसरे अधिकारी मधुकर तुकाराम चौधरी आणि तत्कालिन चेअरमन व माजी खासदार वसंतराव मोरे यांच्या साक्षी झाल्या. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम १३८ (धनादेशाचा अनादर) नुसार गुन्हा सिद्ध झाल्याचे न्यायालयाने ग्रा‘ धरुन फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम २५५ (२) नुसार एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याशिवाय पतपेढीला २५ हजार रु.दंड आणि फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ३५७ नुसार सर्व आरोपींनी मिळून ४ कोटी रु.भरपाईदाखल एक महिन्यात न्यायालयात भरावे, असेही आदेशात नमूद केले आहे. -----------------अपिलात जाणार....न्यायदेवतेवर आपला विश्वास आहे.पतपेढीने बँकेची बहुतांश रक्कम अदा केलेली आहे. धनादेश टाकण्यात आला तेव्हा मला सहीचे अधिकार नव्हते. ३ डिसेंबर २०१२ च्या ठरावानुसार पतपेढीने सुरेश टाटिया, सुरेंद्र लुंकड, सुभाष सांखला, विश्वनाथ रामदास पाटील या चौघांपैकी कोणत्याही तिघांच्या स्वाक्षरीने बँकींग व्यवहारावर स‘ा करण्याच्या अधिकारात बदल झालेला आहे, तसे बँकेला पतपेढीने कळवलेले आहे. तांत्रिक कारणामुळे निकाल विरोधात गेला असला तरी अपिलात आपल्याला न्याय मिळेल. लवकरच अपिल दाखल करू.-मनीष जैन, माजी आमदार