शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आंबा उत्पादनात यंदा झाली घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे थंडी लांबणीवर गेली. नोव्हेंबर महिना संपला तरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे थंडी लांबणीवर गेली. नोव्हेंबर महिना संपला तरी पावसाचे प्रमाण काही प्रमाणात वाढले होते. त्यामुळे उशिरा थंडीला सुरूवात झाल्यामुळे आंब्याच्या झाडांना मोहोर प्रक्रिया कमी प्रमाणात सुरू झाली. परंतु आंबा हंगामावर त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला असून, उत्पन्नात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.दरवर्षी दिवाळीपासून थंडीला सुरूवात होते. मात्र गेल्या वर्षी थंडी लांबल्यामुळे मोहोर येण्याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना करावी लागली होती. थंडीमुळे झाडावर ताण येऊन मोहोर प्रक्रिया सुरू होते. जवखेडा, ब्राह्मणपुरीसह रायखेड व परिसरातील काही शेतकºयांनी आपल्या शेताच्या बांधावर तर काही शेतकºयांनी आपल्या शेतात आंब्याची लागवड केली आहे. परंतु थंडी लांबल्याने शेतकºयांना मोहोराची प्रतिक्षा करावी लागली होती. गेल्यावर्षी वातावरणाचा असलेला असमतोल शिवाय अचानक थंडीत वाढ होणे व मध्येच अवकाळी पावसासह अचानक उष्मा वाढणे या सर्व घटनांमुळे मोहोर प्रक्रियेला अडचणी येत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.जवखेडा येथील कृषीभूषण शेतकरी हिरालाल ओंकार पाटील यांनी आपल्या शेतात एकूण एक हजार ते एक हजार १०० आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे. त्यात रत्ना, हापूस, केशरी, सिंधू सीडलेस, कलमी आदी प्रकारच्या आंब्याची लागवड केली. दरवर्षी आंब्याना मोहर आल्यावर ३०० ते ४०० क्विंटल उत्पन्न येत असायचे. परंतु यावर्षी कमी प्रमाणात लांबणीवर गेलेल्या पावसामुळे तसेच बदलत्या वातावरणामुळे मोहर धारणा कमी प्रमाणात झाल्याने उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली.