शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

आंबा उत्पादनात यंदा झाली घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे थंडी लांबणीवर गेली. नोव्हेंबर महिना संपला तरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे थंडी लांबणीवर गेली. नोव्हेंबर महिना संपला तरी पावसाचे प्रमाण काही प्रमाणात वाढले होते. त्यामुळे उशिरा थंडीला सुरूवात झाल्यामुळे आंब्याच्या झाडांना मोहोर प्रक्रिया कमी प्रमाणात सुरू झाली. परंतु आंबा हंगामावर त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला असून, उत्पन्नात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.दरवर्षी दिवाळीपासून थंडीला सुरूवात होते. मात्र गेल्या वर्षी थंडी लांबल्यामुळे मोहोर येण्याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना करावी लागली होती. थंडीमुळे झाडावर ताण येऊन मोहोर प्रक्रिया सुरू होते. जवखेडा, ब्राह्मणपुरीसह रायखेड व परिसरातील काही शेतकºयांनी आपल्या शेताच्या बांधावर तर काही शेतकºयांनी आपल्या शेतात आंब्याची लागवड केली आहे. परंतु थंडी लांबल्याने शेतकºयांना मोहोराची प्रतिक्षा करावी लागली होती. गेल्यावर्षी वातावरणाचा असलेला असमतोल शिवाय अचानक थंडीत वाढ होणे व मध्येच अवकाळी पावसासह अचानक उष्मा वाढणे या सर्व घटनांमुळे मोहोर प्रक्रियेला अडचणी येत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.जवखेडा येथील कृषीभूषण शेतकरी हिरालाल ओंकार पाटील यांनी आपल्या शेतात एकूण एक हजार ते एक हजार १०० आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे. त्यात रत्ना, हापूस, केशरी, सिंधू सीडलेस, कलमी आदी प्रकारच्या आंब्याची लागवड केली. दरवर्षी आंब्याना मोहर आल्यावर ३०० ते ४०० क्विंटल उत्पन्न येत असायचे. परंतु यावर्षी कमी प्रमाणात लांबणीवर गेलेल्या पावसामुळे तसेच बदलत्या वातावरणामुळे मोहर धारणा कमी प्रमाणात झाल्याने उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली.