शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

Maharashtra Election 2019 : राजकारणाचा डावही बदलला अन् भिडूही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 04:32 IST

नंदुरबार जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला.

- रमाकांत पाटीलनंदुरबार जिल्ह्यातील राजकारणाचा सारीपाट गेल्या महिनाभरातील घडामोडींमुळे पूर्णत: बदलला आहे. पक्षांतराच्या लाटेत काँग्रेसचे नेते भाजपत आणि शिवसेनेत आले तर भाजपचे आमदार काँग्रेसचे उमेदवार झाल्याने या जिल्ह्यातील राजकारणाचा डावही बदलला असून भिडूही बदलले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाचा डाव कोण जिंकणार हा एक औत्सुकतेचा विषय ठरला आहे.नंदुरबार जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला. माणिकराव गावीत आणि सुरुपसिंग नाईक या जोडीने जिल्ह्यात पाच दशके राजकारणाची सूत्रे हाती ठेवली. आता मात्र हे दोन्ही नेते वयोमानाने थकल्याने त्यांचे वारसदार निवडणुकीच्या रिंगणात आले आहेत. विशेष म्हणजे नाईक-गावीतांची मैत्री घट्ट होती. पण या निवडणुकीत त्यांचे वारसदार एकमेकांच्या विरोधात नवापूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसतर्फे शिरीष नाईक तर भाजपतर्फे भरत गावीत हे उमेदवारी करीत असल्याने ही लढत लक्षवेधी ठरली आहे.दुसरीकडे पक्षांतराच्या लाटेत अनेक नेत्यांनी दल बदलल्याने विधानसभेची ही निवडणूक जिल्ह्यासाठी राजकारणाची नवी दिशा ठरवणारी आहे. जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ आहेत. अक्कलकुवा मतदारसंघात काँग्रेसतर्फे सलग सातवेळा आमदार असलेले अ‍ॅड.के.सी. पाडवी हे पुन्हा उमेदवारी करीत आहेत. त्यांना यावेळी शिवसेनेचे आमशा पाडवी यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे. अर्थात यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने ही जागा जिंकण्यासाठी रघुवंशी आपली प्रतिष्ठा पूर्णपणाला लावणार त्यामुळे येथील लढतही रंगतदार ठरणार आहे. शहादा मतदारसंघात भाजपचे आमदार उदेसिंग पाडवी यांचे पुत्र राजेश पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. ते मुंबईला पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी हे रिंगणात आहेत. याठिकाणी अपक्ष उमेदवारही रिंगणात राहणार असल्याने येथील निवडणूक देखील चुरशीची ठरणार आहे.

पक्षांतराने रंगतभाजपचे आमदार उदेसिंग पाडवी यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी रातोरात काँग्रेस पक्षात प्रवेश करुन ऐनवेळी आपला मतदारसंघ सोडून नंदुरबार मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केली. याठिकाणी काँग्रेसला सक्षम उमेदवार नव्हता. पण रात्रीतून घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी नंदुरबार मतदारसंघातील लढत रंगतदार केली आहे.आघाडीच्या वाटाघाटीत शहादा मतदारसंघ काँग्रेसला सुटल्याने राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावीत यांनी नाराजी व्यक्त करीत पक्ष सोडला. त्यामुळे जिल्ह्यात या पक्षाचे आता प्रभावी कार्यकर्ते कुणीही नाही. माजी आमदार शरद गावीत हेदेखील नवापूरमधून इच्छुक होते. पण त्यांनीही पक्ष सोडला आणि नवापुरातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.अक्कलकुवा युतीने शिवसेनेला सोडला आहे. त्यामुळे येथे महिनाभरापूर्वी उमेदवारीच्या अपेक्षेने भाजपत गेलेले विजय पराडके व किरसिंग वसावे या दोन्ही कार्यकर्त्यांनी पुन्हा भाजपमधून १५ दिवसात शिवसेनेत प्रवेश केला आहे.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nandurbar-acनंदुरबार