शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:14 IST

प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यामध्ये व त्यात शहादा तालुक्यात पपई उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्याच ...

प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यामध्ये व त्यात शहादा तालुक्यात पपई उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्याच अनुषंगाने पपई व्यापारी हे शहादा शहरात वास्तव्यास आहेत. शहादा तालुक्यातून पपई खरेदीचे व्यवहार व्यापाऱ्यांच्या माध्यमातून एकतर्फी पद्धतीने ठरवले जातात. कारण त्याच व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना पपई पिकांचे रोप, औषध, रासायनिक खत घेण्याकरिता व्यापारी शेतकऱ्यांना काही अ‍ॅडव्हास स्वरूपात रक्कम देतात व पपई उत्पादनाची मनमर्जी पद्धतीने खरेदी करतात. या सर्व मनमानी कारभारावर आळा घालण्यासाठी शासनाने नियम लागू केले आहेत; पण त्या सर्व नियमांची पायमल्ली करीत पपई व्यापारी बिनधास्त शेतकऱ्यांची लुटमार करीत आहेत, तसेच अनेक व्यापारी शेतकऱ्यांना जास्ती भावाचे किंवा पैशांचे आमिष दाखवून फसवणूक करून पळूनही जातात.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील काळात अनेक वेळा वारंवार शासन दरबारी निवेदन देऊन पपई व्यापाऱ्यांचे शासनमान्य कागदपत्र पूर्ण करून त्यांना परवाना दिला पाहिजे व ज्या व्यापाऱ्याकडे शासनमान्य परवाना असेल त्यालाच फक्त पपई खरेदी करण्याचे अधिकार दिले पाहिजेत. त्यासाठी शासनाने कठोर पाऊल उचलून योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यास मदत करावी. जिल्ह्यात फळबागायतदार शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्याचे काम होत आहे. कारण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नाही, नियमावली नाही, कोणतीही कागदोपत्री शासन दरबारी नोंद नाही म्हणून कसे काम करायचे किंवा शेतकऱ्यांचा माल भरून पैसे न देता पळून जाणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. दरम्यान, गेल्या काही वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर बाजार समितीचे दरपत्रकानुसार खरेदी करण्याचे आवाहन करूनही परस्पर दर कमी करून पपई उत्पादक शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम व्यापारी करीत आहेत. व्यापार कोणीही कुठेही करू शकतो, त्यावर कोणतेही बंधन नाही; परंतु आर्थिक व्यवहार हे शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच झाले पाहिजेत. कारण हे परप्रांतीय व्यापारी आज मोठ्या प्रमाणात करोडो रुपयांचा व्यवहार करीत आहेत; पण शासनाच्या तिजोरीत एकही रुपया जमा न करता कर चोरी करत आहेत. फळ खरेदी करणाऱ्या परप्रांतीय व्यापाऱ्यांचे परवाने काढून त्यांची संपूर्ण माहिती द्यावी, शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्यास त्यांचे पैसे काढून देण्यास मदत करावी व संबंधित व्यापाऱ्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करून कठोर कारवाई करून शिक्षा करावी. पपई उत्पादक शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यासमक्ष बैठक घेऊन सर्व विषयांवर चर्चा करून २५ जानेवारीपर्यंत मार्ग काढावा, अन्यथा २६ जानेवारीला स्वाभिमानी शेतकरी संघटना नंदुरबार तसेच नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी आपल्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी, जिल्हाध्यक्ष नथू पाटील, कृष्णदास पाटील, वामन पाटील, रवींद्र पाटील, सचिन पाटील, गणेश पाटील, ईश्वर चौधरी, महेंद्र पाटील, रत्नदीप पाटील आदींच्या सह्या आहेत.