शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

त्रिसुत्रीचा वापर करून कोरोनाला हरवूया - पालकमंत्र्यांचे जिल्हवासीयांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:27 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर आणण्यासाठी मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे आणि शारीरिक अंतर या त्रिसुत्रीचा वापर ...

नंदुरबार : जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर आणण्यासाठी मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे आणि शारीरिक अंतर या त्रिसुत्रीचा वापर करावा आणि लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिकांना उद्देशून लिहिलेल्या पत्राद्वारे केले आहे. पालकमंत्री यांनी पत्रात म्हटले आहे की, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावर भर देणे आवश्यक आहे. लसीकरणामुळे आतापर्यंत जिल्ह्यात कुणालाही गंभीर स्वरूपाचा त्रास झालेला नाही. लसीकरणानंतर कोणत्याही प्रकारचा गंभीर त्रास होत नसून, काहींना होणारा सौम्य स्वरूपातील त्रास हा स्वाभाविक आणि उपचारांनी बरा होणारा आहे.

लस संपूर्ण सुरक्षित असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोरोना लसीकरण करुन घ्यावे. लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक असून, लसीकरणानंतर दोन आठवड्यांनी शरिरातील रोगप्रतिकारशक्तीमध्ये आवश्यक बदल होतीत. लस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाल्यास अशी व्यक्ती मृत्यूच्या दारापर्यंत जात नाही व औषधोपचाराने बरी होते, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी स्वतः प्रथम लसीकरण करून आपल्या भागातील नागरिकांना आदर्श घालून द्यावा, त्यांच्या मनातील संभ्रम दूर करावा व त्यानंतर लसीकरणाबाबत ग्रामीण भागात प्रचार- प्रसार करून शासकीय यंत्रणेच्या समन्वयाने शिबिरांचे आयोजन करावे. जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगावसारख्या दुर्गम व अतिदुर्गम भागातही लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. यासाठी जिल्हा परिषदेने आवश्यक कार्यवाही करावी.

कोरोनाचा संसर्ग झाल्यास रुग्णांनी घाबरून न जाता, डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार करावा. आरटीपीसीआर किंवा अँटिजेन चाचणी केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनाला आल्यास जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी तयार केलेल्या विलगीकरण कक्षांमध्ये औषधोपचारासाठी दाखल व्हावे. सर्वच रुग्णांना रेमडेसिविर औषधाची आवश्यकता नसते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

डॉक्टरांनी रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर केंद्र सरकारच्या प्रोटोकॉलनुसार पूर्ण तपासणी किंवा आवश्यक चाचण्या करूनच रुग्णाची स्थिती पाहूनच रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करणे आवश्यक आहे. रेमडेसिविर इंजेक्शनमध्ये स्टेरॉईडचा वापर असल्याने आवश्यकता नसल्यास त्याचा वापर करू नये. रेमडेसिविर इंजेक्शन आता बाहेर मिळत नाही. ते फक्त जिल्हा रुग्णालयात उपलब्ध होईल. आपण कोविड उपचार केंद्रात दाखल असल्यास व आपल्याला आवश्यकता असल्यास आपल्याला ते उपलब्ध करून देण्यात येईल. रेमडेसिविर इंजेक्शनच्या उत्पादनात वाढ करणे व त्यावरील कर कमी करणे यासारख्या उपाययोजना केंद्र व राज्य शासन करत आहे. रेमडेसिविरचा जास्तीत जास्त साठा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे मागणी केलेली आहे. रुग्णाला लक्षणे कधी आढळली, त्याला ऑक्सिजनची गरज आहे का, त्याचे वय अधिक आहे का, त्याला अन्य आजार असून, तो लवकर बरा होऊ शकतो का, याचा सारासार विचार केला तर रेमडेसिविरचा योग्य वापर करता येऊ शकतो. यातून इंजेक्शनचा दुरुपयोग टाळता येईल.

कोरोना झाल्याचे निदर्शनाला आल्यास नंदुरबार येथील एकलव्य कोविड केअर सेंटर, नवापूर, शहादा येथील कोरोना उपचार केंद्र व जिल्ह्यातील विविध विलगीकरण कक्षांमध्ये तसेच प्रकाशा येथील विलगीकरण कक्षात दाखल व्हावे. याठिकाणी आपल्याला प्राथमिक उपचार देण्यात येतील व आपल्याला आवश्यकता असल्यास कोविड उपचार केंद्रात स्थलांतरित करण्यात येईल. औषध उपचारांदरम्यान आपल्याला अत्यावश्यक असल्यास त्याठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शन देण्याची सुविधा शासनातर्फे मोफत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आपण स्वतः पीपीई किट घालून जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या कक्षात जाऊन परिस्थिती पाहिली असता, त्याठिकाणी कोरोना रुग्णांसोबत नातेवाईकांची गर्दी होती. कोरोना झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्यास इतरांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याने रुग्णासोबत नातेवाईकांना आणू नका. या महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली, परंतु आता ती कमी होत आहे. आपण सर्वांनी काळजी घेऊन जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आणण्याचा निर्धार करूया, असे आवाहन पालकमंत्री पाडवी यांनी केले आहे.