शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

उशिरा लागवडीमुळे भाताचे उत्पन्न घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सोमावल : तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्यालागत असलेल्या पश्चिमेकडील मैदानी भागात शेतकऱ्यांसाठी अन्न व पशुधनासाठी चारा म्हणून ...

लोकमत न्यूज नेटवर्कसोमावल : तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्यालागत असलेल्या पश्चिमेकडील मैदानी भागात शेतकऱ्यांसाठी अन्न व पशुधनासाठी चारा म्हणून उपलब्ध होणाऱ्या भात पिकांची काढणी हंगाम सुरू झाला आहे. यंदा भाताची उशिरा लागवड झाल्याने उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.परिसरात बहुतेक शेतकऱ्यांकडून पारंपरिक व चारसूत्री पद्धतीचा अवलंब करून लागवड केलेल्या   भात पिकाची कापणी, झोडपणी, मळणी आणि साठवणुकीच्या कामात शेतकरी व्यस्त आहेत. भात पिकांपासून पशुधनासाठी चाराही उपलब्ध होत असल्याने तो साठवणुकीसाठी शेतकऱ्यांची     लगबग सुरू आहे. यंदा जुलैचा पंधरवाडा उलटूनदेखील सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भात         लावणी खोळंबली होती.       सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी उशिरा का होईना भात लागवड केली. त्यामुळे यंदा भात पिकांच्या उत्पादनात घट होणार असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता.  बहुतेक शेतकऱ्यांनी  भात वाणात हळवा, निगरवा, गरवा, सुवासिक तसेच संकरित वाणाची लागवड केली   आहे. यात जया, फुले समृद्धी,     मसुरी, बासमती-३७०, इंद्रायणी, खुशबू, सह्याद्री तसेच गुजरात    राज्यात उपलब्ध असलेल्या  वाणाचेही उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले आहे. मागील काही वर्षांपासून येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नगदी पिकांची लागवड केल्याने  दिवसेंदिवस अन्नधान्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे परिणामी दैनंदिन प्रती व्यक्तीला लागणारे अन्नधान्य कमी पडू लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यानच्या कालावधीत शेजारील गुजरात राज्यात शेतीकामासह विविध रोजगारार्थ हंगामी स्थलांतराचे प्रमाण वाढले. कालांतराने येथील शेतमजूर भात पीक हंगामाची लावणी ते कापणीपर्यंतची कामे करण्यासाठीच लोकांचे तेथे स्थलांतर सुरू झाले. त्यामुळे तेथील पीक पद्धती आत्मसात करून येथे आल्यावर प्रायोगिक तत्वावर थोड्याफार प्रमाणात भात पिकाची लागवड सुरू केली.   परिणामी येथील हवामानात भरघोस पीक येवू लागल्याने परिसरात दिवसेंदिवस भात पिकाच्या क्षेत्रात वाढ होत गेली. त्यातच तालुका कृषी विभागानेही शेतकऱ्यांच्या पीक पद्धतीूचा बदलता कल लक्षात घेवून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले.     शेतकरी गटाच्या माध्यमाने चांगल्या प्रतीच्या वाणाची लागवड केल्याने उत्पादनात भरघोस वाढ झाली. यंदा मात्र भाताची उशिरा लागवड   झाल्याने उत्पादनात घट येणार असल्याचे भात उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

सोमावल परिसरातील बहुतेक मजूर गुजरात राज्यात भात लावणी ते काढणीपर्यंतच्या कामासाठी जातात. या शेतमजुरांनी तेथील भात पीक घेण्याची पद्धत आत्मसात केल्याने या परिसरात भाताचे उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांचा कल वाढला. मात्र यंदा पावसाच्या लहरीपणामुळे म्हणजेच जुलैचा पंधरवडा उलटूनही सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि नंतरच्या कालखंडात झालेल्या सततच्या अतिपावसामुळे पिकास पाहिजे तेवढे पोषक वातावरण न मिळाल्याने उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाची अपेक्षा नसली तरी उत्पादन खर्च निघावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.