शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
3
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
4
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
6
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
7
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
8
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
9
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
10
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
11
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
12
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
13
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
14
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
15
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
16
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
17
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
18
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
19
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार

देशातील सर्वात मोठे बर्ड फ्लू किलिंग ऑपरेशन नवापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:43 IST

बलेसरिया यांनी पोल्ट्री व्यवसायासाठी जर्मन तंत्रज्ञान वापरले होते. एका शेडमध्ये साधारण तीन कोटीची मशीनरी वापरली आहे. त्यासाठी काढलेले कोट्यवधी ...

बलेसरिया यांनी पोल्ट्री व्यवसायासाठी जर्मन तंत्रज्ञान वापरले होते. एका शेडमध्ये साधारण तीन कोटीची मशीनरी वापरली आहे. त्यासाठी काढलेले कोट्यवधी रुपयांचे कर्ज आता फेडायचे कसे? हा गहन प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. डोळ्यांदेखत कोट्यवधींचा व्यवसाय नेस्तनाबूत होताना बलेसरिया यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. हे किलिंग ऑपरेशन थांबणार कधी? मोठ्या इच्छाशक्तीने उभारलेला कोट्यवधींचा पोल्ट्री उद्योग नंतर कसा उभा राहणार? हे व असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर आहेत. सध्या तरी उघड्या डोळ्यांनी हृदयावर दगड ठेवून कोंबड्याचे किलिंग ऑपरेशन पाहण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्यायच शिल्लक नाही. पोल्ट्रीतील लाखो कुकुट पक्ष्यांचा कू-कू आवाज शांत झाल्याने पोल्ट्रीत स्मशान शांतता पसरली. पोल्ट्री व्यावसायिक चिंतातूर झाले आहेत.

कोरोनाच्या संकटाबरोबर देशात बर्ड फ्लूचे संकट आले. राज्यातही अनेक ठिकाणी बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे सिद्ध झाले आहे. पण याचा सगळ्यात मोठा फटका नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्‍यात बसला. येथे सध्या देशातील सगळ्यात मोठे किलिंग ऑपरेशन सुरू आहे. साधारण दोन टप्प्यात पोल्ट्रीतील कुकुट पक्षी नष्ट करण्यात आले. पहिल्या टप्प्यात २२ पोल्ट्रीतील साडेपाच लाख कुकुट पक्षी व २५ लाख अंडी नष्ट करण्यात आली. त्यानंतर बर्ड फ्लूची लागण शेजारील गुजरात राज्यातील नॅशनल पोल्ट्रीत झाली. येथे १७ हजार कुकुट पक्षी व ४८ हजार अंडी नष्ट करण्यात आली. येथील बर्ड फ्लूचा अहवाल एच ५एन १ घातक होता. नवापूर शहरातील बर्ड फ्लू एच ५एन ८ सामान्य विषाणू होता. नवापूर शहरातील बर्ड फ्लू २५ किलोमीटर विसरवाडी येथे पोहोचला आहे. तेथील तीन पोल्ट्रीत २० हजार कुकुट पक्षी व लाखो अंडी नष्ट करण्यात आली. त्यानंतर नवापूर शहरातील उर्वरित पाच पोल्ट्रीतील कुकुट पक्ष्यांचे अहवाल तीनवेळा निगेटिव्ह आले. कुठल्या पोल्ट्रीत पक्ष्यांची मरतूक नव्हती. परंतु अचानक मरतूक झाल्याने उर्वरित पाच पोल्ट्रीत बर्ड फ्लू अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शुक्रवारी चार पोल्ट्रीतील ५१ हजार कुकुट पक्षी नष्ट करण्यात आली. त्यानंतर नवापूर शहरातील सर्वात मोठी शोली पोल्ट्रीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोल्ट्री व्यावसायिक चिंतातूर झाले. कारण याठिकाणी साधारण दोन लाख ३७ हजार कुकुट पक्षी व ३० लाख अंडी आहेत. नवापूर तालुक्यातील सर्वाधिक नुकसान शोली पोल्ट्रीत होणार आहे.