शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

मिरचीचे अभिनव प्रयोग राबवणारे कृषीभूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 12:00 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नियोजनात्मक शेती केल्यास शेती आणि शेतकरी या दोघांनाही चांगलेच दिवस येतील, ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नियोजनात्मक शेती केल्यास शेती आणि शेतकरी या दोघांनाही चांगलेच दिवस येतील, फक्त मेहनतीची तयारी ठेवली पाहिजे़ हे वाक्य आहेत बामडोद ता़नंदुरबार येथील शेतकरी दशरथ गरबड पाटील यांचे़ शासनाच्या कृषी भूषण पुरस्काराने गौरवल्या गेलेल्या दशरथ पाटील यांनी कमीत कमीत खर्चात अधिक उत्पादन घेण्याचे विक्रमच केले आहेत़नंदुरबार तालुक्याच्या बामडोद या छोट्याशा गावात स्वत:च्या ३० एकर क्षेत्रात मिरची, पपई, केळी आणि टरबूज या पिकांची अभिनव पद्धतीने लागवड करुन अधिक उत्पादन घेण्यावर त्यांनी भर दिला आहे़ कमी पाणी आणि कमी खर्चात शेती कशी फुलवता येईल यासाठी सदैव प्रयत्न ते घेतात़ जास्तीत जास्त ठिबक सिंचनाने पाणी देऊन पिकांचे संगोपन करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो़ पिकांना रासायनिक खतांचा तुटवडा कधीकाळी उद्भवणार म्हणून सेंद्रीय खते, गोमूत्र, निंबोणी अर्क, पंचामृत आदींचा वापर ते अधिक प्रकृर्षाने करतात़मिरची उत्पादनामुळे नावलौकिक प्राप्त झालेल्या कृषीभूषण दशरथ पाटील यांनी २००८ साली तीन एकर क्षेत्रात आधुनिक पद्धतीने मिरची लागवड केली होती़ त्यासाठी ठिबक सिंचन व बेड पद्धतीचा वापर केला होता़ जिल्ह्यातील नाविण्यपूर्ण प्रकल्प त्याकडे पाहिले जात होते़ दरम्यान एकरी ३५० क्विंटल उत्पादन त्यांनी काढले आहे़ त्यांची मिरची उत्पादनातील हा विक्रम पाहून राज्यातील किमान एक हजार शेतकऱ्यांनी बामडोद येथे भेट देऊन माहिती घेतली होती़नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या शेती प्रयोगांमुळे त्यांचा नावाचा लौकिक झाला आहे़ केळी, पपई, मिरची, टरबूज या पिकांच्या उत्पादनात वाढ करुन कमीत कमी जागेत, कमी खर्चात उत्पादन घेण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील विविध भागातील अनेक शेतकऱ्यांना मार्ग सापडला आहे़ वर्षभर दशरथ पाटील मार्गदर्शनासाठीही शेतकºयांना भेटी देत असतात़