शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

मिरचीचे अभिनव प्रयोग राबवणारे कृषीभूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 12:00 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नियोजनात्मक शेती केल्यास शेती आणि शेतकरी या दोघांनाही चांगलेच दिवस येतील, ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नियोजनात्मक शेती केल्यास शेती आणि शेतकरी या दोघांनाही चांगलेच दिवस येतील, फक्त मेहनतीची तयारी ठेवली पाहिजे़ हे वाक्य आहेत बामडोद ता़नंदुरबार येथील शेतकरी दशरथ गरबड पाटील यांचे़ शासनाच्या कृषी भूषण पुरस्काराने गौरवल्या गेलेल्या दशरथ पाटील यांनी कमीत कमीत खर्चात अधिक उत्पादन घेण्याचे विक्रमच केले आहेत़नंदुरबार तालुक्याच्या बामडोद या छोट्याशा गावात स्वत:च्या ३० एकर क्षेत्रात मिरची, पपई, केळी आणि टरबूज या पिकांची अभिनव पद्धतीने लागवड करुन अधिक उत्पादन घेण्यावर त्यांनी भर दिला आहे़ कमी पाणी आणि कमी खर्चात शेती कशी फुलवता येईल यासाठी सदैव प्रयत्न ते घेतात़ जास्तीत जास्त ठिबक सिंचनाने पाणी देऊन पिकांचे संगोपन करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो़ पिकांना रासायनिक खतांचा तुटवडा कधीकाळी उद्भवणार म्हणून सेंद्रीय खते, गोमूत्र, निंबोणी अर्क, पंचामृत आदींचा वापर ते अधिक प्रकृर्षाने करतात़मिरची उत्पादनामुळे नावलौकिक प्राप्त झालेल्या कृषीभूषण दशरथ पाटील यांनी २००८ साली तीन एकर क्षेत्रात आधुनिक पद्धतीने मिरची लागवड केली होती़ त्यासाठी ठिबक सिंचन व बेड पद्धतीचा वापर केला होता़ जिल्ह्यातील नाविण्यपूर्ण प्रकल्प त्याकडे पाहिले जात होते़ दरम्यान एकरी ३५० क्विंटल उत्पादन त्यांनी काढले आहे़ त्यांची मिरची उत्पादनातील हा विक्रम पाहून राज्यातील किमान एक हजार शेतकऱ्यांनी बामडोद येथे भेट देऊन माहिती घेतली होती़नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या शेती प्रयोगांमुळे त्यांचा नावाचा लौकिक झाला आहे़ केळी, पपई, मिरची, टरबूज या पिकांच्या उत्पादनात वाढ करुन कमीत कमी जागेत, कमी खर्चात उत्पादन घेण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील विविध भागातील अनेक शेतकऱ्यांना मार्ग सापडला आहे़ वर्षभर दशरथ पाटील मार्गदर्शनासाठीही शेतकºयांना भेटी देत असतात़