शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

निरिक्षकांवर जागेवरच कारवाई करणार : खरीप नियोजन बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 17:15 IST

पालकमंत्र्यांचा इशारा, पावणेतीन लाख हेक्टर लक्षांक

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 17 : ज्या भागात बोगस बियाण्यांची विक्री होईल, खतांचा काळाबाजार होईल त्या भागातील कृषी निरिक्षकाला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाईच्या सुचना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीत बोलतांना दिल्या. दरम्यान, खरीप उत्पादकता वाढविण्यासाठी शेतक:यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यंदा दोन लाख 73 हजार 588 हेक्टर क्षेत्रावर खरीपाचे नियोजन करण्यात आले आहे.खरीप हंगाम आढावा बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री रावल बोलत होते. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, आमदार सुरुपसिंग नाईक, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार उदेसिंग पाडवी, जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, आदिवासी प्रकल्प अधिकारी वनमती सी., विनय गौडा यांच्यासह कृषी, वीज, पणन, सहकार, रोहयो यासह इतर विभागातील अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर बोलतांना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले, पुढील महिन्यापासून बागायती कापूस लागवड होणार आहे. त्यानंतर कोरडवाहू लागवड होईल. त्यामुळे बी.टी.कापूस बियाण्यांना मागणी वाढेल. जिल्ह्यात दरवर्षी बोगस बी.टी.बियाण्यांबाबत मोठय़ा प्रमाणावर तक्रारी येतात. अशी बियाणे कुठून येतात, कोण विक्री करतो याकडे लक्ष देण्यात यावे. ज्या भागात अशी बियाणे विक्री होतील, शेतक:यांची फसवणूक होईल त्या भागातील कृषी निरिक्षकास  जबाबदार धरून कारवाई        करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे तालुकानिहाय खरीप आढावा बैठक घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने तयारी करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. खरीप कर्जाची प्रकरणे तातडीने मंजुर करून 15 मे र्पयत पीक कर्जाचा सर्व पैसा शेतक:यांच्या हातात पडेल यादृष्टीने नियोजन करण्याचेही त्यांनी सांगितले.खासदार डॉ.हिना गावीत यांनी केंद्राच्या विविध योजनेतून जिल्ह्यातील शेतक:यांना लाभ दिला गेला पाहिजे. शेतक:यांर्पयत त्या योजना पोहचल्या पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बोंड अळीच्या नुकसानग्रस्त शेतक:यांना किती अनुदान आले, किती वाटप झाले याची माहिती विचारली. याशिवाय बोंडअळीवर नियंत्रणासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या, दुस:या पर्यायी वाणांबाबत जनजागृती करण्यात येत आहे काय? याबाबत विचारणा  केली.आमदार उदेसिंग पाडवी यांनी आदिवासी भागातील शेतक:यांना विशेषत: डोंगर उतारावरील शेती करणा:या शेतक:यांना स्थानिक ठिकाणी मार्गदर्शन करण्याबाबत सुचना केल्या.प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी सांगितले, गेल्या काही वर्षात शेतक:यांना अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामाचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. तालुका पातळीवर नियोजनावर भर देण्यात आला आहे.सुरुवातीला प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक मधुकर पन्हाळे यांनी    खरीप हंगामाचा आढावा सादर   केला.