शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

दुरुस्तीअभावी खापरखेडा धरण निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:47 PM

शेतकरी पाण्यापासून वंचित : मेनगेटला भगदाड, गाळ साचल्याने जलसाठय़ावर परिणाम

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 23 : खापरखेडा, ता.शहादा येथील रंगूमती नदीवर असलेल्या धरणात पूर्णपणे गाळ भरला गेल्याने व नादुरुस्त पाटचा:यांमुळे हे धरण निरुपयोगी ठरत आहे. या धरणात साचलेल्या गाळामुळे पाण्याचा साठा होत नसल्याने शेतक:यांना पाण्यापासून वंचित रहावे लागत  आहे.खापरखेडा येथे रंगूमती नदीवर 1970 मध्ये मातीचे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाची वेळोवेळी दुरुस्ती होत नसल्याने व पूर्णपणे गाळाने भरल्याने पाण्याचा साठा होऊ शकत नाही. हे धरण सद्यस्थितीत तलावासारखे वाटते. परिसरातील सुमारे 700 एकर शेती सिंचनाखाली येईल या उद्देशाने हे धरण बांधण्यात आले होते. परंतु धरणात गाळ साचल्याने व मुख्य गेट नादुरुस्त असल्याने पावसाळ्यात पाणीसाठा न होता पाणी वाहून जाते. जेमतेम 100 एकर शेतीलाही पाणी मिळत नाही. या धरणाच्या दुरुस्तीसाठी निधी मिळाल्याचे समजते. मात्र गेटची दुरुस्ती, पिचींग भरणे, गाळ काढणे, पाटचारी तयार करणे, लहान चा:या बनविणे आदी कोणतीही कामे झालेली नाहीत. धरणाच्या दुरुस्तीसाठी मिळालेला निधी व झालेल्या कामांची चौकशी  करण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे.सद्यस्थितीत धरणात पाणीसाठा नसल्याने त्याची दुरुस्ती होण्याची गरज आहे. गाळ काढण्यासाठी शासनाने जेसीबी मशीन उपलब्ध करून देऊन संपूर्ण गाळ काढण्यात यावा. मेनगेट दुरुस्त करून धरणार्पयत जाण्यासाठी रस्ता तयार करावा. या धरणातील गाळ वाहून नेणा:या शेतक:यांकडून काही जण पैशांची मागणी करतात. पैसे दिले नाही तर काही महाभाग तर गाळ वाहून नेणा:या वाहनांना आडवे येतात, अशी तक्रार शेतक:यांकडून होत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या कर्मचा:यांनी तेथे थांबण्याची गरज आहे.शासनाकडून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ मोहीम राबविली जाते. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येतात. त्याचप्रमाणे खापरखेडा धरणातील गाळ उपसण्यासाठी शासनाने जेसीबी मशीन उपलब्ध करून द्यावे. त्यामुळे धरणातील गाळही काढला जाईल व शेतक:यांच्या जमिनीसाठी गाळ उपयोगी पडणार आहे. धरणातील गाळ कमी झाल्यानंतर पुरेसा पाणीसाठा होऊन शेती सिंचनासाठी त्याचा उपयोग होणार आहे. लोकप्रतिनिधी व पाटबंधारे विभागाच्या अधिका:यांनी या धरणाच्या दुरुस्तीकडे लक्ष घालून पाण्याअभावी शेती बागायती करण्यापासून वंचित असलेल्या शेतक:यांना पाणी उपलब्ध  करून देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.