शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

मुलींच्या वसतीगृहाला संरक्षक भिंतीची प्रतिक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 12:38 PM

लोकमत न्यूज नेटवर्क चिंचपाडा : नवापुर तालुक्यातील चिंचपाडा येथे आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने मंजूरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कचिंचपाडा : नवापुर तालुक्यातील चिंचपाडा येथे आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने मंजूरी देत मुलींच्या वसतीगृहासाठी इमारतीचे बांधकाम पूर्ण केले आहे़ हे बांधकाम पूर्ण होवून दोन वर्षाचा कालावधी लोटूनही संरक्षक भिंतर बांधण्याची मात्र प्रतिक्षा आहे़ यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे़चिंचपाडा गावातील रेल्वेस्टेशन भागात प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रकल्प कार्यालयाने आदिवासी मुलींसाठी वसतीगृहाची निर्मिती केली होती़ २००७ पासून सुरु झालेले हे वसतीगृह भाडोत्री इमारतीत सुरु करण्यात आले होते़ याठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्याने मुलींच्या पालकांनी चिंता व्यक्त केली होती़ सुविधा नसल्याने मुलींचे शिक्षणही धोक्यात होते़ याठिकाणी चांगल्या दर्जाची इमारत बांधण्यात यावी यासाठी ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता़ ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर आदिवासी विकास विभागाने २०१६ मध्ये वसतीगृहासाठी ४ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करत बांधकाम सुरु केले होते़ चिंचपाडा गावात बांधकाम करण्यात आलेल्या या इमारतींचे बांधकाम २०१८ मध्ये पूर्ण झाले होते़ सुसज्ज अशी इमारत आकारास आल्यानंतर पालकांसह चिंचपाड्यातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले होते़ यानंतरही मात्र विद्यार्थिनींना प्रत्यक्ष अ‍ॅडमिशन देण्यास २०१९ हे वर्ष उजाडावे लागले होते़ सुरु झालेल्या या वसतीगृहात गेल्या वर्षी निवासी म्हणून आलेल्या विद्यार्थिनींना सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक भिंत उभाण्याची मागणी करण्यात आली होती़ यावर प्रत्यक्षात भिंत न बांधकाम आदिवासी विकास विभागाने थेट पत्र्याचे कंपांऊंड तयार केले आहे़ यातून वर्षभरापासून मोकाट गुरे आणि सुटीच्या काळात मद्यपी इमारत आवारात शिरत आहेत़ मद्यपींच्या धिंगाण्यामुळे या आवाराचे पावित्र्य धोक्यात आले आहे़कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास विलंब असला तरी कधीकाळी येथे विद्यार्थिनी येणारच आहेत़ यामुळे तातडीने संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरु करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे़७५ मुलींची क्षमता असलेल्या या वसतीगृहाच्या निर्मितीसाठी भरीव निधी मंजूर करण्यात आला असताना संरक्षक भिंतीचे बांधकाम गेल्या तीन वर्षांपासून रखडल्याचे सांगण्यात येत आहे़ भिंतीअभावी विद्यार्थिनींनी अनेक अडचणी येत असल्याचे त्यांच्याकडून गेल्या वर्षात सांगण्यात आले होते़ यावर तत्कालीन प्रकल्पाधिकारी यांनी भेट देऊन माहिती घेतली होती़ त्यानंतरही मात्र संरक्षक भिंतीचे काम रखडले असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़४गावापासून लांब अंतरावर असलेल्या या वसतीगृहात सुरक्षेचा प्रश्न असल्याने भिंत बांधण्याची मागणी आहे़४शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वसतीगृहाकडे जाण्यासाठी रस्ता निर्मिती करण्याचे आदेश होते़ परंतू प्रत्यक्षात तसे कामच सुरु झालेले नाही़४रखडलेल्या भिंतीबाबत आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क केला असता तो होवू शकलेला नाही़ याठिकाणी नियुक्तीस असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले आहे़४कोरोनाचा संसर्ग थांबल्यावर सुरु होणाºया शैक्षणिक वर्षात या वसतीगृहात मुलींच्या क्षमतेत वाढ करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ तत्पूर्वी वसतीगृहाच्या संरक्षक भिंतीचा प्रश्न निकाली काढण्याची गरज आहे़