सध्या दक्षा ह्या नंदुरबार तालुक्यात ग्राम विकास अधिकारी तर सुभाष हे एका राजकीय पक्षात पदाधिकारी म्हणून काम पाहतात.
दोघेही मूळचे नंदुरबार शहरातीलच, महाविद्यालयात शिकत असताना त्यांची एकमेकांसोबत ओळख झाली. आधी चांगले मित्र आणि मग नंतर प्रेमात रूपांतर झाले. दिवसामागून दिवस जात असताना दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. एकाच समाजाचे असल्याने घरचे संमती देतील, असा विश्वास होता. पण समाजात नोकरी असेल तर पुढे काहीतरी हालचाल होते. यात इथे मुलगी अर्थात दक्षा ह्या ग्रामसेविका म्हणून रुजू झालेल्या तर सुभाष यांनी राजकीय करियर करणे ठरवले होते. यातून घरच्यांमध्ये काहीशी नाराजी होती. अशावेळी दोघांनीही जवळच्या नातलगांना विश्वासात घेत विवाह करणार असल्याचे स्पष्ट सांगितले. घरच्यांनीही दोघांच्या समजूतदारपणाला हाक देत विवाह निश्चित केला. २०११ मध्ये दोघांचाही विवाह पार पडला आणि दोघांच्या प्रेमाचे रूपांतर संसारात झाले. आज १० वर्ष पूर्ण होत असताना दोघांमध्ये आजवर कधीच भांडण झाले नाही. दोघांच्या वाटा वेगळ्या असल्याने अडचणी येतात, पण अशावेळी मग समजदारीचे इंधन देत गाडी चालवा हा धडा दोघे एकमेकांना देतात.
याबाबत सुभाष यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, जाती पातीची बंधन तोडून असो किंवा एकाच समाजातील असो आपल्या प्रेमाची परिणीती ही विवाहात करताना अनेक जण आतातयीपणा करतात, आधी घरच्यांना सांगितले पाहिजे. अडचणी येतात पण सांमजस्य हा सर्वांवर मात करून यश देत, सुखी जीवनाचे हेच रहस्य आहे.