शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
3
टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र
4
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
5
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
6
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
7
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
8
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
9
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
10
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
11
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
12
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
13
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
14
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
15
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
16
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
17
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
18
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा
19
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
20
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत

ठेकेदार व पीडब्ल्यूडीने आणले जेरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 11:49 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाघेश्वरी चौफुली ते भोणे फाटय़ार्पयतचा रस्ता काँक्रीटीकरण केला जात असून ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वाघेश्वरी चौफुली ते भोणे फाटय़ार्पयतचा रस्ता काँक्रीटीकरण केला जात असून ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागानेही मनमानी चालविल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. कमरेएव्हढे खड्डे आणि गुढघ्याभर चिखलातून वाहनचालकांना वाट काढावी लागत आहे. खड्डे भरणे आवश्यक असतांना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या भागातील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे काँक्रीटीकरण केला जात आहे. एका बाजुचे काँक्रीटीकरण काम सुरू असल्यामुळे दुस:या भागाचा रस्ता रहदारीसाठी मोकळा आहे. परंतु याच रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. अक्षरश: जिवघेणी कसरत वाहनचालकांना करावी लागत आहे. पावसामुळे मोठे खड्डे पडले आहेत. चिखलाचाही थर साचला आहे. गुढघ्याभर चिखलातून वाहनचालक वाट काढत नाही तोच पुन्हा कमरेएवढय़ा खड्डय़ातून वाहन काढावे लागते. यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांचे मोठे हाल होत आहेत. खड्डे बुजविणे आणि गाळ जेसेबीने काढणे आवश्यक असतांना ठेकेदाराने अक्षरश: मनमानी कारभार चालविला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे देखील या ठेकेदारावर कुठलेही नियंत्रण नाही. ठेकेदार व पीडब्ल्यूडी विभाग यांनी संगनमत करूनच नागरिकांच्या व वाहनचालकांच्या जिवाशी खेळ सुरू ठेवला आहे. या रस्त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून भोणे फाटा, विश्वकर्मा मंदीर आणि तेथून व्ही.जी. पेट्रलपंप र्पयत पर्यायी रस्त्याने वाहतूक वळविण्यात आली. परंतु वाहतूक वळविण्याआधी भोणे फाटा ते विश्वकर्मा मंदीर र्पयतच्या रस्त्याची डागडुजी आणि आजूबाजू भराव करणे आवश्यक असतांना तसे न करता थेट वाहतूक वळवून दिली. त्यामुळे या रस्त्यावरून दोन वाहने जाणेही जिकरीचे ठरते. पर्यायी रस्ता तातडीने सुधारणा केली नाही आणि काम सुरू असलेल्या अध्र्या रस्त्याचे खड्डे भरले नाही आणि गाळ काढला नाही तर या भागातील नागरिक, व्यावसायिक तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

मुळात पावसाळ्यात काम सुरू करणेच चुकीचे होते. पावसाळ्यात रस्त्याचे काम करण्याचा हा अजब कारभार सध्या शहरवासी अनुभवत आहेत. नवापूर-विसरवाडी महामार्ग बंद असल्यामुळे या मार्गावरील जड वाहनांची वाहतूक नंदुरबारमार्गे वळविली आहे. वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे या रस्त्यावर जिवघेणे कसरत करावी लागत आहे. वाहतूक पोलिसांनी नियंत्रण ठेवणे आश्यक आहे.