शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

सुरत-भुसावळ पॅसेंजर बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  रोजगार कमावण्यासाठी गुजरात राज्यात स्थायिक झालेल्या कामगारांना वाहून नेणारी सुरत-भुसावळ पॅसेंजर गेल्या आठ महिन्यांपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  रोजगार कमावण्यासाठी गुजरात राज्यात स्थायिक झालेल्या कामगारांना वाहून नेणारी सुरत-भुसावळ पॅसेंजर गेल्या आठ महिन्यांपासून बंद आहेत. यामुळे गुजरातमधून महाराष्ट्रात येणा-या प्रवाशांना बसेसमधून प्रवास करावा लागत आहे.                उधना-जळगाव रेल्वेमार्गामुळे खान्देशासह विदर्भ आणि उत्तर भारतातील लाखो कामगार, मजूर व नोकरदार गुजरातमधील मोठ्या शहरात स्थिरावले आहेत. परंतू वर्षात किमान एकदा तसेच विविध सण, समारंभ आणि विवाह सोहळ्यांसह दु:खद प्रसंगाने हे नागरीक मूळ गावाकडे नक्की येतात. यासाठी त्यांना सुरत-भुसावळ या पॅसेंजर गाडीचा सर्वात मोठा आधार होता. यामुळे पॅसेंजर गाड्यांना वर्षभर गर्दी राहत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चनंतर या गाड्या बंद आहेत. कधी सुरू होणार याबाबत रेल्वेकडून माहिती देण्यात आलेली नसल्याने प्रवाशांचे हाल पुढेही सुरू राहणार आहेत. 

खान्देश एक्सप्रेस बंद           भुसावळ ते बांद्रा टर्मिनस असा प्रवास करणारी खान्देश एक्सप्रेसही बंद आहे. यातून मुंबई येथे जाणारे कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरीकांना रस्ता मार्गाने प्रवास करावा लागत आहेत. सोबतच अमरावती-सुरत पॅसेंजर बंद असल्याने विदर्भातून प्रवास करणा-यांचे हाल होत आहेत. 

सुरत-भुसावळ पॅसेंजरला सर्वाधिक पसंती                भुसावळ ते सुरत दरम्यान दिवसभरात आठ पॅसेंजर गाड्यांच्या फे-या होत होत्या. यातील प्रत्येक फेरीत प्रवाशांची गर्दी कायम होती. आठ महिन्यापासून या फे-या बंद असल्याने सुरत हून खान्देशात येणारे खाजगी वाहने व बसेसचा आधार घेत आहेत. 

गोरगरीबांना मोठा आर्थिक फटका              पॅसेंजर गाडीचे तिकीटाचे दर एसटी किंवा खाजगी वाहनापेक्षा अल्प आहेत. यातून त्यांचा कुटूंबासह गावापर्यंतचा प्रवास कमी खर्चात होत होता. परंतू पॅसेंजर गाड्या बंद असल्याने त्यांना जादा दराने तिकीटे काढून विशेष हिवाळी गाड्या आणि एसटीने प्रवास करावा लागत आहे. यातून त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. 

राज्य व केंद्र सरकारने पॅसेंजर गाड्या सुरू करण्यासाठी समन्वयाची भूमिका घेणे गरजेचे आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येत्या वर्षात याबाबत निर्णय घेवू शकतात.    गजेंद्र शिंपी, अध्यक्ष, प्रवासी संघटना