शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराने सहा महिन्यांत ३५९ बालकांचा मृत्यू

By मनोज शेलार | Updated: January 10, 2024 18:06 IST

जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३५९ बालक व २७ मातांचा मृत्यू झाला आहे.

नंदुरबार: जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३५९ बालक व २७ मातांचा मृत्यू झाला आहे. त्यातच अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या औषधांमध्ये अळी आढळून आल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतरही दोन दिवस औषधांचे वाटप झाल्याचा आरोप आमश्या पाडवी यांनी केला आहे. आदिवासी बालकांच्या जिवाशी खेळणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही आमदार पाडवी यांनी पत्रकार परिषदेत केली.

नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ढिसाळ झाली आहे. वारंवार मागणी करूनही चौकशी केली जात नाही. कुपोषण व बालमृत्यूबाबत विधान परिषदेत आवाज उठवूनही आरोग्यमंत्री जिल्ह्यात येत नाही ही शोकांतिका आहे. सहा महिन्यांतील बालकांचा मृत्यू व माता मृत्यू ही चिंतेची बाब असल्याचे आमदार पाडवी यांनी सांगितले. खापर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लहान मुलांच्या औषधांमध्ये अळ्या निघाल्या असल्याच्या धक्कादायक प्रकार घडला आहे. ६ जानेवारी रोजी सदरचा प्रकार घडल्यानंतरही संबंधित आरोग्य केंद्रात औषधांचे वाटप सुरूच होते. संबंधित कर्मचाऱ्यांनी औषधे वाटप थांबविणे अपेक्षित असताना बालकांच्या जिवाशी खेळ करण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रत्येक आरोग्य केंद्राला २०० प्रमाणे औषधे बाटल्यांचा पुरवठा झाल्याचे आ. पाडवी यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :nandurbar-acनंदुरबारDeathमृत्यू