शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराने सहा महिन्यांत ३५९ बालकांचा मृत्यू

By मनोज शेलार | Updated: January 10, 2024 18:06 IST

जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३५९ बालक व २७ मातांचा मृत्यू झाला आहे.

नंदुरबार: जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३५९ बालक व २७ मातांचा मृत्यू झाला आहे. त्यातच अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या औषधांमध्ये अळी आढळून आल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतरही दोन दिवस औषधांचे वाटप झाल्याचा आरोप आमश्या पाडवी यांनी केला आहे. आदिवासी बालकांच्या जिवाशी खेळणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही आमदार पाडवी यांनी पत्रकार परिषदेत केली.

नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ढिसाळ झाली आहे. वारंवार मागणी करूनही चौकशी केली जात नाही. कुपोषण व बालमृत्यूबाबत विधान परिषदेत आवाज उठवूनही आरोग्यमंत्री जिल्ह्यात येत नाही ही शोकांतिका आहे. सहा महिन्यांतील बालकांचा मृत्यू व माता मृत्यू ही चिंतेची बाब असल्याचे आमदार पाडवी यांनी सांगितले. खापर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लहान मुलांच्या औषधांमध्ये अळ्या निघाल्या असल्याच्या धक्कादायक प्रकार घडला आहे. ६ जानेवारी रोजी सदरचा प्रकार घडल्यानंतरही संबंधित आरोग्य केंद्रात औषधांचे वाटप सुरूच होते. संबंधित कर्मचाऱ्यांनी औषधे वाटप थांबविणे अपेक्षित असताना बालकांच्या जिवाशी खेळ करण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रत्येक आरोग्य केंद्राला २०० प्रमाणे औषधे बाटल्यांचा पुरवठा झाल्याचे आ. पाडवी यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :nandurbar-acनंदुरबारDeathमृत्यू