शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

मंडळ स्तरावर लावलेल्या पजर्न्यमापकांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 11:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी व त्या अनुषंगाने पीक व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात प्रत्येक मंडळ स्तरावर स्वयंचलित ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी व त्या अनुषंगाने पीक व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात प्रत्येक मंडळ स्तरावर स्वयंचलित पजर्न्यमापक व इतर उपकरणे बसविण्यात आली आहेत. पावसाळ्यापूर्वी या उपकरणांची देखभाल व दुरूस्ती होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात 36 मंडळ स्तरावर त्यांची उभारणी करण्यात आली असली तरी बहुतेक ठिकाणी केवळ पजर्न्यमापकच बसविण्यात आले आहे.  हवामान आधारीत फळपीक तसेच इतर पिकांचे नियोजन करण्याचे धोरण शासनाने तीन वर्षापासून राबविण्यास सुरुवात केली  आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीत होणारे नुकसान टाळणे, तसे नुकसान झाल्यास त्या भागातील हवामान त्या काळात कसे होते त्याची माहिती घेणे यासह शेतक:यांना हवामानाची पूर्वसुचना देणे हा उद्देश त्यामागे आहे. त्याअंतर्गतच मंडळ स्तरावर वेधशाळा उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु ते यशस्वी झाले नाही. 36 मंडळ स्तराची त्याकरीता निवड देखील करण्यात आली होती.  केवळ पजर्न्यमापकमिनी वेधशाळा स्वरूपात त्यांची उभारणी करण्यात येणार होती. अशा ठिकाणी हवेचा वेग, हवेची दिशा, वातावरणातील आद्रता, पावसाचे प्रमाण, तापमान यासह इतर बाबींची माहिती संकलीत होणार होती. ही सर्व उपकरणे संगणकाद्वारे उपग्रहाशी जोडली जावून ऑनलाईन डाटा हा महावेध या शासनाच्या अधिकृत केंद्रात संकलीत करण्याच्याही सुचना होत्या. त्यासंदर्भात कृषी विभागाने अध्यादेश काढून सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना सुचीत केले होते. यामुळे कुठल्या भागात वादळ होते, पाऊस किती झाला, तापमान किती राहिले, आद्रतेचे प्रमाण कसे होते, वादळ किंवा अवकाळी पावसाची शक्यता आहे काय? याची माहिती लागलीच मिळण्यास मदत होणार होती. याशिवाय मिळणा:या आकडेवारीवरून पूर्व अनुमान देखील काढण्याचे प्रस्तावीत होते. परंतु अशा ठिकाणी केवळ पजर्न्यमापक बसविण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ पावसाळ्याचे चार महिने पजर्न्यमानाची आकडेवारी मिळते.चार ठिकाणी सुरूसध्या चार ठिकाणी अशा प्रकारची उपकरणे कार्यान्वीत आहेत. त्यात नंदुरबार, नवापूर, तोरणमाळ आणि शहादा या ठिकाणांचा समावेश आहे. आता पुन्हा नव्याने 36 ठिकाणी झाल्यावर जिल्ह्यात एकुण 40 ठिकाणी ही सोय होणार आहे. हवामानाच्या माहितीसाठी उभारण्यात आलेल्या या चार ठिकाणी या उपकरणांना विजेची गरज नाही. उपकरणांना जोडलेल्या सौर बॅटरीद्वारे तेथे उर्जा निर्माण केली जाते. त्याद्वारेच उपकरणांमधील डाटा पाठविला जातो. त्यामुळे दुर्गम भागात देखील या उपकरणांकरीता विजेविना काही समस्या उद्भत नाही. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतक:यांना शासन आता कुठलेही अनुदान देत नाही. केवळ पीक विम्याद्वारे ती नुकसान भरपाई भरून मिळणार आहे. त्यामुळे विमा कंपनीकडून नुकसान भरपाई योग्य आणि पुरेशी मिळावी याकरीता या वेधशाळा उपकरणांकडून मिळणा:या अहवालाचाही उपयोग करण्यात येत आहे. या अहवालाद्वारेच त्या त्या भागातील पीक विमा मंजुर केला जात असतो.