शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
3
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
4
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
5
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
6
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
7
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
8
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
9
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
10
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
11
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
12
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
13
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
14
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
15
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
16
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
17
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
18
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
20
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

मंडळ स्तरावर लावलेल्या पजर्न्यमापकांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 11:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी व त्या अनुषंगाने पीक व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात प्रत्येक मंडळ स्तरावर स्वयंचलित ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी व त्या अनुषंगाने पीक व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात प्रत्येक मंडळ स्तरावर स्वयंचलित पजर्न्यमापक व इतर उपकरणे बसविण्यात आली आहेत. पावसाळ्यापूर्वी या उपकरणांची देखभाल व दुरूस्ती होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात 36 मंडळ स्तरावर त्यांची उभारणी करण्यात आली असली तरी बहुतेक ठिकाणी केवळ पजर्न्यमापकच बसविण्यात आले आहे.  हवामान आधारीत फळपीक तसेच इतर पिकांचे नियोजन करण्याचे धोरण शासनाने तीन वर्षापासून राबविण्यास सुरुवात केली  आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीत होणारे नुकसान टाळणे, तसे नुकसान झाल्यास त्या भागातील हवामान त्या काळात कसे होते त्याची माहिती घेणे यासह शेतक:यांना हवामानाची पूर्वसुचना देणे हा उद्देश त्यामागे आहे. त्याअंतर्गतच मंडळ स्तरावर वेधशाळा उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु ते यशस्वी झाले नाही. 36 मंडळ स्तराची त्याकरीता निवड देखील करण्यात आली होती.  केवळ पजर्न्यमापकमिनी वेधशाळा स्वरूपात त्यांची उभारणी करण्यात येणार होती. अशा ठिकाणी हवेचा वेग, हवेची दिशा, वातावरणातील आद्रता, पावसाचे प्रमाण, तापमान यासह इतर बाबींची माहिती संकलीत होणार होती. ही सर्व उपकरणे संगणकाद्वारे उपग्रहाशी जोडली जावून ऑनलाईन डाटा हा महावेध या शासनाच्या अधिकृत केंद्रात संकलीत करण्याच्याही सुचना होत्या. त्यासंदर्भात कृषी विभागाने अध्यादेश काढून सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना सुचीत केले होते. यामुळे कुठल्या भागात वादळ होते, पाऊस किती झाला, तापमान किती राहिले, आद्रतेचे प्रमाण कसे होते, वादळ किंवा अवकाळी पावसाची शक्यता आहे काय? याची माहिती लागलीच मिळण्यास मदत होणार होती. याशिवाय मिळणा:या आकडेवारीवरून पूर्व अनुमान देखील काढण्याचे प्रस्तावीत होते. परंतु अशा ठिकाणी केवळ पजर्न्यमापक बसविण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ पावसाळ्याचे चार महिने पजर्न्यमानाची आकडेवारी मिळते.चार ठिकाणी सुरूसध्या चार ठिकाणी अशा प्रकारची उपकरणे कार्यान्वीत आहेत. त्यात नंदुरबार, नवापूर, तोरणमाळ आणि शहादा या ठिकाणांचा समावेश आहे. आता पुन्हा नव्याने 36 ठिकाणी झाल्यावर जिल्ह्यात एकुण 40 ठिकाणी ही सोय होणार आहे. हवामानाच्या माहितीसाठी उभारण्यात आलेल्या या चार ठिकाणी या उपकरणांना विजेची गरज नाही. उपकरणांना जोडलेल्या सौर बॅटरीद्वारे तेथे उर्जा निर्माण केली जाते. त्याद्वारेच उपकरणांमधील डाटा पाठविला जातो. त्यामुळे दुर्गम भागात देखील या उपकरणांकरीता विजेविना काही समस्या उद्भत नाही. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतक:यांना शासन आता कुठलेही अनुदान देत नाही. केवळ पीक विम्याद्वारे ती नुकसान भरपाई भरून मिळणार आहे. त्यामुळे विमा कंपनीकडून नुकसान भरपाई योग्य आणि पुरेशी मिळावी याकरीता या वेधशाळा उपकरणांकडून मिळणा:या अहवालाचाही उपयोग करण्यात येत आहे. या अहवालाद्वारेच त्या त्या भागातील पीक विमा मंजुर केला जात असतो.