शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

पाणी देता येत नसेल तर किमान गाढवं तरी उपलब्ध करून द्या, ग्रामस्थांची मागणी

By मनोज शेलार | Updated: January 26, 2024 10:06 IST

प्रशासनाला जर पाणी देणे शक्य नसेल तर पाणी वाहून नेण्यासाठी किमान गाढवं तरी पुरवावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. 

नंदुरबार : पाणी नाही तर किमान दऱ्याखोऱ्यातून पाणी आणण्यासाठी गाढवं तरी द्या अशी आर्त मागणी नर्मदा काठावरील अतिदुर्गम भागातील तिनसमाळ भागातील ग्रामस्थांनी केली आहे.

दुर्गम भागात असलेल्या तिनसमाळ येथे जाण्यासाठी धड रस्ता नाही. पाणी योजना नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागते. जवळच नर्मदा नदीचे बॅकवॉटर असले तरी ते पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे दऱ्याखोऱ्यातील झऱ्यांमधून, नदीतून पाणी आणावे लागते. रस्ते नसल्याने पायी किंवा गाढवावरून पाणी आणावे लागते. प्रशासनाला जर पाणी देणे शक्य नसेल तर पाणी वाहून नेण्यासाठी किमान गाढवं तरी पुरवावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. 

या भागात जंगल व घाटाचा भाग असल्यामुळे हिंस्र प्राण्यांचा या परिसरात वावर आहे. मागील काही वर्षांत पाणी घेण्यासाठी गेलेल्या दोन मुले व एक वृद्धावर बिबट्याने हल्ला केला होता. मागील एक वर्षांपासून मनरेगा योजनेतून वैयक्तिक सिंचन विहिरीची मागणी केली आहे; परंतु, मंजुरी मिळत नसल्यामुळे योजनेपासून गाव वंचित आहे. गावपाड्यात एकही शासनाची विहीर किंवा इतर सुविधा नाही. प्रत्येक पाड्यातील रहिवासी दरी-खोऱ्यातून मिळेल तेथून पाणी आणून वापरतात.

टॅग्स :Waterपाणी