शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आश्रम शाळांचा निकाल कमी लागल्यास शिक्षकांच्या एक-दोन पगारवाढ रद्द

By मनोज शेलार | Updated: August 20, 2023 18:17 IST

शासकीय आदिवासी आश्रम शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी विभागातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत.

मनोज शेलार

नंदुरबार : शासकीय आदिवासी आश्रमशाळांमधील त्या त्या वर्गाचा निकाल कमी लागल्यास त्या शिक्षकांची एक किंवा दोन पगारवाढ रद्द करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी हा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी त्यास दुजोरा दिला आहे. 

शासकीय आदिवासी आश्रम शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी विभागातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. परंतु, गुणवत्ता सुधारणा होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे आता थेट शिक्षकांनाच जबाबदार धरण्याचे धोरण आदिवासी विकास विभागाने ठरविले आहे. याबाबत माहिती देताना आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. ज्या वर्गाचा निकाल ५० टक्क्यांपेक्षा कमी लागेल त्या वर्गातील शिक्षकांची दोन इन्क्रीमेंट अर्थात पगारवाढ रद्द करण्यात येईल. ५० ते ८० टक्केपर्यंत निकाल लागल्यास एक पगारवाढ रद्द केली जाणार आहे.

याशिवाय गुणवत्ता सुधार उपक्रमांतर्गतच शिक्षकांची दर तीन ते सहा महिन्यात त्यांच्या विषयाची परीक्षा घेतली जाणार आहे. जे शिक्षक त्यात कमी पडतील, त्यांना प्रशिक्षित केले जाणार असल्याचेही डॉ. गावित यांनी सांगितले. दरम्यान, आश्रमशाळांची बदललेली वेळ कुठल्या परिस्थितीत पूर्वीप्रमाणे केली जाणार नाही. सर्व अभ्यास करूनच आश्रमशाळांच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे. शिक्षक संघटनांनी मोर्चा काढण्याच्या आणि आंदोलने करण्याचा इशारा दिला आहे. परंतु, आदिवासी विकास विभाग आपल्या निर्णयावर ठाम राहणार असल्याचेही आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

टॅग्स :Vijaykumar Gavitविजय गावीतSchoolशाळा