शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २३ हजार लाभार्थींची घरे अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST

नंदुरबार : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षात एकूण ३८ हजार ५८२ घरे पूर्ण झाली आहेत. या लाभार्थींची सोय ...

नंदुरबार : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षात एकूण ३८ हजार ५८२ घरे पूर्ण झाली आहेत. या लाभार्थींची सोय झाली असली तरी योजनेत अद्याप २३ हजार लाभार्थींची घरे अपूर्ण आहेत. या लाभार्थींना पहिला, दुसरा, तिसरा किंवा चाैथा हप्ता न मिळाल्याने त्यांना अडचणी येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने २०१६ - १७ या वर्षात १२ हजार ६३४ घरांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. पण, १६ हजार ७२७ लाभार्थींची नोंदणी होऊन ११ हजार ६४७ जणांची घरे पूर्ण झाली होती. या वर्षात केवळ ९८७ घरे अपूर्ण होती. २०१७-१८ या वर्षातही १५ हजार ६०१ घरांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट होते. १४ हजार २८० घरे या वर्षात पूर्ण करण्यात आल्याने १ हजार ३२१ घरे अपूर्ण होती. २०१८ - १९ या वर्षात १० हजार ३४७ पैकी ८ हजार ८८० घरे पूर्ण करण्यात आल्याने १ हजार ५०७ घरे अपूर्ण होती. एकीकडे तीन वर्षात घरांचे उद्दिष्ट अधिक प्रगतपणे पूर्ण करण्यात आल्याने २०१९ - २० या वर्षात ५० हजार ८२० उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. दरम्यान, यातून ३० हजार ८५८ घरांचे उद्दिष्ट पूर्ण झाले असले तरी अद्याप १९ हजार ९६२ घरांची कामे अपूर्ण आहेत. चार वर्षांच्या काळात २३ हजार ७७७ घरे अपूर्ण राहिल्याने त्याचा फटका थेट लाभार्थींना बसला आहे. दरम्यान गेल्या वर्षाचे उद्दीष्ट्य पूर्ण करण्यासाठी यंदा वेगात काम सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात २०१६-१७ ते २०२०-२१ या वर्षात ८९ हजार ८६ जणांना घरकुल योजनांचा लाभ मिळाला आहे. यातील ८८ हजार १४७ जणांना घरकुलाचा पहिला हप्ताही मंजूर झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. अद्यापही जिल्ह्यात २३ हजार ७७७ जणांना घरकुला योजनेतून दीड लाख रुपयांचे अनुदान मिळणे शिल्लक आहे.

२०१९-२० या वर्षात अक्कलकुवा तालुक्यात ४ हजार, धडगाव ३ हजार ८६२, नवापूर ४ हजार, शहादा ४ हजार तर तळोदा तालुक्यात अडीच हजार घरकुले अपूर्ण असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनामुळे झालेले लाॅकडाऊन या लाभार्थींना अडचणीचे ठरले असल्याचे सांगण्यात आले असून चालू वर्षात या लाभार्थींना निधीचे वितरण करणे सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून देण्यात आली आहे.