शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

संपूर्ण विश्व कोरोनामुक्त व्हावा, अशी प्रार्थना करत पेटवली गेली काठीची राजवाडी होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:31 IST

आदीवासींमध्ये होळी पूजन होत होऊन होळी पेटत नाही, तोपर्यंत पाळणी (नवस) धारकांच्या मनात होळी उत्सवविषयी श्रद्धाभाव ठेवून वर्षभर वावरत ...

आदीवासींमध्ये होळी पूजन होत होऊन होळी पेटत नाही, तोपर्यंत पाळणी (नवस) धारकांच्या मनात होळी उत्सवविषयी श्रद्धाभाव ठेवून वर्षभर वावरत असतो. आपल्या हातून कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य होणार नाही आणि कुणाचेही मन दुखवणार नाही, याची काळजी घेत असतात. पाळणीला (नवस) प्रारंभ करतात तेव्हापासून पाळणी (नवस) पूर्ण होईपर्यंत ८ ते १० दिवस पायात चप्पल न घालणे, खाटेवर न बसणे, दिवसातून दोन वेळा नदीवर जाऊन आंघोळ करणे अशा अनेक गोष्टीचे काटेकोरपणे पालन पाळणी धारक करतात. श्रद्धा भाव ठेवून केलेला नवस बुधया बावा ढाणका ढोखो रूपात वेषभूषा परिधान करून निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाशी एकरूप होत पौर्णिमेचा चंद्राच्या प्रकाशात रात्रभर वातावरणात घुंगराचा आवाजात आणि डफाचा तालावर नाचताना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत यंदाचा होलिकोत्सव साजरा केला.

दरवर्षी काठीच्या होलिका उत्सवात सहभागी होण्यासाठी हजारो भाविक दूरदुरून येत होते. मात्र यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आदिवासींनी आपल्या भागात गावपाड्यात शांततामय वातावरणात साजरी केली. दरवर्षीचा तुलनेत यावर्षी उत्सवात भाविकांचे प्रमाण तुरळक होते. काठी संस्थानच्या कुटुंब तसेच ग्रामस्थांमध्ये होळी उत्सवाची उत्सुकता दिसून येत होती. कामानिमित्त स्थंलातर झालेल्या व होळी उत्सवाचे विक्रेत्यांना गावाकडे न येण्याचे आवाहन केल्याने गावपाड्याकडे कोणताही स्थंलातरित नागरिक, व्यावसायिक फिरकले नाही.

कोरोना महामारीचे संकट घालवण्यासाठी सर्व नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन वारंवार गेल्या १५ दिवसांपासून मोलगी येथील सहायक निरीक्षक धनराज निळे यांनी केले असून. यांच्यासह महेश क्षीरसागर, जिल्हा परिषद सदस्य सी. के. पाडवी. पोलीसपाटील रणजित पाडवी, सरपंच स्नेहा जितेंद्र पाडवी,उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, सागर पाडवी, राजेन्द्र पाडवी, शेरसिंग पाडवी, करणसिंग पाडवी, गणपत पाडवी यांनी गावात बैठका घेऊन ग्रामस्थांशी विचार विनिमय करून सर्वांच्या मते साध्या पध्दतीने व विधीवत पूजा करून शांततामय वातावरणात यंदाचा होलिकोत्सव साजरा केला. अक्कलकुवा, धडगाव तालुक्यातील परिसरातील नागरिकांनी यंदा कोरोना प्रतिबधंक नियमांचे पालन करून होलिकोत्सव साजरा करण्यात आला. या होळी उत्सव गेल्या वर्षाप्रमाणे साजरा करता न आल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.