शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

संपूर्ण विश्व कोरोनामुक्त व्हावा, अशी प्रार्थना करत पेटवली गेली काठीची राजवाडी होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:31 IST

आदीवासींमध्ये होळी पूजन होत होऊन होळी पेटत नाही, तोपर्यंत पाळणी (नवस) धारकांच्या मनात होळी उत्सवविषयी श्रद्धाभाव ठेवून वर्षभर वावरत ...

आदीवासींमध्ये होळी पूजन होत होऊन होळी पेटत नाही, तोपर्यंत पाळणी (नवस) धारकांच्या मनात होळी उत्सवविषयी श्रद्धाभाव ठेवून वर्षभर वावरत असतो. आपल्या हातून कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य होणार नाही आणि कुणाचेही मन दुखवणार नाही, याची काळजी घेत असतात. पाळणीला (नवस) प्रारंभ करतात तेव्हापासून पाळणी (नवस) पूर्ण होईपर्यंत ८ ते १० दिवस पायात चप्पल न घालणे, खाटेवर न बसणे, दिवसातून दोन वेळा नदीवर जाऊन आंघोळ करणे अशा अनेक गोष्टीचे काटेकोरपणे पालन पाळणी धारक करतात. श्रद्धा भाव ठेवून केलेला नवस बुधया बावा ढाणका ढोखो रूपात वेषभूषा परिधान करून निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाशी एकरूप होत पौर्णिमेचा चंद्राच्या प्रकाशात रात्रभर वातावरणात घुंगराचा आवाजात आणि डफाचा तालावर नाचताना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत यंदाचा होलिकोत्सव साजरा केला.

दरवर्षी काठीच्या होलिका उत्सवात सहभागी होण्यासाठी हजारो भाविक दूरदुरून येत होते. मात्र यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आदिवासींनी आपल्या भागात गावपाड्यात शांततामय वातावरणात साजरी केली. दरवर्षीचा तुलनेत यावर्षी उत्सवात भाविकांचे प्रमाण तुरळक होते. काठी संस्थानच्या कुटुंब तसेच ग्रामस्थांमध्ये होळी उत्सवाची उत्सुकता दिसून येत होती. कामानिमित्त स्थंलातर झालेल्या व होळी उत्सवाचे विक्रेत्यांना गावाकडे न येण्याचे आवाहन केल्याने गावपाड्याकडे कोणताही स्थंलातरित नागरिक, व्यावसायिक फिरकले नाही.

कोरोना महामारीचे संकट घालवण्यासाठी सर्व नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन वारंवार गेल्या १५ दिवसांपासून मोलगी येथील सहायक निरीक्षक धनराज निळे यांनी केले असून. यांच्यासह महेश क्षीरसागर, जिल्हा परिषद सदस्य सी. के. पाडवी. पोलीसपाटील रणजित पाडवी, सरपंच स्नेहा जितेंद्र पाडवी,उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, सागर पाडवी, राजेन्द्र पाडवी, शेरसिंग पाडवी, करणसिंग पाडवी, गणपत पाडवी यांनी गावात बैठका घेऊन ग्रामस्थांशी विचार विनिमय करून सर्वांच्या मते साध्या पध्दतीने व विधीवत पूजा करून शांततामय वातावरणात यंदाचा होलिकोत्सव साजरा केला. अक्कलकुवा, धडगाव तालुक्यातील परिसरातील नागरिकांनी यंदा कोरोना प्रतिबधंक नियमांचे पालन करून होलिकोत्सव साजरा करण्यात आला. या होळी उत्सव गेल्या वर्षाप्रमाणे साजरा करता न आल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.