शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
4
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
5
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
6
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
7
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
8
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
9
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
10
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
11
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
12
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
13
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
14
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
15
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
16
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
18
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
19
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
20
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या

पालकमंत्री, आमदार आणि अधिकारी शेतक:यांच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी रविवारी शहादा तालुक्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी रविवारी शहादा तालुक्यात भेट दिली़ यावेळी त्यांच्यासोबत आमदार, प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकारी हजर होत़े शेतक:यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री आमदार व अधिका:यांनी भेट देत नुकसानीची पाहणी केली़      शहादा तालुक्यातील विविध गावांमध्ये दिलेल्या भेटीनंतर पालकमंत्री रावल यांनी सारंगखेडा ता़ शहादा येथे घेतलेल्या आढावा बैठकीत अधिका:यांना सूचना करुन येत्या शुक्रवार्पयत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिल़े पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर शासनाकडे पिकनिहाय नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे सांगून नुकसानीची तात्काळ भरपाई देण्याची कारवाई होणार असल्याचे सांगितल़े रविवारी झालेल्या या पाहणी दौ:यावेळी  आमदार राजेश पाडवी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, सहायक जिल्हाधिकारी अविनाश पांडा, नंदुरबारच्या प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील, जिल्हा परिषद सदस्य जयपालसिंह रावल, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. एन. पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार मिलींद कुलकर्णी, क़ेडी़पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ़ किशोर पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी व्ही़बी़ जोशी यांच्यासह सर्व तहसीलदार, कृषी, महसूल विभाग, बँका आणि सहकारी संस्थांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री रावल यांनी शहादा तालुक्यातील कळंबू, अनरद, वरूळ, मंदाणे, डोंगरगाव, दुधखेडायेथील शेतशिवारात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतक:यांसोबत संवाद साधला़ शेतक:यांनी पिकांची स्थिती सांगून भरपाईची मागणी केली़ 

सारंगखेडा येथील दत्त मंदिर सभागृहात पालकमंत्री रावल यांनी आढावा बैठक घेतली़ यात महसूल आणि कृषी विभागाच्या अधिका:यांनी शुक्रवार्पयत पंचनामे पूर्ण करुन भरपाईचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या, तसेच पाच दिवसात पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर शनिवारी ग्रामसभा घेऊन चावडी वाचन करण्याचे सूचित केल़े चावडी वाचनाचा अहवाल 10 रोजी द्यावा, पिकनिहाय पंचनामे करावे, विमा कंपन्यांनी शेतक:यांना लाभ द्यावा, तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात कृषी, ग्रामविकास, महसूल अशा अधिकारी कर्मचा:यांची पथके तयार पंचनाम्यांना गती देण्याचे पालकमंत्री रावल यांनी बैठकीत सांगितल़े तसेच जिल्हाधिकारी यांनी पंचनाम्यांचा दैनंदिन आढावा घेण्याबाबतही ते शवेटी म्हणाल़े बैठकीत उपस्थित विभागप्रमुखांनी अतीवृष्टी आणि अवकाळी पावसाची आकडेवारी सादर करुन नुकसानीचा आढावा आकडेवारीच्या स्वरुपात सांगितला़ बैठकीत अधिका:यांसोबतच शेतकरी व ग्रामस्थांनी हजेरी लावली होती़ यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचे पैसेच खात्यावर मिळाले नसल्याची तक्रार केली़ यावेळी अधिका:यांनी सारावासारव करत वेळ मारुन नेली़ दरम्यान पालकमंत्री रावल यांनी तहसीलदारांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना केल्या़