शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

शेतक-यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 17:10 IST

शेतकरी संघटनेचा आरोप : विविध मागण्यांचे निवेदन

ठळक मुद्देआठ महिने कांदा साठवूनही मातीमोल भावाने कांदा विकण्याची वेळ शासनाच्या धोरणामुळे आली असल्याची चर्चा शेतकरी करत आहेत.

येवला : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा भावाने निचांक गाठला असून २५० रूपये प्रतिक्विंटल भाव कांद्याला मिळाला आहे. दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी उद्धवस्त झाला असून शेतक-यांच्या आत्महत्यांची संख्या वेगाने वाढते आहे. मात्र, केंद्र आणि राज्य सरकार पाच राज्यातील निवडणूक प्रचारात व्यस्त आहे शिवाय, राम मंदिर, आरक्षण या विषयांमुळे शेतीमाल भावाचा प्रश्न बाजूला पडला असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला असून शेतक-यांनी विकलेल्या मालावर त्वरित अनुदान जाहिर करावे व फरकाची रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे तहसीलदार रोहिदास वारूळे यांच्याकडे केली आहे.निवेदनात म्हटले आहे, मागील वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाला होता. आलेला पैसा चाळ बांधण्यात खर्च झाला. आठ महिने कांदा साठवूनही मातीमोल भावाने कांदा विकण्याची वेळ शासनाच्या धोरणामुळे आली असल्याची चर्चा शेतकरी करत आहेत. केंद्र आणि राज्य शासनाने त्वरित आयात निर्यात धोरणात सुधारणा करून शेतक-यांना योग्य भाव मिळवून द्यावा आणि बाजारात नव्याने येत असलेल्या नविन लाल कांद्यालाही भाव मिळण्यासाठी उपाय योजना करावी. शासनाने दखल घेऊन कांदा उत्पादक शेतक-यांना उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. या प्रसंगी शेतकरी संघटनेचे नेते संतु पाटील झांबरे, बापूसाहेब पगारे, अरूण जाधव, योगेश सोमवंशी, बाळासाहेब गायकवाड, सुभाष सोनवणे, विठ्ठल वाळके, हरिभाऊ पवार, योगेश गायकवाड, संजय पाटील, मधुकर देशमुख, सतिश पाटील यांचेसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.शेतक-यांमध्ये नाराजीचा सूरयंदा दुष्काळी परिस्थिती असताना शेतक-यांनी ठिबक सिंचन, तुषार सिंचन करून, प्रसंगी टॅकरने पाणी विकत घेऊन कांदा जगवला. मात्र त्यालाही भाव मिळत नसल्याने शेतक-यांमध्ये सरकार विरोधी नाराजीची भावना व्यक्त होत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास शेतक-यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा