शहरं
Join us  
Trending Stories
1
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
2
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
3
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
4
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
5
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
6
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
7
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
8
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
9
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
10
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
11
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
12
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
13
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
14
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
15
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
16
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
17
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
18
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
19
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
20
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

गडदाणीला दोन बिबट्यांची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर / विसरवाडी :  तालुक्यातील चिंचपाड्याच्या वनक्षेत्रातील गडदाणी जंगलात दोन बिबट्यांची निर्घुणपणे शिकार करण्यात आल्याचे आढळून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर / विसरवाडी :  तालुक्यातील चिंचपाड्याच्या वनक्षेत्रातील गडदाणी जंगलात दोन बिबट्यांची निर्घुणपणे शिकार करण्यात आल्याचे आढळून आले. या वेळी मेलेल्या पशुंच्या मासमध्ये विषप्रयोग करुन बिबट्यांची शिकार करण्यात आल्याचा संशय वनविभागाला आहे. याप्रकरणी सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. शिकारीनंतर या दोन्ही बिबट्यांचे मोठे दात, मिश्या त्यांचे चारही पंजे कापून काढण्यात आलेले आहेत.बिबट्याचे अवशेष दोन संशयित आरोपीचा घरात आढळून आले. या प्रकरणी अजूनही काही बिबट्यांची शिकार झाली आहे का? याचा शोध वनविभागाकडून केला जात आहे. त्यासाठी विशेष शोधमोहीम विसरवाडी पोलिसांच्या मदतीने राबवली जात आहे. द्वेष भावनेतून या दोन्ही बिबट्यांची शिकार केल्याचा संशय वन विभागाने व्यक्त केला आहे.एक सात वर्षीय बिबट्या १५ दिवसापूर्वी मारून बिबट्याला जमिनीत पुरविण्यात आले होते. त्यांला रविवारी बाहेर काढले असता कुजलेल्या अवस्थेत सांगाडा मिळून आला. यासंदर्भात वनविभागाने चार संशयितांची धरपकड करण्यात आली आहे. त्यावर रविवारी घटनास्थळी पंचनामा करून अंतिम संस्कार करण्यात आले. संशयित आरोपीकडून चौकशी केली असता दुसरा बिबट्या मृतक अवस्थेत जमिनीत पुरला असल्याची माहिती समोर आली. या बिबट्याचे चारही पंजे तोडलेले दिसून आले. या बिबट्यास वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाहेर काढून त्याचा पशुधन व महसूल कर्मचाऱ्यांच्या समक्ष पंचनामा करून अग्निदाग देण्यात आला.  तिसराही बिबट्या मेलेला असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. परंतु वनविभागाला तिसरा बिबट्या मिळून आला नाही. दोन बिबटे मेल्याची माहिती दिली आहे. याबाबत वन विभागाने शोध  मोहीम सुरू केली असून, त्यांचा मृत्यू नैसर्गिक झाला की, शिकाराने हे अजून कळू शकेल नाही, अशी माहिती वनअधिकारी आर.बी. पवार यांनी दिली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी शवविच्छेदन करून अहवाल आल्यावर निष्पण होईल असे सांगितले. यासंदर्भात काल सहा संशयित आरोपीची धरपकड करण्यात आली.नवापूर तालुक्यातील गडदाणीच्या जंगलात बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता. या बिबट्यांनी अनेक पशुधन फस्त केल्याची माहिती स्थानिकानी दिली. तसेच काही लोकांनी मेलेल्या पशुच्या मासमध्ये विषारी औषध टाकून बिबट्यांना मारण्यात  आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.  यासंदर्भात उप वनसंरक्षक सुरेश कवटे, सहायक वनसंरक्षक डी.जी. पवार, वनक्षेत्रपाल चिंचपाडा आर.बी. पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पशुधन अधिकारी डॉ.योगेश गावीत, मंडळधिकारी बी.एन. सोनवणे, तलाठी जी.एस. तडवी, नवापूर, चिंचपाडा, शहादा, नंदुरबार वनविभागाचे ५० हून अधिक कर्मचारीवर्ग घटनास्थळी दाखल  होते. वन विभागाची जंगलात शोध मोहीम सुरू आहे. वन्य जीव, वन्य प्राण्यांचा सुरक्षिततेसाठी नवापूर तालुक्यातील नवापूर व चिंचपाडा वन विभागाने जंगलात गस्त घालण्याची गरज आहे.