लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा वार्षीक योजनेचा २०१६-१७ मधील १९ कोटी ७६ लाख चार हजार एवढा अखर्चीत निधी मार्च २०२० अखेर खर्च करण्याची अखेर राज्य शासनाने मान्यता दिली आहे. हा खर्च शासन समर्पित होण्याची शक्यता निर्माण झाली होती.जिल्हा वार्षीक योजनेअंतर्गत आदिवासी घटक कार्यक्रमासाठी २०१६-१७ मध्ये मोठ्या प्रमाणावर निधी मंजुर करण्यात आला होता. त्यावेळी तब्बल १९ कोटी ७६ लाख चार हजार रुपयांचा निधी अखर्चित राहिला होता. हा निधी शासन समर्पितही झाला नव्हता आणि पुन्हा जिल्हा वार्षीक योजनेत देखील समावेश झाला नव्हता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा निधी खर्चास मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू होता. परंतु शासनाकडून अपेक्षीत प्रतिसाद मिळत नव्हता. आता शासनाने एक विशेष बाब म्हणून हा निधी ३१ मार्च २०२० अखेर खर्च करण्यास मान्यता दिली आहे.आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत योजेनत तो खर्च होणार आहे. शासन समर्पित होणारा निधी परत मिळाल्याने आता दीड महिन्यात तो खर्च करावा लागणार आहे. तसे आदेश राज्य शासनाच उपसचिव वि.फ.वसावे यांनी काढले आहेत.
शासन समर्पीत होणारा निधी अखेर मिळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:21 IST