शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

ओसाड डोंगरात फुलवली फळबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 3:16 PM

कुंभरी येथील पटले कुटुंबाची किमया : 1700 फूट अंतरावरून झ:यातून आणले पाणी

तळोदा : डोंगरावरील नैसर्गिक झ:यात एक हजार 700 फूट लांब नळी टाकून या पाण्यातून वनपट्टय़ात आंबे, पेरू, सिताफळ या फळबागा फुलविण्याची किमया सातपुडय़ातील आदिवासी पटले कुटुंबाने केली आहे. त्यांच्या अथक परिश्रमातून ओसाड डोंगरात हिरवं नंदनवनच फुलल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे उंच डोंगरातील त्यांचे पाणी व्यवस्थापन खरोखरच कौतुकास्पद आहे.सातपुडय़ातील कुंभरी हे 300 लोकवसती असलेल छोटसं गाव. वनविभागाच्या हद्दीत असल्यामुळे शासनाकडून मिळालेल्या वनपट्टय़ावरच त्यांना आपला उदरनिर्वाह करावा लागत असतो. त्यातील 100 जणांना शासनाकडून सामूहिक वनपट्टे मिळाली असल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले. डोंगरावरील मिळालेल्या सामूहिक वनपट्टय़ात लावण्यासाठी गेल्या वर्षी जून महिन्यात जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते साधारण दीड ते दोन हजार आंबा, पेरू, सिताफळ, बोर, महू, साग अशी रोपे मिळाली होती. ही सगळी रोपे राजा बोरखा पटले, सोमा बोरखा पटले या बंधूंनीदेखील आपल्याला मिळालेल्या वनपट्टय़ात लावली. तथापि, ही रोपे जगविण्यासाठी त्यांच्यापुढे पाण्याचा यक्ष प्रश्न होता. कारण मिळालेला वनपट्टादेखील उंच टेकडीवरच आहे. त्यामुळे साहजिकच पाणी पोहचणे अशक्य होते. मात्र त्यांच्यातील मेहनत त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी त्यांच्या शेतापासून एक हजार 700 फूट लांब उंचीवरील नैसर्गिक झ:याचे पाणी आणण्याची युक्ती लढविली. या झ:याच्या ठिकाणी मोठी विहीर खोदून तेथून तेवढय़ाच लांबीची नळी टाकून या नळीद्वारे दररोज झाडांना पाणी घालत आहेत. जवळपास दीड वर्षाची ही फळबाग झाली आहे. आंबे 250, पेरू 230, बोर 250, सिताफळ 250 या फळ पिकांबरोबरच महू 150, साग 100 व साग 250 अशी साधारण दीड-दोन हजार झाडे जगविली आहेत. त्यामुळे ओसाड रानावर हिरवे नंदनवन फुलविण्याची किमया या पटले बंधूंनी  केली आहे. विशेष म्हणजे पाण्याचे सुयोग्य नियोजन आणि व्यवस्थापनातून आपल्या वनपट्टय़ात मेथी, टमाटर, वांगे, मिरची व वालपापडी या सारखी भाजी पाल्याची आंतरपिकेदेखील ते घेत आहेत. त्याच्या विक्रीतून ते आपला उदरनिर्वाह करीत आहेत. सातपुडय़ातील झ:याच्या पाणी व्यवस्थापनासाठी त्यांना साधारण 25 हजार रुपये खर्च आल्याचे या शेतक:यांनी सांगितले. या पैशातून 20 फुटाचे 90 पाईप लागल्याचे ते म्हणाले. छोटय़ाशा पाण्याच्या स्त्रोतात एकही थेंब वाया न जावू               देता प्रत्येक झाडाला आपल्या               अथक प्रय}ातून पाणी पुरवित असल्याचेही सेगा पटले सांगतात.पर्यावरण बचावाच्या नावाखाली वार्षानुवर्षे द:याखो:यात, जंगलात राबणा:या आदिवासी शेतक:यांना शेतक:यांचा दर्जा नाकारला जात असतांना पटले बंधूंनी आपल्या कौशल्यातून ओसाड, खडकाळ टेकडीवर फळबाग लावून हिरवे नंदनवन फुलविण्याची किमया साधली आहे. एकीकडे वृक्ष         लागवड आणि संगोपनासाठी वनविभाग करोडो रुपये खर्च करूनही सातपुडा अजून हरित झाला        नसल्याचे चित्र आहे. मात्र कुंभरीकरांनी कमी खर्चात आपला परिसर हरित करून दाखविला. त्यामुळे या गावक:यांचे परिसरात कौतुक केले जात आहे.