शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
4
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
5
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
6
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
7
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
8
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
9
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
10
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
11
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
12
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
13
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
14
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
15
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
16
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
17
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
18
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
19
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
20
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग

शाळांचा पहिला आठवडा गेला विद्यार्थीविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:09 IST

नंदुरबार : पाचवी ते आठवीच्या वर्गाचा पहिला आठवडा हा जेमतेमच गेला. अवघी १५ टक्केच्या आतच उपस्थिती राहिली. या आठवड्यात ...

नंदुरबार : पाचवी ते आठवीच्या वर्गाचा पहिला आठवडा हा जेमतेमच गेला. अवघी १५ टक्केच्या आतच उपस्थिती राहिली. या आठवड्यात विद्यार्थी उपस्थिती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी शाळेतर्फे पालकांना आवाहन करण्यात येत आहे. या आठवड्यात किमान ३५ ते ४० टक्के उपस्थिती राहावी, असे नियोजन शिक्षण विभागाचे देखील आहे. दरम्यान, पालकांकडून संमतीपत्र भरून घेतले जात आहे. दुसरीकडे पालकांना विद्यार्थ्यांचा गणवेश, शालेय साहित्य खरेदीसाठीचा आर्थिक भुर्दंड बसत आहे.

बुधवार, २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या वर्गांना सुरुवात झाली. आधी अर्थात २३ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात नववी ते १२ वीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यातील उपस्थिती देखील ४० टक्केच्या वर पोहचू शकली नाही. त्यातच आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या वर्गांमध्ये विद्यार्थी उपस्थिती कशी आणि किती राहते याबाबत उत्सुकता आहे.

पहिल्या दिवशी दहा टक्के उपस्थिती

शाळेच्या पहिल्या दिवशी अर्थात २७ जानेवारी रोजी शाळेतील विद्यार्थी उपस्थिती अवघी दहा टक्के होती. ती चार दिवसात दोन ते तीन टक्केच वाढली आहे. त्यामुळे १५ टक्केच्या वर उपस्थिती जाऊ शकली नाही. त्याला विविध कारणे असली तरी पालकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी अजूनही प्रयत्नांची गरज असल्याचे चित्र आहे.

पालकांमध्ये भीती कायम

कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालकांमध्ये अद्यापही भीती आहे. त्यामुळे ते आपल्या पाल्यांना शाळांमध्ये पाठवत नसल्याचे चित्र आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांची गर्दी, मुलांना नियमांबाबत फारसे गांभीर्य नसणे, कुठल्याही वस्तूला हात लावणे, एकत्र खेळणे आदी प्रकार मुलांकडून होतात. त्यामुळे मुुलांना प्रादुर्भावाची मोठी भीती असते. त्यासाठीच पालक त्यांना शाळेत पाठविण्यास धजावत नसल्याची स्थिती आहे.

शाळांनी केली उपाययोजना

शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीच्या सर्व आवश्यक उपाययोजना केलेल्या आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागात देखील उपाययोजनांबाबत दक्षता घेतली जात आहे. प्रत्येक शाळेने प्रवेश द्वारावरच थर्मल गन, ॲाक्सिमीटर याद्वारे तपासणी करण्याचे नियोजन केलेेले आहे. प्रत्येकाला सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्याची सक्ती केली जाते. शिवाय विद्यार्थ्यांना शक्य असल्यास त्यांनी सोबत सॅनिटायझर सोबत आणण्याचेदेखील आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय मास्कदेखील सक्तीचा करण्यात आला आहे. वर्गात देखील सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचा प्रयत्न शाळांकडून केला जात आहे.

पालकांमध्ये संभ्रमावस्था...

n विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची उत्सुकता असली तरी पालकांची नकार घंटा आणि शाळेत नेण्यासाठी व आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था नसणे यामुळे देखील उपस्थिती वाढत नसल्याची स्थिती आहे. याबाबत प्रशासनाने आणि शाळांनी पालकांमध्ये सकारात्मक वातावरण तयार करणे आवश्यक आहे.

सलग पाच तासिका...

n ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या जास्त आहे त्या शाळांनी एक दिवआड वर्ग भरविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सुटसुटीतपणा आला आहे. शिवाय सलग पाच तासिका केल्या जात असल्यामुळे विद्यार्थ्यांना मधली सुट्टी राहत नाही. शिवाय पोषण आहारदेखील दिला जात नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य यातून दिले जात आहे.

तालुकानिहाय पाचवी ते आठवीच्या शाळा...

n नंदुरबार तालुक्यात १३३ शाळा असून पहिल्या दिवशी सर्वच शाळा सुरू झाल्या.

n नवापूर तालुक्यात ५० शाळा असून सर्वच सुरू झाल्या.

n शहादा तालुक्यात ११० शाळा असून पहिल्या दिवशी १०१ शाळा सुरू झाल्या.

n तळोदा तालुक्यात ३३ शाळा असून पहिल्या दिवशी ३१ शाळा सुरू झाल्या.

n अक्कलकुवा तालुक्यात ३१ पैकी सर्वच शाळा सुरू झाल्या.

n धडगाव तालुक्यात १३ शाळा असून सर्वच सुरू झाल्या.