शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

विसरवाडी येथील आगीत ६० लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : येथील ग्रामपंचायत गल्लीतील आईल रि-पॅकिंगच्या गोडाऊनला लागलेल्या आगीत गोडाऊनसह शेजारील घरे व त्यातील संसार ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : येथील ग्रामपंचायत गल्लीतील आईल रि-पॅकिंगच्या गोडाऊनला लागलेल्या आगीत गोडाऊनसह शेजारील घरे व त्यातील संसार उपयोगी साहित्य व मशनरी सह एकूण ^६० लाख ५१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे ग्रामपंचायत गल्लीत दिनेश प्रकाश जयस्वाल यांचे बालाजी इंटरप्राईजेस नावाचे आॅइल री-पॅकिंग करण्याचे गोडाऊन आहे. या गोडाऊनला गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती.गोडाउनमध्ये आॅइलच्या ज्वलनशील पदार्थ असलेल्या टाक्या असल्याने आगीने क्षणात रौद्र रूप धारण केले. या आगीत दिनेश जयस्वाल यांचे मशनरी सह गोडाऊन व इतर साहित्य पूर्णपणे जळून राख झाले. तसेच शेजारी पाच घरांना देखील या आगीने लपेट्यात घेत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य व घर जळून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमनापंत व नवापूरचे तहसीलदार सुनिता जºहाड यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानग्रस्त कुटुंबांचे सांत्वन केले व येथील तलाठी यांना नुकसानीचा पंचनामा करण्यास सांगितले.नुकसान झालेल्या दिनेश जयस्वाल, मंगलाबाई जयस्वाल, रज्जुबाई जयस्वाल या तीन जणांना विसरवाडी पतसंस्थेतर्फे तात्काळ प्रत्येकी एक एक लाख रुपये कर्ज स्वरूपात मंजूर करण्यात आले असे विसरवाडी ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन बकाराम गावित व व्हाईस चेअरमन विजय अग्रवाल यांनी सांगितले.४या आगीमध्ये दिनेश जयस्वाल यांच्या गोडाऊन मधील आॅइलच्या टाक्या, पाउच पॅकिंग मशीन, सिलिंग मशीन, फिलिंग मशीन, गोडाऊन यासह इतर मशनरी व साहित्य असे १६ लाख ८१ हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच मंगलाबाई श्यामलाल जयस्वाल यांचे १६ लाख ४४ हजार रुपये, रज्जूबाई प्रकाश जयस्वाल यांचे १९ लाख ७० हजार रुपये, मंजुळाबाई सदाशिव चौधरी यांचे सात लाख ५० हजार रुपये असे सर्व मिळून एकूण ६० लाख ५१ हजार रुपयांचे नुकसान झाले असे तलाठी नरेंद्र महाले व प्रभारी मंडळ अधिकारी जयंत वसावे यांनी तहसीलदार नवापूर यांच्याकडे सादर केलेल्या पंचनाम्यात उल्लेख केला आहे.