शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अखेर ब्राह्मणपुरीत कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : कोरोनापासून लांब राहिलेल्या शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी गावात अखेर कोरोनाचा शिरकाव झाला असून चार जण ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : कोरोनापासून लांब राहिलेल्या शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी गावात अखेर कोरोनाचा शिरकाव झाला असून चार जण बाधित झाले असून त्यातील एका वयोवृद्ध पुरुषाचा मृत्य झाला आहे. गावात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. चांदसैली येथेही एक रुग्ण आढळून आला आहे.कोरोनापासून दूर राहिलेल्या ब्राह्मणपुरी गावात अखेर कोरोनाने शिरकाव केला आहे. गावातील एका ९० वर्षीय वद्ध पुरुषाचा तर ५२ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल सुरत येथे खाजगी दवाखान्यात पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील आठ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होता. त्यातील ब्राह्मणपुरी येथील ५५ वर्षीय महिलेचा तर ३३ वर्षीय पुरुषाचा व चांदसैली येथील ४० वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने गावात खळबळ उडाली. या रुग्णांच्या संपर्कातील ब्राह्मणपुरी येथील सात तर चांदसैली गावातील पाच जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी शहादा येथे पाठवण्यात आले आहेत.ब्राह्मणपुरी गावात आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय पाटील, परिचारिका अलका मारनर, लताबाई बिरारे, आशा कार्यकर्ती सोनल राजपूत, मनीषा पाटील हे रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांचे सर्वेक्षण करीत आहते. तर चांदसैली गावात आरोग्य सेवक हिरालाल मराठे, आशा कार्यकर्ती उखीबाई शेमळे हे सर्वेक्षण करीत आहेत. ब्राह्मणपुरी गावात मंडळ अधिकारी निकिता नायक, तलाठी स्मिता पाटील, उपसरपंच माधवराव पाटील, ग्रामविकास अधिकारी गोपाळ पाटील, पोलीस पाटील रवींद्र पवार, ग्रामपंचायत कर्मचारी कैलास बिरारे, सांगा पावरा गावात उपाययोजना करीत असून संपर्कात आलेल्यांच्या घर व परिसरात फवारणी करण्यात आली. चांदसैली गावाचे सरपंच संजय पाडवी, ग्रामसेवक गोपाल गिरासे हे गावात उपाययोजना करीत आहेत.ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होत असून नागरिक खुलेआम गर्दी करीत रस्त्यावर उभे राहत असल्याचे चित्र आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिसरातील गावातील विनाकारण गर्दी करीत उभे असलेल्यांना स्थानिक नागरिक व कर्मचारी सांगण्यासाठी गेले तर भांडणही उद्भवते. ब्राह्मणपुरी बिटमध्ये १२ हून अधिक गावे जोडली असून या बिटात निदान एक किंवा दोन पोलीस कर्मचारी बंदोबस्तसाठी ठेवण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.