शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.मध्ये अखेर काँग्रेस-शिवसेनेचेच जमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  काँग्रेस व शिवसेनेने अखेर राज्य, नंदुरबार पालिका यामध्ये असलेल्या आघाडीचा कित्ता गिरवत जिल्हा परिषदेवरही ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  काँग्रेस व शिवसेनेने अखेर राज्य, नंदुरबार पालिका यामध्ये असलेल्या आघाडीचा कित्ता गिरवत जिल्हा परिषदेवरही सत्ता स्थापन केली. दोन्ही पदांवर अनुक्रमे काँग्रेस व शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. निवडीनंतर काँग्रेस व शिवसेनेच्या नेते व पदाधिका:यांनी एकच जल्लोष केला.    जिल्हा परिषदेवर कुणा एका पक्षाला बहुमत मिळालेले नव्हते. भाजप व काँग्रेसला सारख्याच अर्थात प्रत्येकी 23 जागा मिळाल्या होत्या. भाजपच्या साथीला राष्ट्रवादी गेली, परंतु तरीही बहुमतासाठी त्यांना तीन सदस्यांची गरज लागत होती. त्यामुळे शिवसेनेच्या सात सदस्यांना महत्त्व प्राप्त झाले होते. शिवसेनेची भुमिका शेवटर्पयत स्पष्ट होत नव्हती. त्यामुळे नेमकी सत्ता कुणाची बसणार याबाबत उत्सूकता लागली होती. काँग्रेस व शिवसेनेने आपलीच सत्ता येणार म्हणून दावा सोडलेला नव्हता. शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये दोन दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू झाले होते. अखेर गुरुवारी रात्री समझोता होऊन अध्यक्षपदी काँग्रेस तर उपाध्यक्षपदावर शिवसेनेचा उमेदवार राहील हे स्पष्ट झाले. त्यामुळे काँग्रेस-सेनेकडे 30 सदस्य झाले तर भाजपकडे 26 सदस्य कायम होते. तरीही भाजपने आमचीच सत्ता स्थापन होईल हा दावा कायम ठेवला होता.अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी दाखल झाले आठ नामांकन सकाळी 11 वाजता अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. अध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे अजीत सुरुपसिंग नाईक, अॅड.सिमा पद्माकर वळवी यांनी तर भाजपतर्फे कुमुदिनी विजयकुमार गावीत, अर्चना शरदकुमार गावीत यांनी अर्ज दाखल केले.उपाध्यक्षपदासाठी अॅड.राम रघुवंशी, जयश्री दिपक पाटील, अर्चना गावीत व विजया गावीत यांनी अर्ज दाखल केले. छाननीत सर्व अर्ज वैध ठरल्यानंतर दुपारी दोन ते तीन वाजेदरम्यान माघारीच्या मुदतीत अध्यक्षपदासाठी अजीत नाईक व अर्चना गावीत यांनी तर उपाध्यक्षपदासाठी अर्चना गावीत व विजया गावीत यांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे अध्यक्षपदासाठी कुमुदिनी विजयकुमार गावीत व सिमा वळवी यांच्यात सरळ व उपाध्यक्षपदासाठी राम रघुवंशी व जयश्री पाटील यांच्यात सरळ लढत स्पष्ट झाली.प्रत्यक्ष सभेच्या वेळी भाजपच्या गटनेत्या कुमुदिनी गावीत व सदस्य भरत गावीत यांनी अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता आमचा सिमा वळवी यांना पाठींबा असल्याचे सांगितले. परंतु प्रक्रियेनुसार निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. अध्यक्षपदासाठी उमेदवार सिमा वळवी यांच्यासह सर्वच 56 सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. त्यामुळे सिमा वळवी यांना सर्वच 56 मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी मात्र भाजपने मतदान करीत आपले उमेदवार जयश्री पाटील यांना मतदान केल्याने त्यांना 26 मते मिळाली. राम रघुवंशी यांना काँग्रेस व शिवसेनेने मतदान केल्याने त्यांना 30 मते मिळाल्याने रघुवंशी यांना विजयी घोषीत करण्यात आले. निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड तर सहायक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी काम पाहिले. निवडीनंतर शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी, माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी, शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबन थोरात, सेनेचे नेते दिपक गवते, जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे, आमशा पाडवी, मनोज रघुवंशी आदी उपस्थित होते. अध्यक्ष व उपाध्यक्षपदी विराजमान झालेले सिमा वळवी व राम रघुवंशी या युवकांच्या हाती सत्तेची धूरा सोपविण्यात आली आहे. दोन्हीही सदस्य हे पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद चालवितांना त्यांची काही प्रमाणात कसरत होणार आहे. परिणामी विषय समिती सभापती निवडतांना अनुभवी  व्यक्तींना प्राधान्य द्यावे लागणार आहे. जिल्हा परिषदेत आधीच जवळपास 20 सदस्य तरुण निवडून आले आहेत. त्यात अध्यक्ष व उपाध्यक्षपदीही आता युवक निवडले गेले आहेत.