शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
3
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
4
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
5
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
6
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
7
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
8
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात
9
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
10
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
11
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
12
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
13
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
14
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
15
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
16
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
17
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
20
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात निकालाच्या घोषणेनंतर ‘कही खुशी कही गम’ची अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 10:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : नवापुर मतदार संघावर पुन्हा एकदा कॉग्रेसने सत्ता स्थापित केली आह़े पालिकेच्या नगरभवनात गुरुवारी झालेली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापुर : नवापुर मतदार संघावर पुन्हा एकदा कॉग्रेसने सत्ता स्थापित केली आह़े पालिकेच्या नगरभवनात गुरुवारी झालेली मतमोजणी कही खुशी कही गम असाच अनुभव देणारी होती़ 2 लाख 17 हजार 768 मतदारांनी आजच्या निकालावर शिक्कामोर्तब केले. सकाळी आठ वाजेपासुन चौदा टेबलांवर 24 फे:यांमध्ये मतांची मोजणी करण्यात आली. चार तासात मतमोजणी पूर्ण होऊन निकाल समोर आला़  परंतू प्रशासनाने दुपारी दोन वाजता अधिकृत निकालाची घोषणा केली़मतमोजणीत पहिल्या फेरीपासुन कॉग्रेस उमेदवार शिरीष नाईक यांनी  आघाडी घेतली होती़ ही आघाडी शेवटच्या फेरीपयर्ंत कायम होती. मतमोजणी केंद्राच्या परिसरात पोलीसांनी कडक पहारा बसविला होता. खुद्द जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत मतमोजणी केंद्राबाहेर उपस्थित होते. मतमोजणीची उत्सुकता लागुन असलेले हजारो कॉग्रेस समर्थक परिसरात एकत्रित झाले होते. विसाव्या फेरीनंतर शिरीष नाईक यांची विजयाची खात्री झाल्यानंतर समर्थकांनी घोषणा देत फटाके फोडण्यास सुरुवात केली. सुमारे 11 हजाराहुन अधिक मतांनी शिरीष नाईक विजयी झाल्याचे समजल्यानंतर वरिष्ठ महाविद्यालय परिसरात कार्यकर्ते एकत्रित येऊन जल्लोष सुरु करण्यात आला़  शिरीष नाईक यांनाही मोह आवरता आला नाही व त्यांनीही ठेका धरला.  दिवंगत व प्रथम जिल्हा परिषद अध्यक्षा स्वर्गीय हेमलता वळवी यांच्या स्मारकावर पुष्पहार अर्पण करुन तेथुनच घोषणा देत विजयी रॅली काढण्यात आली. मुख्य मार्गावरुन रॅली काढून साईबाबा व गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन शिरीष नाईक यांनी कॉग्रेस भवनात भेट दिली. ज्येष्ठ नेते आमदार सुरुपसिंग नाईक यांचे आशिर्वाद घेत त्यांनी घेतल़े त्यांच्यासोबत अजित नाईक, पत्नी रजनी नाईक, विनोद नाईक, सुनिता नाईक, मालती नाईक, रतनजी गावीत, नरेंद्र नगराळे, रमेश गावीत आदी उपस्थित होते. दोन ठिकाणी मार्गदर्शन करतांना शिरीष नाईक यांनी मतदारांचे आभार व्यक्त करुन अडचणीच्या प्रसंगी मदत करण्याचे आश्वासन दिल़े दुसरीकडे भरत गावीत यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते व सामान्य चाहत्यांनी एकच गर्दी करुन त्यांच्याविषयी आस्था व्यक्त केली. जनतेचा निकाल मान्य असून एवढ्या कमी अवधीत मोठय़ा संख्येने लोकांची मने जिंकण्यात यशस्वी झाल्याचे व त्याचे श्रेय कार्यकर्ते यांना असल्याचे भरत गावीत यांनी सांगितले.पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवत गर्दीवर नियंत्रण ठेवले होत़े नगरभवन परिसरातील रस्त्यांवर बॅरिकेंटींग करुन वाहतूक नियंत्रण करण्यात आले होत़े यातून वाहतूक कोंडी टळली होती़