शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

बिबट्याच्या हल्ल्याने सोजरबार येथे भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील सोजरबार गावापासून नजीक असलेल्या एका शेतातील झोपडीत राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या सहा वर्षीय बालिकेस बिबट्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील सोजरबार गावापासून नजीक असलेल्या एका शेतातील झोपडीत राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या सहा वर्षीय बालिकेस बिबट्याने गुरूवारी पहाटे अक्षरश: झोपडीत शिरून निद्रावस्थेत असताना उचलून नेत ठार केले तर शुक्रवारी पुन्हा काजीपूर-तलावडी शिवरात बिबट्याने गायीला फस्त केल्याची घटना घडली. या परिसरात जंगली श्वापदाच्या वाढत्या हल्ल्याच्या घटना निश्चितच चिंताजनक असून, बंदोबस्ताबाबत येथील वनविभाग केवळ थातूर मातूर पिंजरे लावण्याचा दिखावा करत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, वनविभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची अपेक्षा आहे.तळोदा तालुक्यातील सोजरबार येथील शिला भिमा नाईक ही सहा वर्षीय बालिका गावापसून जवळ असलेल्या शेतकºयाच्या शेतातील झोपडीत गुरूवारी झोपली होती. त्याच दरम्यान पहाटेच्या सुमारास बिबट्याला झोपडीतील कोंबड्या-बकºयांचा सुगावा लागल्यामुळे कुडाच्या भिंतींना जोरदार ठोस देत झोपडीत शिरला. या झोपडीत गाढ झोपेत असलेल्या बालिकेवर झडप घालत तेथून तिला उचलून तिच्यावर गंभीर हल्ला केला. यात बालिकेचा जागीच करून अंत झाला. तिच्या रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर वडिलांनी आरडा-ओरड केली. तथापि तोपावेतो बालिकेचा मृत्यू झाला होता. येथील वनविभागाने घटनेच्या पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडले असले तरी गेल्या तीन महिन्यात अस्वल, बिबट्या या जंगली श्वापदांच्या हल्लाची ही तिसरी घटना घडली आहे. यापूर्वी मोहिदा येथील शेतकºयाचा बळी गेला होता तर त्याच्या तिसºया दिवशी वेलीपाडा गावातील तीन जणांना अस्वलाने एका-पाठोपाठ लक्ष करत गंभीर जखमी केले होते.सुदैवाने त्यांनी अस्वलावर प्रतिकार केल्यामुळे आपला जीव वाचविण्यात यशस्वी झाले होते. गेल्या महिन्यातदेखील तालुक्यातील तुळाजा येथील बालिकेस बिबट्याने शेतातून उचलण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तिच्या आईच्या मत्सुदगिरीमुळे बालिका बचावली होती. गेल्या तीन महिन्या दरम्यान, माणसावरील जंगली श्वापदांच्या हल्ल्याच्या चार घटना घडूनदेखील येथील वनविभाग गंभीर व ठोस उपाय योजना करायला तयार नाही. केवळ इकडे-तिकडे पिंजरे लावण्याचा दिखाऊपणा केला जात आहे. साहजिकच नागरिकांमध्ये वनविभागाच्या कचखाऊ भूमिकेबाबत तीव्र असंतोष पसरला आहे. त्यांनी पिंजरे लावले असले तरीही श्वापदे त्यांच्या हातावर तुरी देऊन निघून जात आहे. रोजच कुठेना-कुठे बिबट्या, अस्वल नागरिकांना दिसत असतात. परंतु वनविभागाच्या नजरेस ते पडत नाही. तीन दिवसांपूर्वीदेखील मोड गावातील एका आदिवासी मजुराच्या झोपडीतील शेळ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला होता. तरीही वनविभाग त्यातून ठोस उपाययोजना द्यायला तयार नाही. त्यामुळे तालुक्यात हल्ल्याच्या घटनांमध्येदेखील वाढ होत असून, ही चिंताजनक बाब आहे.या श्वापदांच्या ठोस बंदोबस्ताबाबत वनविभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने दखल घ्यावी, अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बालिकेच्या घटनेच्या पंचनामा करण्यात आला असून, आता त्या ठिकाणी पाच कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.-चंद्रकांत कासार, वनक्षेत्रपाल, वनकार्यालय, तळोदा