शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्याने सोजरबार येथे भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील सोजरबार गावापासून नजीक असलेल्या एका शेतातील झोपडीत राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या सहा वर्षीय बालिकेस बिबट्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील सोजरबार गावापासून नजीक असलेल्या एका शेतातील झोपडीत राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या सहा वर्षीय बालिकेस बिबट्याने गुरूवारी पहाटे अक्षरश: झोपडीत शिरून निद्रावस्थेत असताना उचलून नेत ठार केले तर शुक्रवारी पुन्हा काजीपूर-तलावडी शिवरात बिबट्याने गायीला फस्त केल्याची घटना घडली. या परिसरात जंगली श्वापदाच्या वाढत्या हल्ल्याच्या घटना निश्चितच चिंताजनक असून, बंदोबस्ताबाबत येथील वनविभाग केवळ थातूर मातूर पिंजरे लावण्याचा दिखावा करत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, वनविभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची अपेक्षा आहे.तळोदा तालुक्यातील सोजरबार येथील शिला भिमा नाईक ही सहा वर्षीय बालिका गावापसून जवळ असलेल्या शेतकºयाच्या शेतातील झोपडीत गुरूवारी झोपली होती. त्याच दरम्यान पहाटेच्या सुमारास बिबट्याला झोपडीतील कोंबड्या-बकºयांचा सुगावा लागल्यामुळे कुडाच्या भिंतींना जोरदार ठोस देत झोपडीत शिरला. या झोपडीत गाढ झोपेत असलेल्या बालिकेवर झडप घालत तेथून तिला उचलून तिच्यावर गंभीर हल्ला केला. यात बालिकेचा जागीच करून अंत झाला. तिच्या रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर वडिलांनी आरडा-ओरड केली. तथापि तोपावेतो बालिकेचा मृत्यू झाला होता. येथील वनविभागाने घटनेच्या पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडले असले तरी गेल्या तीन महिन्यात अस्वल, बिबट्या या जंगली श्वापदांच्या हल्लाची ही तिसरी घटना घडली आहे. यापूर्वी मोहिदा येथील शेतकºयाचा बळी गेला होता तर त्याच्या तिसºया दिवशी वेलीपाडा गावातील तीन जणांना अस्वलाने एका-पाठोपाठ लक्ष करत गंभीर जखमी केले होते.सुदैवाने त्यांनी अस्वलावर प्रतिकार केल्यामुळे आपला जीव वाचविण्यात यशस्वी झाले होते. गेल्या महिन्यातदेखील तालुक्यातील तुळाजा येथील बालिकेस बिबट्याने शेतातून उचलण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तिच्या आईच्या मत्सुदगिरीमुळे बालिका बचावली होती. गेल्या तीन महिन्या दरम्यान, माणसावरील जंगली श्वापदांच्या हल्ल्याच्या चार घटना घडूनदेखील येथील वनविभाग गंभीर व ठोस उपाय योजना करायला तयार नाही. केवळ इकडे-तिकडे पिंजरे लावण्याचा दिखाऊपणा केला जात आहे. साहजिकच नागरिकांमध्ये वनविभागाच्या कचखाऊ भूमिकेबाबत तीव्र असंतोष पसरला आहे. त्यांनी पिंजरे लावले असले तरीही श्वापदे त्यांच्या हातावर तुरी देऊन निघून जात आहे. रोजच कुठेना-कुठे बिबट्या, अस्वल नागरिकांना दिसत असतात. परंतु वनविभागाच्या नजरेस ते पडत नाही. तीन दिवसांपूर्वीदेखील मोड गावातील एका आदिवासी मजुराच्या झोपडीतील शेळ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला होता. तरीही वनविभाग त्यातून ठोस उपाययोजना द्यायला तयार नाही. त्यामुळे तालुक्यात हल्ल्याच्या घटनांमध्येदेखील वाढ होत असून, ही चिंताजनक बाब आहे.या श्वापदांच्या ठोस बंदोबस्ताबाबत वनविभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने दखल घ्यावी, अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बालिकेच्या घटनेच्या पंचनामा करण्यात आला असून, आता त्या ठिकाणी पाच कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.-चंद्रकांत कासार, वनक्षेत्रपाल, वनकार्यालय, तळोदा