लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : तालुक्यातील दुर्गम भागातील होराफळी येथील शासकीय आश्रमशाळेत वीज, पाणी आणि इमारत या सुविधा मिळत नसल्याने विद्याथ्र्याची शैक्षणिक परवड सुरु आह़े येथे सुविधा मिळाव्यात म्हणून पालकांकडून लोकप्रतिनिधी आणि प्रकल्प अधिकारी यांच्याकडे मुलांन्ना सोयी मिळाव्यात अशी याचना सुरु आह़र्ेे सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील विद्याथ्र्याची निवासी शिक्षणाची सोय व्हावी यासाठी होराफळी येथे शासकीय आश्रमशाळा निर्माण करण्यात आली आह़े तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून चालवल्या जाणा:या या आश्रमशाळेत पहिली ते बारावीच्या वर्गात विद्याथ्र्याना प्रवेश देण्यात आले आहेत़ कनिष्ठ महाविद्यालयात कला शाखेचे शिक्षण विद्याथ्र्याना देण्यात येत़े परंतू आश्रमशाळेतील समस्यांमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित रहात असल्याचे वारंवार समोर येत आह़े विद्याथ्र्याच्या समस्या सोडवल्या जाव्यात यासाठी पालकांनी खासदार डॉ़ हीना गावीत आणि तळोदा प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्पाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेत निवेदन दिले होत़े निवेदन देतेवेळी पालकांच्या शिष्टमंडळाने चर्चा करुन समस्या मांडत सोडवण्याची मागणी केली होती़ निवेदनात, विद्याथ्र्यांच्या डीबीटी च्या व्यवहारात झालेल्या गैरव्यवहाराची त्वरित चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, होराफळी आश्रमशाळेला 10 वषार्नंतर कायमस्वरूपी मिळालेले मुख्याध्यापक यांची परस्पर प्रतिनियुक्तीवर भांग्रापाणी येथे बदली करण्यात आली आह़े ही प्रतिनियुक्ती त्वरित रद्द करून येथे कायमस्वरूपी निवासी मुख्याध्यापक द्यावे, शाळेत लाईट फिटिंग ची व्यवस्था करण्यात यावी, शाळेतील भिंतींना लावलेला रंग अत्यंत हलक्या दजार्चा असून त्याची चौकशी व्हावी, प्रभारी मुख्याध्यापक निवासी नसल्याने त्यांना योग्य त्या सूचना देऊन निवासी राहण्यास सांगण्यात यावे, विद्याथ्र्यासाठी पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था करण्यात यावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत़
554 विद्याथ्र्याना यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्याथ्र्याना येथे प्रवेश देण्यात आला आह़े या विद्याथ्र्यासाठी तब्बल 11 शिक्षक हे रोजंदारी कर्मचारी आहेत़ तर केवळ 1 शिक्षक परमनंट आहेत़ कला शाखेचे शिक्षण देण्यात येणा:या 12 वीच्या वर्गात अर्थशास्त्र शिकवणारे मुख्याध्यापक आठवडय़ातून एकदा येऊन संपूर्ण आठवडय़ाचा अभ्यास घेऊन निघून जात असल्याचे विद्याथ्र्याचे म्हणणे आह़े सोबत शाळा दुरुस्तीसाठी आलेल्या निधीचा गैरवापर होत असल्याचा पालकांचा आरोप आह़े यामुळे येथे सुविधाच नसल्याने विद्यार्थी हैराण झाले आहेत़
वर्ग खोल्या आणि निवासी खोल्या यासाठी वीज पुरवठा करण्याची गरज होती़ परंतू आश्रमशाळेत विज नसल्याचा प्रकार समोर आला आह़े रात्री अपरात्री बाहेर पडणा:या विद्याथ्र्याना सापांसह इतर कीटकांपासून धोका आह़े आश्रमशाळेत पिण्याचे आणि वापराचे पाणी नसल्याने विद्यार्थी नाला आणि ओढय़ांवर जाऊन अंघोळ करण्यासह सकाळचे विधी आटोपत असल्याचे प्रकार समोर आले आहेत़ यातून एखाद्या विद्याथ्र्याचा अपघात घडण्याची भिती पालकांकडून व्यक्त करण्यात येत आह़े