शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीच्या धामधुमीत संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची अचानक भेट, काय झाली चर्चा?
2
फडणवीसांशी कोल्ड वॉर की मैत्री? अंबरनाथमध्ये विचारधारा पायदळी; एकनाथ शिंदेंनी सोडले मौन 
3
"निवडणूक आयोग माझ्या हातात असता, तर भाजपचे ४ तुकडे केले असते!" संजय राऊत यांचा हल्लाबोल
4
पाकिस्तानच्या 'या' ३० वर्षांच्या मुलीने लष्कराच्या नाकी नऊ आणले! कोण आहे 'ही' सुंदरी?
5
आता भारतावर थेट 500% टॅरिफ लावणार ट्रम्प...! पुढच्या आठवड्यात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?
6
Jagannath Puri: आजही गोडधोड पक्वान्न सोडून जगन्नाथाला पहिला नैवेद्य खिचडीचाच का?
7
Post Office च्या 'या' योजनेत गुंतवणूक करा, दरमहा मिळेल ५५५० रुपये निश्चित व्याज; कोणती आहे स्कीम, पाहा
8
तिलक वर्माची अचानक तब्येत बिघडली; तात्काळ शस्त्रक्रिया करण्याची वेळ! नेमकं काय झालं?
9
सारा तेंडुलकर मराठीत बोलली, आजीची गोड आठवण सांगितली; Viral Video पाहून नेटकरी फिदा
10
जगातील सर्वात 'बलाढ्य' विरुद्ध सर्वात 'कमकुवत' चलन; यांच्यासमोर अमेरिकी डॉलरही फिका
11
बँक ऑफ बडोदामधून ₹५० लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती हवी सॅलरी? EMI किती असेल, पाहा
12
ढाका हादरलं! भरचौकात माजी नेत्याची निर्घृण हत्या; बांगलादेशात लष्कर तैनात, रस्त्यावर राडा
13
लोंढ्यांचा त्रास कोण भोगतोय? मांजरेकरांचा प्रश्न, उद्धव ठाकरे म्हणाले आपण...; मांजरेकर म्हणाले मध्यमवर्गीय...
14
'गृहिणी म्हणजे घराचं मॅनेजमेंट सांभाळणारा बिनपगारी जॉब, फक्त लक्षात ठेवा 'ही' एक गोष्ट!'-सद्गुरु
15
१० मुलींच्या जन्मानंतर ११वा मुलगा झाला! जन्मदाता पिता मात्र बेरोजगार; मनातील भावना सांगताना म्हणाले.. 
16
फडणवीस हे बसविलेले माणूस, पन्नास खोके हा गंमतीचा विषय नाही; राज ठाकरेंनी दिली ससाण्याची उपमा
17
अमेरिकेत नोकरी हवीय? एका प्रश्नाने उडवली भारतीय विद्यार्थ्यांची झोप; न्यूयॉर्क टाइम्सचा मोठा खुलासा!
18
₹३,०००, ₹५,०००, ₹८,००० आणि ₹१०,००० च्या गुंतवणुकीवर किती रिटर्न? १५ वर्षांत किती जमेल फंड, जाणून घ्या
19
मुंबईकर म्हणून आज मला लाज वाटतेय... आणखी विकास नको; महेश मांजरेकरांचा उद्विग्न सवाल, खंतही व्यक्त...
20
"भगत सिंगांनी काँग्रेस सरकारवर बॉम्ब टाकला"; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा अजब दावा, ऐतिहासिक चुकीमुळे भाजपची नाचक्की
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक पिके सोडून सातपुड्यातील शेतकऱ्यांचा नगदी पिकांकडे कल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:27 IST

सातपुड्यातील शेतकऱ्यांनी आयुर्वेदिक महत्त्व असलेल्या काळ्या गव्हाचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. सेंद्रिय शेतीमुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य ...

सातपुड्यातील शेतकऱ्यांनी आयुर्वेदिक महत्त्व असलेल्या काळ्या गव्हाचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. सेंद्रिय शेतीमुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत आहे.

यात दुर्गम भागातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी पारंपरिक पिकांची पारंपरिक पद्धतीने काळ्या गव्हाची लागवड केली आहे. सातपुड्यातील माती ही खडकाळ व मुरमाळ आहे. त्यामुळे या परिसरात पारंपरिक पिकांना प्राधान्य दिले जाते. बदलते वातावरण आणि तंत्रज्ञान तसेच सुयोग्य मार्गदर्शन याची सांगड घालत बऱ्याच क्षेत्रावर आयुर्वेदिक महत्त्व असलेल्या काळ्या गव्हाची लागवड शेतकऱ्यांनी आहे.

सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी शेतकऱ्यांना पंजाब राज्यातील मोहाली येथून काळ्या गव्हाचे बियाणे उपलब्ध करून दिले आहे.

आयुर्वेदिक काळा गहू

आयुर्वेदिक महत्त्व असलेल्या काळ्या गव्हात एनथोसायनिन पिगमेंटची मात्रा ४० ते १४० तर कॅलरी ३४३ ग्रॅम, पाणी, १० टक्के, प्रोटीन १३.३ ग्रॅम, कार्ब्स ७१.५ ग्रॅम, साखर ० ग्रॅम, फायबर १० ग्रॅम, वसा ३.४ ग्रॅम व कार्बोहायड्रेट आदी घटक पदार्थ मोठ्या प्रमाणावर असतात त्यामुळे काळ्या गव्हाच्या सेवनाने मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर, हार्ट अटॅक, मानसिक आजार अशा १२ आजारांत निश्चित सुधार होत असल्याची भावना ग्राहकांमध्ये आहे. काळ्या गव्हाच्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत मिळत आहे.

होतेय आगाऊ मागणी

काळ्या गव्हाची आगाऊ मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने हा गहू शेतकऱ्यांच्या शेतातून सरळ ग्राहकांना योग्य दरात घरपोच दिला जातोय. यामुळे शेतकरी आणि ग्राहक या दोघांचे हित जोपासले जात आहे.

एकरी २० क्विंटल उत्पादन

एकरी साधारणपणे १५ ते २० क्विंटल उत्पादन होत असून ५,५०० ते ६,००० रुपये क्विंटल भाव शेतकऱ्यांना मिळतोय.

इतर राज्यात दिलेले काळे गहू शेतकरी आठ हजार रुपयेपर्यंत क्विंटल विकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी भर पडत असून शेतकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.

लागवडीनंतर काळ्या गव्हाची काळजी कशी घ्यावी, याबाबत सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी सातपुड्यातील विकास तडवी यांच्या शेतात थेट भेट दिली व परिसरातील शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनही करीत आहेत.