शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
3
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
4
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
5
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
6
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
7
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
8
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
9
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
10
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
11
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
12
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
13
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
14
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
15
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
16
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
17
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
18
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
19
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
20
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे शेतकऱ्यांची ‘मेहनत’ पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सलग सुरू असलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ शेतात पाणी साचल्याने पिके ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात सलग सुरू असलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ शेतात पाणी साचल्याने पिके सडू लागली असून पावसाचा जोर कायम राहिल्यास मोठ्या नुकसानीची भिती व्यक्त होत आहे़गत आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे़ सोबत वादळी वारेही जोर धरत असल्याने पिके जमीनदोस्त झाली आहेत़ ऊस, कापूस, सोयाबीन, ज्वारी, भात आदी धान्य पिकांसह तेलबिया आणि कडधान्य पिकांची वाताहत झाली आहे़ या पिकांचे पंचनामे करण्यासाठी मंगळवारपासून महसूल आणि कृषी विभागाचे पथक नियुक्त करण्यात आले असून त्यांच्याकडून येत्या चार दिवसात पंचनामे पूर्ण करुन अहवाल जिल्हा प्रशासनाला सोपवला जाईल़ दरम्यान नंदुरबार, तळोदा, नवापूर आणि शहादा तालुक्यात पावसामुळे कोरड आणि बागायती अशा दोन्ही क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत़ येत्या दोन दिवसात पाऊस कायम राहिल्यास हाती येऊ शकणाऱ्या उत्पन्नापासूनही शेतकरी मुकणार असल्याची माहिती शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिली आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या १०८ टक्के पाऊस झाला आहे़ दररोज दुपारी चार ते मध्यरात्री १२ पर्यंत वादळी वाºयासह पाऊस येत आहे़ जिल्ह्यात १ लाख २२ हजारपेक्षा अधिक क्षेत्रात लागवड केलेल्या कापूस पिकाला बोंडे आली आहेत़ वादळामुळे बोंडे झाडाखाली कोसळून नुकसान झाले आहे़ दुसरीकडे धान्य पिके जमिनदोस्त झाली आहेत़ आधीच शेतात साचलेल्या पाण्यात कणसासह कडबाही सडू लागला असल्याचे चित्र आहे़ ज्याठिकाणी कापूस बोंडे फूटून बाहेर आली होती़ त्या शेतांमध्ये पाणी साचले आहे़ परिणामी झाडांवर मर येऊन फुटलेला कापूस सडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे़ हे सर्व नुकसान पाहून शेतकरी हताश झाले आहेत़

नंदुरबार तालुक्यातील कोरीट महसूल मंडळातील गावांमध्ये शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे़ नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने काही ठिकाणी पिके वाहून गेली आहेत़ अनेक ठिकाणी आठ दिवसांपासून जमिन पाण्याखाली गेली असल्याने नुकसान वाढत आहे़ या नुकसानीचा आढावा प्रशासनाने घ्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे़जिल्ह्यातील एकूण ३६ महसूली मंडळात सलग सात दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान झाल्याची माहिती आहे़ या पार्श्वभूमीवर कृषी विभाग कृषी सहायक व पर्यवेक्षक यांच्या माध्यमातून पंचनाम्यांच्या प्रक्रियेला गती देत आहेत़