शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
7
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
8
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
9
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

१० हजार विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 12:36 IST

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : अतिवृष्टी व ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, यामुळे समाजातील ...

वसंत मराठे ।लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : अतिवृष्टी व ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, यामुळे समाजातील सर्वच घटक प्रभावीत झाले आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सरसकट परीक्षा शुल्क माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असून, त्यामुळे जिल्ह्यातील १० हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.याबाबत जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांनी उमविच्या या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची अपेक्षा पालकांनी केली आहे. तशी मागणीदेखील केली आहे.गेल्या वर्षी पावसाळ्यात जुलैच्या अखेरीस सुरूवात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्यादेखील लांबल्या होत्या. लांबलेल्या पावसाने सलग हजेरी लावली होती. त्यानंतर थोडीसी उसंत मिळाल्यामुळे शेतकºयांनी जशी तशी पेरणी उरकवून घेतली होती. परंतु पुन्हा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने दमदार सुरूवात केल्यामुळे सलग दोन-तीन महिन्यांपर्यंत जोरदार पडला. या दरम्यान महापुरामुळे शेतकºयांचे सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यातून थोडे फार उत्पन्न हाती लागण्याची शक्यता असतांना आॅक्टोबरच्च्या शेवटी पुन्हा अवकाळीने शेतकºयावर घाला घातला. साहजिकच हाता तोंडाशी आलेला घासदेखील नैसर्गिक आपत्तीने हिरावून नेला. परिणामी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकºयांच्या हाती काहीच पडले नाही. अगदी उत्पादनावर केलेला रासायनिक खते, बी-बियाण्यांचा खर्चदेखील निघाला नाही. शेतकºयांचे पूर्णपणे आर्थिक दिवाळे निघाल्यामुळे शेतकरी अक्षरश: कर्जबाजारी झाला आहे. अतिवृष्टी व ओला दुष्काळामुळे खान्देशातील शेतकºयांबरोबरच समाजातील सर्वच घटक प्रभावी झाले आहे. पालकांची अशी खालावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाने सामाजिक बांधिलकी जपत आपल्या कार्यक्षेत्रातील म्हणजे ५२ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात येणाºया विविध परीक्षांचे परीक्षा शुल्क सरसकट माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या यानिर्णयाचा लाभ नंदुरबार, तळोदा, शहादा, धडगाव, नवापूर, अक्कलकुवा या सहा तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार साधारण १० हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.वास्तविक अतिवृष्टी व ओला दुष्काळामुळे जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी पूर्णपणे आर्थिक कोंडीत सापडला होता. विद्यापीठाने घेतलेल्या फी माफीच्या निर्णयामुळे पालकांना थोडीशी का होईना आर्थिक मदत मिळाली आहे. परंतु विद्यापीठाच्या निर्णयाची संबंधीत महाविद्यालय प्रशासनाने प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची मागणी आदिवासी पालकांनी केली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कासाठी अडवून फिरवा फिरव करू नये अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्का बरोबरच कॅप शुल्क, पासिंग सर्टीफिकेट, गुणपत्रक, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, पर्यावरण, जनरल नॉलेज, प्रोजेक्ट, डेझरटेशन इ. प्रकारच्या उपक्रमाचे शुल्क सुद्धा माफ केली आहेत. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज स्विकारताना कुठलीही अट न घालता अर्ज स्विकारून तसे प्रस्ताव विद्यापीठाकडे पाठविण्याची सूचना दिली आहे. तथापि रपीक्षा अर्ज विलंबाने सादर करणाºया विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या नियमानुसार विलंब शुल्क आकारणी करण्याचे निर्णयात म्हटले आहे. तथापि विद्यापीठाने लेट फी बाबतही धोरणात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे. कारण अतिदुर्गम आदिवासी भागातील पालक व विद्यार्थ्यांपुढे अनेक अडचणी असतात. त्यामुळे परीक्षा अर्ज भरताना तो वेळेवर उपस्थित राहू शकणार नाही. विद्यापीठाने विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेण्याची मागणी पालकांनी केली आहे.