शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

जिर्ण घरे व इमारतींना नोटीसा देऊनही जैसे थे परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पावसाळ्यापूर्वी शहरातील पडक्या व जिर्ण इमारतींबाबत घरमालकांना नोटीसा देऊनही अनेक ठिकाणी जैसे थे असल्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पावसाळ्यापूर्वी शहरातील पडक्या व जिर्ण इमारतींबाबत घरमालकांना नोटीसा देऊनही अनेक ठिकाणी जैसे थे असल्याचे चित्र आहे. पालिकेचा बांधकाम विभाग दरवर्षी केवळ नोटीसा देऊन मोकळे होतो. परंतु प्रत्यक्ष कार्यवाही केली जात नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे अशा घरांना गळती लागली होती. परंतु वेळीच पावसाने विश्रांती घेतल्याने काही अनर्थ झाला नाही.पावसाळ्याच्या सुरुवातीला अर्थात मे महिन्यात दरवर्षी पालिका पडक्या घर, इमारत मालक तसेच उतारावरील आणि नदी, नालाकाठी राहणाऱ्या नागरिकाना वैयक्तिक किंवा सार्वजनिक स्वरूपात नोटीसा बजावतत असते. यंदा देखील तश प्रकारच्या नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. परंतु एकाही घरमालकाने, इमारत मालकाने त्याबाबत गांभिर्याने घेतले नसल्याची स्थिती आहे.सर्व्हेक्षण आवश्यकपडके घर किंवा इमारतींचे शहरात सर्व्हेक्षण होणे आवश्यक असते. परंतु पालिकेकडे अशा प्रकारची यादी किंवा माहिती उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. यंदा १५ पेक्षा अधीक जणांना नोटीसा बजावण्यात आल्या.वास्तविक प्रत्येक प्रभागनिहाय अशा प्रकारचे सर्व्हेक्षण होणे आवश्यक असते. तसे झाले नाही किंवा होत नाही. त्यामुळे शहरात अशा प्रकारच्या किती इमारती आणि घरे आहेत त्याची माहिती उपलब्ध होत नाही.दरवर्षाची स्थितीपडक्या इमारती अर्थात घरांची स्थिती अगदीच एक किंवा दोन मजले यापर्यंत सिमीत आहे. त्यापेक्षा उंच इमारती शहरात नाहीत. त्यामुळे अशा घर मालकांनी अशा ठिकाणी भाड्याने घरे किंवा खोल्या दिलेल्या आहेत. त्या खाली करणे म्हणजे मोठे दिव्य असते. शिवाय स्वत: भाडेकरू देखील आपल्य जबाबदारीवर अशा ठिकाणी राहत असतात. त्यामुळे घरमालकांचाही नाईलाज होत असल्याचे चित्र आहे. परिणामी अशा इमारतींमध्ये पावसाळा संपूनही घरभाडेकरू राहत असल्याचे दिसून येते.उतारावरील घरेनंदुरबारात उतारावरील घरांची समस्या देखील आहे. साक्रीनाका पाण्याच्या टाकीपासू ते थेट वाघेश्वरी देवी मंदीर टेकडीपर्यंत अशा घरांची समस्या कायम आहे. काही ठिकाणी कच्ची तर काही ठिकाणी पक्की अतिक्रमणे आहेत. अशा ठिकाणी उतारावरून पाणी वाहने, माती वाहून येणे, दरडी कोसळणे असे प्रकार होत असतात. शहरात सुदैवाने मोठी घटना घडली नाही. परंतु यापुढील काळासाठी दक्षता बाळगणे देखील आवश्यक आहे.संततधारमुळे धोकापावसाचे अतीप्रमाण आणि संततधार यामुळे कच्ची व पडकी घरे, इमारती यांना धोका निर्माण होतो. नंदुरबारसह परिसरात गेल्या आठडयात संततधार पाऊस झाला. त्यामुळे कच्च्या घरांना गळती लागली होती. उतारावरून पाणी वाहण्याचे प्रमाण देखील वाढले होते. उतारावरून गाळ आणि माती वाहून आल्याने उतारावरील अनेक घरांच्या परिसरात आणि गल्लींमध्ये मातीचा थर साचला होता.शहरातील जिर्ण इमारती व घरांचे नव्याने सर्व्हेक्षण करावे.जिर्ण घरमालकांसह शेजारी राहणाऱ्यांचेही जीव यामुळे धोक्यात येतात.दरवर्षी पालिका केवळ नोटीसा देऊन मोकळे होते. त्याऐवजी ठोस कारवाई करणे आवश्यक आहे.नंदुरबारसह, शहादा पालिकेतही हीच स्थिती आहे.