शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

पाणीटंचाई समस्येवर तालुकानिहाय बैठकांवर देणार भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 12:57 IST

नंदुरबार :  पाणी टंचाई आणि जलयुक्त कामांमधील शिल्लक निधीतील कामे यावरून जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत चर्चा करण्यात आली. ...

नंदुरबार :  पाणी टंचाई आणि जलयुक्त कामांमधील शिल्लक निधीतील कामे यावरून जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत चर्चा करण्यात आली. पाणी टंचाई निवारणार्थ आणि त्यावर तातडीने उपाययोजना व्हाव्या यासाठी तालुका स्तरावर बैठका घेण्याचे नियोजन करण्याच्या सुचना अध्यक्षा रजनी नाईक यांनी दिल्या. जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जि.प.सभागृहात झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. उपाध्यक्ष सुहास नाईक, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे, विषय समिती सभापती दत्तू चौरे, आत्माराम बागले, हिराबाई पाडवी आदी उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत पाणी टंचाईचे गांभिर्य आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर चर्चा करण्यात आली. अध्यक्षा रजनी नाईक यांनी संभाव्य किती गावांना पाणी टंचाई जाणवू शकेल याबाबत विचारणा केली. परंतु टंचाई निवारण आराखडा तयार झालेला नसल्यामुळे तसे ठोस सांगता येणार नाही. नंदुरबार, नवापूर, शहादा व तळोदा तालुक्यात टंचाईची तीव्रता अधीक राहण्याची शक्यता लक्षात घेवून उपाययोजना करण्याचे अध्यक्षांनी सांगितले. त्यामुळे लवकरच तालुकास्तरावर बैठका आयोजित करून पाणी टंचाई व त्यावरील उपाययोजना यावर चर्चा करण्यात यावी. जेणेकरून स्थानिकांचे प्रश्न व समस्या जाणून घेता येतील असे त्यांनी सांगितले.सदस्य रतन पाडवी यांनी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील भरतीबाबत प्रश्न उपस्थित केला. कमी अनुभव असलेल्यांची भरती झाली. आंतरराष्ट्रीय शाळेत शिकविण्याचा अनुभव असणा:यांना प्रथम प्राधान्य दिले गेले पाहिजे होते, परंतु तसे झाले नाही असे त्यांनी सांगितले. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी सोमवंशी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सांगळे यांनी निवड समिती ही जिल्हाधिका:यांच्या अध्यक्षतेखाली होती. त्यांना भरतीचे अधिकार होते. त्यांच्याकडून निवड यादी आलेली आहे. अद्याप कुणालाही नियुक्तीपत्र दिले गेले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी करूनच नियुक्तीपत्र दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.