शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई समस्येवर तालुकानिहाय बैठकांवर देणार भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 12:57 IST

नंदुरबार :  पाणी टंचाई आणि जलयुक्त कामांमधील शिल्लक निधीतील कामे यावरून जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत चर्चा करण्यात आली. ...

नंदुरबार :  पाणी टंचाई आणि जलयुक्त कामांमधील शिल्लक निधीतील कामे यावरून जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत चर्चा करण्यात आली. पाणी टंचाई निवारणार्थ आणि त्यावर तातडीने उपाययोजना व्हाव्या यासाठी तालुका स्तरावर बैठका घेण्याचे नियोजन करण्याच्या सुचना अध्यक्षा रजनी नाईक यांनी दिल्या. जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जि.प.सभागृहात झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. उपाध्यक्ष सुहास नाईक, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे, विषय समिती सभापती दत्तू चौरे, आत्माराम बागले, हिराबाई पाडवी आदी उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत पाणी टंचाईचे गांभिर्य आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर चर्चा करण्यात आली. अध्यक्षा रजनी नाईक यांनी संभाव्य किती गावांना पाणी टंचाई जाणवू शकेल याबाबत विचारणा केली. परंतु टंचाई निवारण आराखडा तयार झालेला नसल्यामुळे तसे ठोस सांगता येणार नाही. नंदुरबार, नवापूर, शहादा व तळोदा तालुक्यात टंचाईची तीव्रता अधीक राहण्याची शक्यता लक्षात घेवून उपाययोजना करण्याचे अध्यक्षांनी सांगितले. त्यामुळे लवकरच तालुकास्तरावर बैठका आयोजित करून पाणी टंचाई व त्यावरील उपाययोजना यावर चर्चा करण्यात यावी. जेणेकरून स्थानिकांचे प्रश्न व समस्या जाणून घेता येतील असे त्यांनी सांगितले.सदस्य रतन पाडवी यांनी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील भरतीबाबत प्रश्न उपस्थित केला. कमी अनुभव असलेल्यांची भरती झाली. आंतरराष्ट्रीय शाळेत शिकविण्याचा अनुभव असणा:यांना प्रथम प्राधान्य दिले गेले पाहिजे होते, परंतु तसे झाले नाही असे त्यांनी सांगितले. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी सोमवंशी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सांगळे यांनी निवड समिती ही जिल्हाधिका:यांच्या अध्यक्षतेखाली होती. त्यांना भरतीचे अधिकार होते. त्यांच्याकडून निवड यादी आलेली आहे. अद्याप कुणालाही नियुक्तीपत्र दिले गेले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी करूनच नियुक्तीपत्र दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.