शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

पाणीटंचाई समस्येवर तालुकानिहाय बैठकांवर देणार भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 12:57 IST

नंदुरबार :  पाणी टंचाई आणि जलयुक्त कामांमधील शिल्लक निधीतील कामे यावरून जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत चर्चा करण्यात आली. ...

नंदुरबार :  पाणी टंचाई आणि जलयुक्त कामांमधील शिल्लक निधीतील कामे यावरून जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत चर्चा करण्यात आली. पाणी टंचाई निवारणार्थ आणि त्यावर तातडीने उपाययोजना व्हाव्या यासाठी तालुका स्तरावर बैठका घेण्याचे नियोजन करण्याच्या सुचना अध्यक्षा रजनी नाईक यांनी दिल्या. जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जि.प.सभागृहात झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. उपाध्यक्ष सुहास नाईक, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे, विषय समिती सभापती दत्तू चौरे, आत्माराम बागले, हिराबाई पाडवी आदी उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत पाणी टंचाईचे गांभिर्य आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर चर्चा करण्यात आली. अध्यक्षा रजनी नाईक यांनी संभाव्य किती गावांना पाणी टंचाई जाणवू शकेल याबाबत विचारणा केली. परंतु टंचाई निवारण आराखडा तयार झालेला नसल्यामुळे तसे ठोस सांगता येणार नाही. नंदुरबार, नवापूर, शहादा व तळोदा तालुक्यात टंचाईची तीव्रता अधीक राहण्याची शक्यता लक्षात घेवून उपाययोजना करण्याचे अध्यक्षांनी सांगितले. त्यामुळे लवकरच तालुकास्तरावर बैठका आयोजित करून पाणी टंचाई व त्यावरील उपाययोजना यावर चर्चा करण्यात यावी. जेणेकरून स्थानिकांचे प्रश्न व समस्या जाणून घेता येतील असे त्यांनी सांगितले.सदस्य रतन पाडवी यांनी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील भरतीबाबत प्रश्न उपस्थित केला. कमी अनुभव असलेल्यांची भरती झाली. आंतरराष्ट्रीय शाळेत शिकविण्याचा अनुभव असणा:यांना प्रथम प्राधान्य दिले गेले पाहिजे होते, परंतु तसे झाले नाही असे त्यांनी सांगितले. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी सोमवंशी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सांगळे यांनी निवड समिती ही जिल्हाधिका:यांच्या अध्यक्षतेखाली होती. त्यांना भरतीचे अधिकार होते. त्यांच्याकडून निवड यादी आलेली आहे. अद्याप कुणालाही नियुक्तीपत्र दिले गेले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी करूनच नियुक्तीपत्र दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.