शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व वा:यांमुळे फळपिकांना फटका

By admin | Updated: May 30, 2017 00:32 IST

वा:याचा वेग ताशी 40 ते 45 किलोमीटर : केळी, पपई, आंबा पिकांना नुकसानकारक

नंदुरबार : मान्सूनपूर्व वेगवान वारे यंदा वेळेवर येऊन धडकल्याने मान्सूनच्या आगमनाविषयी विविध आडाखे बांधले जाऊ लागले आहेत. यंदा जूनच्या पहिल्या आठवडय़ात पाऊस होईल याबाबतही कृषी तज्ज्ञांकडून दुजोरा दिला जात आहे. सध्या सुरू असलेल्या वा:याचा वेग ताशी 40 ते 45 किलोमीटर एवढा आहे. जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाण्याचे बाष्पीभवन होण्याची प्रक्रीया जलदस्वरूपात सुरू आहे. वा:यांमुळे केळी, पपई, आंबा व उन्हाळी लागवड होणा:या कापसाला फटका बसत आहे.यंदाचा उन्हाळा सर्वच अर्थाने तापदायक ठरला होता. एप्रिलच्या दुस:या आठवडय़ापासून तापमान 41 ते 44 अंश सेल्सीयसर्पयत राहिले होते. मध्यंतरी राज्यातील इतर भागात वळवाचा पाऊस झाला, परंतु जिल्ह्यात त्याचा मागमूसही राहिला नाही. त्यामुळे तापमान कमी होत नव्हते. गेल्या दोन आठवडय़ापासून तापमानाचा दिलासा मिळत आहे. 40 अंशाच्या आत तापमान राहत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यातच वेगवान वारेदेखील वाहत असल्यामुळे तापमानापासून दिलासा मिळाला आहे. सध्या गेल्या तीन ते चार दिवसांपासून वेगवान वारे वाहत आहेत. या वा:यांमुळे अनेकांना हैराण करून सोडले आहे. पिकांनाही त्याचा फटका बसत आहे.सध्या वाहणारे वारे हे मान्सूनपूर्व वारे असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. साधारणत: जूनच्या पहिल्या आठवडय़ात अशा प्रकारचे वारे वाहत असतात.  नैऋत्य दिशेकडून हे वारे वाहत असतात. आताही त्यांची दिशा तीच आहे. साधारणत: यांचा वेग मे महिन्याच्या दुस:या आठवडय़ात प्रतितास दहा ते पंधरा किलोमीटर इतका असतो. मे च्या शेवटच्या आणि जूनच्या पहिल्या आठवडय़ात त्यांचा वेग वाढून तो 40 ते 45 किलोमीटर प्रतितास इतका होतो. मान्सून दाखल झाल्यानंतर वा:याचा वेग मंदावतो. परंतु कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यास त्याचे स्वरूप चक्रीवादळात होत असते. गेल्या वर्षाच्या तुलनेत मान्सूनपूर्व वेगवान वारे हे आठवडाभर उशिराने सुरू झाले आहेत. त्यामुळे मान्सून वेळेवर दाखल होईल अशी अपेक्षा आता जोर धरू लागली आहे. यंदा मान्सूनचे आगमन लवकर होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे. त्याला पुरक बाबी सध्या घडत आहेत.फळ पिकांना फटकावेगवान वा:यांमुळे फळ पिकांना फटका बसत आहे. जिल्ह्यात केळी, पपईसोबतच आंब्याचे क्षेत्रदेखील मोठे आहे. केळी व पपईचे झाडे तुटून पडण्याची शक्यता आहे. फळ असल्यास त्यांना भेगा पडणे किंवा तुटून खाली पडण्याचे प्रमाण वाढले आहे. आंबेदेखील वा:यामुळे       खाली पडून त्यांचे नुकसान होत    आहे. जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या हजारो आंब्यांच्या झाडांपासून निघणा:या उत्पादनावर या भागातील अर्थकारण अवलंबून आहे. ही बाब लक्षात घेता दोन आठवडे आधीच सुरू झालेल्या मान्सूनपूर्व वा:यांमुळे आंब्याचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली  आहे. याशिवाय बागायतदार शेतक:यांनी लागवड केलेल्या उन्हाळी कापसालाही या वा:यांमुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तविल जात   आहे.