शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...! 
2
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
3
अलास्काला ६, तर इंडोनेशियाला ६.२ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके; 400 वर घरे उद्ध्वस्त, 7000 हून अधिक विस्थापित 
4
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
5
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
6
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
7
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
8
लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर
9
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
10
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
11
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
12
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
13
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
14
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
15
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
16
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
17
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
18
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
19
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
20
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात अत्यल्प साठय़ामुळे पाणीकपात लोकमत न्यूज नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 13:23 IST

नंदुरबार : विरचक प्रकल्पातील अवघा 12 टक्के पाणीसाठा लक्षात घेता नंदुरबारकरांना आता पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. साधारणत: 20 ते 25 मिनिटे पाणी कपात शक्य आहे. त्यादृष्टीने पालिकेने नियोजन सुरू केले आहे. सुदैवाने येत्या काही दिवसात दमदार पाऊस झालाच तर पाणी कपातीचे संकट टळू शकणार आहे.नंदुरबार शहराला विरचक प्रकल्पातील ...

नंदुरबार : विरचक प्रकल्पातील अवघा 12 टक्के पाणीसाठा लक्षात घेता नंदुरबारकरांना आता पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. साधारणत: 20 ते 25 मिनिटे पाणी कपात शक्य आहे. त्यादृष्टीने पालिकेने नियोजन सुरू केले आहे. सुदैवाने येत्या काही दिवसात दमदार पाऊस झालाच तर पाणी कपातीचे संकट टळू शकणार आहे.नंदुरबार शहराला विरचक प्रकल्पातील पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी प्रकल्पाच्या ठिकाणी पंपींग स्टेशन आणि जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. प्रकल्पाची क्षमता लक्षात घेता 50 टक्के प्रकल्प भरला तरी वर्षभर पाणी टंचाईची समस्या दूर होते. गेल्या वर्षी प्रकल्प 41 टक्के भरला होता. त्यामुळे वर्षभर पाणी टंचाईला सामोरे जावे लागले नाही. परंतु पावसाळ्याचे दोन महिने झाले तरी अद्याप दमदार पाऊस न झाल्याने आणि त्यामुळे प्रकल्पात पाणीसाठा होऊ न शकल्याने आता नंदुरबारकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहे. मृत व जिवंत साठाप्रकल्पात सद्य स्थितीत 12 टक्के जिवंत तर 18 टक्के मृत साठा आहे. पालिकेसाठी धरणातील 4.60 दशलक्ष घनमिटर पाणीसाठा राखीव असतो. सध्याचा 7.65 दशलक्ष घनमिटर साठय़ातील तेवढा साठा पालिकेचा हिस्स्याचा आहे. परंतु त्यात मृत साठय़ाचा देखील समावेश आहे. जर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देखील पुरेसा पाऊस झालाच नाही तर पुढील काळात नंदुरबारकरांसमोर मोठी समस्या वाढून ठेवली आहे. ही बाब लक्षात घेता आतापासूनच आहे तो पाणीसाठा काटकसरीने वापरल्यास पुढील काळातील टंचाई काही प्रमाणात कमी करता येऊ शकते. त्यादृष्टीने आता पालिकेने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.सद्याचा पाणीपुरवठासध्या एक दिवसाआड 45 ते 60 मिनिटे पाणीपुरवठा केला जात आहे. जो शहरवासीयांच्या दृष्टीने पुरेसा आहे. प्रत्येक झोननिहाय हा पाणीपुरवठा केला जातो. कधी तांत्रिक समस्या उद्भवलीच तर त्यात खंड पडतो. अन्यथा नियमितपणे अशाच पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पालिकेचे असते. याशिवाय पालिका शासकीय कार्यालये, शासकीय वसाहती यांना मिटरप्रमाणे पाणीपुरवठा करीत असते.20 ते 25 मिनिटे कपातसद्याचा पाणीसाठा लक्षात घेता येत्या चार ते पाच दिवसापासून किमान 20 ते 25 मिनिटे पाणी कपात शक्य आहे. पाणपुरवठा विभाग आणि पाटबंधारे विभाग यांनी आणखी वेगळाच अहवाल दिला तर दोन दिवसाआड 45 ते 50 मिनिटे पाणीपुरवठा करणे असाही एक पर्याय राहणार आहे. परंतु दोन दिवसाआड पाणीपुरवठय़ाला शहरवासयांचा विरोध असू शकतो. त्यामुळे आहे त्या वेळेतच 20 ते 25 मिनिटांची कपात या पर्यायावर नगराध्यक्षा र}ा रघुवंशी निर्णय घेऊ शकतात.चारी किंवा उतारचा पर्यायविरचक प्रकल्पाचे मुख्य गेट ते पालिकेला पाणी पुरवठा करणारे पंपींग स्टेशन अर्थात इंटकवेल यात अंतर जास्त आहे. सध्याचा पाणीसाठा हा इंटकवेलपासून लांब अंतरावर आहे. त्यामुळे साठलेले पाणी इंटकवेलर्पयत आणण्यासाठी  धरणात त्या भागात उतार करणे किंवा चारी करून ते पाणी आणणे हा पर्याय आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या सुचना नगराध्यक्षांनी दिल्या आहेत.पाणी जपून वापरावेसध्याची पावसाची स्थिती आणि एकुणच पाणीसाठा लक्षात घेता शहरवासीयांनी पाणी जपून वापरणे आवश्यक आहे. पावसाळ्याचे अवघे दिड महिने शिल्लक आहेत. या दिड महिन्यातील पावसाची स्थिती कशी असते त्यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. जर अपेक्षीत पाऊस झालाच नाही आणि प्रकल्पातही नव्याने पाणीसाठा झाला नाही तर आणखी पाणी कपातीचे संकट राहणार आहे. ही बाब लक्षात घेता आतापासूनच नागरिकांन पाणी जपून वापरावे अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने पालिकेतर्फे जनजागृती करण्यात येणार आहे.