शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

नंदुरबारात अत्यल्प साठय़ामुळे पाणीकपात लोकमत न्यूज नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 13:23 IST

नंदुरबार : विरचक प्रकल्पातील अवघा 12 टक्के पाणीसाठा लक्षात घेता नंदुरबारकरांना आता पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. साधारणत: 20 ते 25 मिनिटे पाणी कपात शक्य आहे. त्यादृष्टीने पालिकेने नियोजन सुरू केले आहे. सुदैवाने येत्या काही दिवसात दमदार पाऊस झालाच तर पाणी कपातीचे संकट टळू शकणार आहे.नंदुरबार शहराला विरचक प्रकल्पातील ...

नंदुरबार : विरचक प्रकल्पातील अवघा 12 टक्के पाणीसाठा लक्षात घेता नंदुरबारकरांना आता पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. साधारणत: 20 ते 25 मिनिटे पाणी कपात शक्य आहे. त्यादृष्टीने पालिकेने नियोजन सुरू केले आहे. सुदैवाने येत्या काही दिवसात दमदार पाऊस झालाच तर पाणी कपातीचे संकट टळू शकणार आहे.नंदुरबार शहराला विरचक प्रकल्पातील पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी प्रकल्पाच्या ठिकाणी पंपींग स्टेशन आणि जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. प्रकल्पाची क्षमता लक्षात घेता 50 टक्के प्रकल्प भरला तरी वर्षभर पाणी टंचाईची समस्या दूर होते. गेल्या वर्षी प्रकल्प 41 टक्के भरला होता. त्यामुळे वर्षभर पाणी टंचाईला सामोरे जावे लागले नाही. परंतु पावसाळ्याचे दोन महिने झाले तरी अद्याप दमदार पाऊस न झाल्याने आणि त्यामुळे प्रकल्पात पाणीसाठा होऊ न शकल्याने आता नंदुरबारकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहे. मृत व जिवंत साठाप्रकल्पात सद्य स्थितीत 12 टक्के जिवंत तर 18 टक्के मृत साठा आहे. पालिकेसाठी धरणातील 4.60 दशलक्ष घनमिटर पाणीसाठा राखीव असतो. सध्याचा 7.65 दशलक्ष घनमिटर साठय़ातील तेवढा साठा पालिकेचा हिस्स्याचा आहे. परंतु त्यात मृत साठय़ाचा देखील समावेश आहे. जर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देखील पुरेसा पाऊस झालाच नाही तर पुढील काळात नंदुरबारकरांसमोर मोठी समस्या वाढून ठेवली आहे. ही बाब लक्षात घेता आतापासूनच आहे तो पाणीसाठा काटकसरीने वापरल्यास पुढील काळातील टंचाई काही प्रमाणात कमी करता येऊ शकते. त्यादृष्टीने आता पालिकेने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.सद्याचा पाणीपुरवठासध्या एक दिवसाआड 45 ते 60 मिनिटे पाणीपुरवठा केला जात आहे. जो शहरवासीयांच्या दृष्टीने पुरेसा आहे. प्रत्येक झोननिहाय हा पाणीपुरवठा केला जातो. कधी तांत्रिक समस्या उद्भवलीच तर त्यात खंड पडतो. अन्यथा नियमितपणे अशाच पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पालिकेचे असते. याशिवाय पालिका शासकीय कार्यालये, शासकीय वसाहती यांना मिटरप्रमाणे पाणीपुरवठा करीत असते.20 ते 25 मिनिटे कपातसद्याचा पाणीसाठा लक्षात घेता येत्या चार ते पाच दिवसापासून किमान 20 ते 25 मिनिटे पाणी कपात शक्य आहे. पाणपुरवठा विभाग आणि पाटबंधारे विभाग यांनी आणखी वेगळाच अहवाल दिला तर दोन दिवसाआड 45 ते 50 मिनिटे पाणीपुरवठा करणे असाही एक पर्याय राहणार आहे. परंतु दोन दिवसाआड पाणीपुरवठय़ाला शहरवासयांचा विरोध असू शकतो. त्यामुळे आहे त्या वेळेतच 20 ते 25 मिनिटांची कपात या पर्यायावर नगराध्यक्षा र}ा रघुवंशी निर्णय घेऊ शकतात.चारी किंवा उतारचा पर्यायविरचक प्रकल्पाचे मुख्य गेट ते पालिकेला पाणी पुरवठा करणारे पंपींग स्टेशन अर्थात इंटकवेल यात अंतर जास्त आहे. सध्याचा पाणीसाठा हा इंटकवेलपासून लांब अंतरावर आहे. त्यामुळे साठलेले पाणी इंटकवेलर्पयत आणण्यासाठी  धरणात त्या भागात उतार करणे किंवा चारी करून ते पाणी आणणे हा पर्याय आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या सुचना नगराध्यक्षांनी दिल्या आहेत.पाणी जपून वापरावेसध्याची पावसाची स्थिती आणि एकुणच पाणीसाठा लक्षात घेता शहरवासीयांनी पाणी जपून वापरणे आवश्यक आहे. पावसाळ्याचे अवघे दिड महिने शिल्लक आहेत. या दिड महिन्यातील पावसाची स्थिती कशी असते त्यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. जर अपेक्षीत पाऊस झालाच नाही आणि प्रकल्पातही नव्याने पाणीसाठा झाला नाही तर आणखी पाणी कपातीचे संकट राहणार आहे. ही बाब लक्षात घेता आतापासूनच नागरिकांन पाणी जपून वापरावे अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने पालिकेतर्फे जनजागृती करण्यात येणार आहे.