शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

दुष्काळ झळांमुळे वरूळ गाव पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 12:19 IST

लहान शहादे : नंदुरबार जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची हजेरी लागल्याने निर्माण झालेल्या दुष्काळ झळांमधून सावरण्यासाठी मजूर स्थलांतराचा मार्ग निवडत आहेत़ दरदिवशी स्थलांतराचा हा वेग वाढत असून गावे ओस पडत आहेत़ नंदुरबार तालुक्याच्या उत्तरेला असलेल्या वरूळ गावात अशीच भिषण स्थिती असून 690 लोकसंख्येच्या या गावातून 300 जण गुजरात राज्यात रवाना ...

लहान शहादे : नंदुरबार जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची हजेरी लागल्याने निर्माण झालेल्या दुष्काळ झळांमधून सावरण्यासाठी मजूर स्थलांतराचा मार्ग निवडत आहेत़ दरदिवशी स्थलांतराचा हा वेग वाढत असून गावे ओस पडत आहेत़ नंदुरबार तालुक्याच्या उत्तरेला असलेल्या वरूळ गावात अशीच भिषण स्थिती असून 690 लोकसंख्येच्या या गावातून 300 जण गुजरात राज्यात रवाना झाल्याची माहिती आह़े 100 टक्के आदिवासी बहुल वस्ती असलेल्या वरूळ गावात यंदाही  दुष्काळी स्थिती असल्याने मजूरांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आह़े एकीकडे दुष्काळी स्थितीमुळे शेतशिवार ओस पडले असताना गावात मिळणारे पिण्याचे पाणी आणि इतर सुविधांचीही दैना झाली आह़े  रोजगारासोबतच दर दिवशी भेडसावणा:या मूलभूत समस्यांना कंटाळून ग्रामस्थ घरादाराला टाळे ठोकून  गुजरात राज्याचा रस्ता धरत असल्याचे चित्र येथे राजरोस नजरेस पडत आह़े यातून दस:यानंतर रिते होणारे गाव यंदा दस:यापूर्वीच भकास दिसू लागले आह़े उर्वरित ग्रामस्थही स्थलांतराच्या तयारीत आहेत़ यामुळे येत्या काळात या गावात केवळ वृद्ध आणि निवडक शेतकरी कुटंबांसह रहिवास करणार असल्याचे सांगण्यात आले आह़े नंदुरबार तालुक्यातील खोडसगाव, समशेरपूर, शिंदे, लहान शहादे, पळाशी या मोठय़ा गावांमध्ये शेतीकामांसाठी मजूर पुरवठा करणारी वसाहत म्हणून वरूळ गावाचा लौकिक आह़े गावात मोजक्याच जणांकडे स्वत:ची शेती आह़ेसंपूर्णपणे कोरडवाहू असलेल्या शेतीत कृषीपंप बसवून सिंचन करण्याची ऐपत नसल्याने आणि शासनही कोरडवाहू शेती कसरणा:यांचे ऐकत नसल्याने वर्षानुवर्षे दुस:याच्या शेतात मजूरी करण्याचा नाईलाज येथील ग्रामस्थांचा आह़े यंदा जून महिन्यापासून पावसाने रडतखडत हजेरी लावल्याने आठवडय़ातून चार दिवस काम आणि तीन दिवस आराम अशी स्थिती येथील मजूरांची होती़ यातील काही जणांनी नंदुरबार आणि लगतच्या निझर परिसरातील लघुउद्योजकांकडून मजूरीसह विविध कामे करून रोजगार कमावण्याचा प्रयत्नही केला़ परंतू तो अपुरा पडला़ परिणामी गावातून गेल्या 15 दिवसांपासून ग्रामस्थांचे लोंढेच गुजरातकडे सरकू लागले आहेत़ बारडोली आणि मढी साखर कारखान्यात ऊस तोड तसेच सौराष्ट्र भागात कापूस वेचणीसाठी शेतक:यांकडून बोलावणे येण्यापूर्वीच अनेकजण रवाना झाले आहेत़  साधारण 400 ते 600 रूपये प्रतिदिवस रोजगार आणि जेवण यासह कुटूंबासाठी राहण्याची जागा या अटीवर ही कुटूंबे रवाना होत असल्याने घरांना कुलूप लागत आहेग़ावात ज्या लोकांकडे स्वत:ची गुरे आहेत तेच सध्या गावात दिसून येत आहेत़ काहींकडे दुभती जनावरे असली तरी त्यांना चारा नसल्याने सुरु असलेला छोटा दुग्धव्यवसायही चा:याअभावी रसातळाला जात आह़े गावाला पाणी पुरवठा करणारी योजना येत्या महिनाभरात आटून भटकंती होणार असल्याने पुढे काय असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आह़े गावात पाण्यासाठी इतर स्त्रोत म्हणून टाकण्यात आलेल्या हातपपांची स्थिती दयनीय आह़े गावातून स्थलांतर करणा:या ग्रामस्थांना घेण्यासाठी यंदाही ठेकेदारांची वाहने येत असून मजूर त्यांचे कुटूंबिय आणि त्यांचा जुजबी सामान घेत रवाना होत आहेत़ मजूरांच्या काही जत्थ्यांकडून भाडोत्री वाहने केली जात आहेत़ स्थलांतरामुळे गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्याथ्र्याच्या संख्येवरही परिणाम झाला असून याठिकाणी दरदिवशी विद्यार्थी संख्या घटत असल्याची माहिती देण्यात आली आह़े यातून शिक्षकांच्या चिंता वाढल्या आहेत़