शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

कोरोनामुळे स्कूल बसचालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर, १४ महिन्यांपासून काम नाही; रोजंदारीचे कामही भेटेनासे झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST

कोरोना महामारीमुळे शासनाने संचारबंदी लावल्यामुळे याचा परिणाम छोटे-मोठे व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणात झाला. परंतु मुलांना शाळेत शिकण्यासाठी घेऊन जाणारे ...

कोरोना महामारीमुळे शासनाने संचारबंदी लावल्यामुळे याचा परिणाम छोटे-मोठे व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणात झाला. परंतु मुलांना शाळेत शिकण्यासाठी घेऊन जाणारे स्कूल बसचे सारथी काम नसल्यामुळे सध्या घरीच असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शेतीमध्ये सध्या मशागतीची कामे चालू असल्याने मोलमजुरीवर पोट भरणारे बसचालक सध्या काम नसल्यामुळे दोनवेळच्या जेवणाची चिंता करताना दिसून येत आहे. मुलांना शाळेत आणि शाळेतून घरी आणणारे बसचालक १४ महिन्यांपासून बस घरी उभीच असल्यामुळे स्वतःच्या संसाराची बस कशी चालवायची? असा प्रश्न या चालकांना पडला आहे. दुसरीकडे संचारबंदीमुळे किराणा मालाचे भाव खूपच वाढले आहेत, म्हणून पोट भरण्यासाठी अनेक बसचालक घर बांधकामावर, शेतात ट्रॅक्टर चालवायला जात आहेत. मात्र जे बसचालक शेतात मजुरी करून उदरनिर्वाह चालवित होते ते सध्या शेतातील भुईमूग काढणी, ऊस, केळी, पपई लागवड आटोपल्यामुळे घरीच आहेत. आता पावसाळा सुरू झाल्याशिवाय त्यांच्या हाताला काम मिळणार नाही.

अनेक तरुणांनी नोकरी भेटत नसल्यामुळे बँकेचे कर्ज काढून स्कूल बस खरेदी केली आहे. गरजेनुसार त्यांनी अनेक शाळांवर मुले घेऊन जाण्याचे काम करायला सुरुवात केली होती. पालकांनीही सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्या पाल्यांसाठी स्कूल बस लावलेली होती. त्यामुळे अनेक तरुणांना रोजगार मिळाला होता. मात्र मागीलवर्षी कोरोनामुळे संचारबंदी लागली. संसर्ग वाढत गेल्याने बाजार, दुकाने अनेकदा बंद ठेवण्याची वेळ आली. मध्यंतरी रुग्ण संख्या कमी झाल्यावर दोन-अडीच महिने शाळा सुरू झाल्या. मात्र दुसऱ्या लाटेचा प्रसार जलद गतीने वाढल्यामुळे पुन्हा शाळा सरसकट बंद झाल्या. पुन्हा शाळेच्या गाडीबरोबर बसचालकांच्या उदरनिर्वाहाची गाडी बंद झाली. परिणामी बसचालकांवर पुन्हा उपासमारीची वेळ येऊन ठेपली.

शाळा बंद झाल्यामुळे मुले घरी बसून ऑनलाइन शिक्षण घेत होते. शिक्षण थांबले नाही, मात्र बसची चाके थांबल्याने बँकेच्या हप्त्याने घेतलेल्या गाडीचे हप्ते थांबले. गाडीचे हप्त्यांचे व्याजदर वाढत आहे. शाळा बंद झाल्या तरी लग्नासाठी, पर्यटनासाठी किंवा इतर कार्यक्रम ठिकाणी आपली गाडी चालेल, असे बस चालकांना वाटत होते. मात्र सार्वजनिक वाहतूकही शासनाने बंद केल्याने स्कूल बसेसची चाके रुतली आहेत.

स्कूल बस बंद असल्याने मिळेल ते काम करून बसचालक उदरनिर्वाह करीत होते. मात्र सध्या मजुरीचे काम मिळेल याची शाश्वती नाही. म्हणून शासनाने या स्कूल बस चालकांकडेही लक्ष देऊन काहीतरी आर्थिक सहाय्य करावे, अशा प्रतिक्रिया बसचालकांकडून व्यक्त होत आहेत.

१४ महिन्यांपासून वाहन बंद असल्याने हातांना काम नाही, म्हणून मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. सध्या शेतातही काम नसल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे.

-कमलाकर कोळी, स्कूल बसचालक, कोठली, ता.शहादा