शहरं
Join us  
Trending Stories
1
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
4
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
5
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
6
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
7
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
8
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
9
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
10
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
11
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
12
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
13
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
14
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
15
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
16
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
17
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
18
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
19
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
20
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी

नंदुरबार जिल्ह्यात ओला दुष्काळ सदृष्य स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 90 टक्के पीक पाण्याखाली गेले आहेत. शेतांमध्ये कमरेएव्हढे पाणी साचले आहे. अनेक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 90 टक्के पीक पाण्याखाली गेले आहेत. शेतांमध्ये कमरेएव्हढे पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी नाल्यांनी प्रवाह बदलल्याने शेतांनाच नाल्याचे स्वरूप आले आहे. खरीप हंगाम हाताचा गेला असून जिल्ह्यात ओला दुष्काळ सदृष्य परिस्थिती आहे. दरम्यान, जिल्ह्यात दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला असून पूरपरिस्थिती कमी होऊ लागली आहे.  नंदुरबार जिल्ह्यात यंदा पावसाचे उशिराने आगमन झाले होते. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवडय़ार्पयत पेरण्या सुरूच होत्या. यंदा खरीप क्षेत्राच्या जवळपास 105 टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. परंतु गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा जोर अधीक असल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. दोन दिवसांपासूनच्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाल्यांनी प्रवाह बदलल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.90 टक्के पीक पाण्याखालीगेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यातील 90 टक्के भागातील पीक पाण्याखाली गेले आहे. कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी या पिकांना मोठा फटका बसला आहे. सातत्याने तीन ते चार फुटार्पयतच्या पाण्यात पीक राहत असल्यामुळे ते पिवळे पडण्याच्या मार्गावर आहेत. शेतांमधून पाण्याचा निचरा होण्यास मार्ग नसल्यामुळे पिकं सडण्याच्या मार्गावर आहेत. जे पिकं जेमतेम तग धरतील त्यांची उत्पादन क्षमता देखील कमी होणार आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याच्या स्थितीत आहे.केसाळ अळीनंतर अतिवृष्टीजून ते जुलै महिन्याच्या दुस:या आठवडय़ार्पयत पावसाने ताण दिला होता. यामुळे पिकांवर केसाळ व लष्करी अळींचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यापासून शेतक:यांनी जेमतेम सुटका करून घेतली तर लागलीच अतिवृष्टीने शेतक:यांना घेरले आहे.हजारो हेक्टर शेतीचे नुकसानजिल्ह्यातील अनेक भागातील नदी, नाल्यांनी आपला प्रवाह बदलला आहे. यामुळे ते पाणी शेतांमध्ये घुसले आहे. परिणामी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी तर शेतांना नाल्याचेच स्वरूप आले आहे. परिणामी अशा भागातील शेतीची सुपिकता नष्ट होण्याची भिती व्यक्त होत आहे. ओला दुष्काळाची स्थितीजिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरीचा केवळ 68 टक्के पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती होती. अनेक गावे व शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. अनेक कुटूंबांनी दुष्काळामुळे स्थलांतर देखील केले होते. त्यामुळे यंदा पाऊसपाणी समाधानकारक राहो यासाठी प्रार्थना केली जात होती. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात देखील दुस:या आठवडय़ार्पयत पावसाने ताण दिल्याने जिल्हावासीयांच्या तोंडाचे पाणी पळाले होते. परंतु जुलैच्या शेवटच्या आठवडय़ापासून पावसाने दिलेली सलामी आणि त्यानंतरची पावसाची हजेरी ओव्हरडोस देणारी ठरली. गेल्या दोन आठवडय़ात चार वेळा अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात झाली. विशेषत: घाट माथ्यावर पावसाचा जोर अधिक राहिल्याने तेथून उगम पावणा:या  व वाहत येणा:या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली. जुन, जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडय़ाच्या सरासरीच्या तुलनेत तब्बल 55 टक्के अधीक पाऊस झाला आहे. तर चार महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत जवळपास 86 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे. पंचनामे सुरूच..4 व 5 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर शेत शिवारातील पिकांचा पंचनामा करण्याचे काम सुरू झाले होते. परंतु संततधार पावसामुळे ते पुर्ण होऊ शकले नव्हते. आता पुन्हा दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत असल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. आधी जेथे 50 टक्केच्या आत नुकसानीचे पंचनामे झाले होते तेथे आता पुन्हा नव्याने पंचनामे करण्याची वेळ येणार आहे. जवळपास जिल्ह्यातील 80 टक्केपेक्षा अधीक भागावर 50 टक्केपेक्षा अधीक नुकसान झाले असून त्यानुसार शेतक:यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी होत  आहे.